शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकला मेट्रोची गरजच काय? : सुलक्षणा महाजन

By संजय पाठक | Updated: July 13, 2019 23:38 IST

नाशिक- सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी नाशिक महापालिकेने शहर बस वाहतूक सेवा ताब्यात घेण्याचे ठरवले असतानाच आता मेट्रो सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. तथापि, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी केवळ मेट्रोसारखे खर्चिक प्रकल्प राबवून उपयोग नाही, अशा प्रकारातून काहीही साध्य होत तर नाहीच परंतु महापालिकांना कर्जबाजारी होण्याची वेळ येते. परंतु सध्याच्या सरकारला मेट्रोचे वेड लागले आहे. नाशिकचा विचार केला तर मेट्रोची कोणतीही गरज नाही. सार्वजनिक बस व्यवस्था सक्षम केली आणि फारतर बीआरटीएस करून ती नियम आणि शिस्तीच्या चाकोरीत चालवली तरी खूप झाले असे मत प्रसिध्द नगररचना तज्ज्ञ सुलक्षणा महाजन यांनी व्यक्त केले आहे.

ठळक मुद्देसध्याच्या सरकारला लागले मेट्रोचे वेडमहापालिका कर्जबाजारी होणार

नाशिक- सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी नाशिक महापालिकेने शहर बस वाहतूक सेवा ताब्यात घेण्याचे ठरवले असतानाच आता मेट्रो सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. तथापि, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी केवळ मेट्रोसारखे खर्चिक प्रकल्प राबवून उपयोग नाही, अशा प्रकारातून काहीही साध्य होत तर नाहीच परंतु महापालिकांना कर्जबाजारी होण्याची वेळ येते. परंतु सध्याच्या सरकारला मेट्रोचे वेड लागले आहे. नाशिकचा विचार केला तर मेट्रोची कोणतीही गरज नाही. सार्वजनिक बस व्यवस्था सक्षम केली आणि फारतर बीआरटीएस करून ती नियम आणि शिस्तीच्या चाकोरीत चालवली तरी खूप झाले असे मत प्रसिध्द नगररचना तज्ज्ञ सुलक्षणा महाजन यांनी व्यक्त केले आहे.महाजन या मुळच्या नाशिककर असून सध्या त्या पुण्यात असतात. त्यामुळे नाशिकची चांगलीच माहिती असल्याने त्यांनी व्यवहार्य आणि परखड मते मांडली.प्रश्न- नाशिक महापालिकेच्या वतीने बस सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव मंजुर असानाच मेट्रोचा प्रस्ताव आला आणि तो अमलात येण्याची शक्यता आहे.महाजन : नाशिक शहर मला चांगलेच माहिती आहे. शहर बस वाहतूक महापालिकेने चालवण्याचा प्रस्ताव खूप अगोदरच प्रासूनचा प्रस्ताव होता. मात्र राज्यात कोठेही शहर बस वाहतूक ही फायद्यात नाही. ठाणे, पुणे, मुंबईचा देखील हाच अनुभव आहे. त्यामुळे नाशिक महापालिकेने अनेकदा हा प्रस्ताव फेटाळला आहे. आता महापालिकेने बस सेवा सुरू करायचे ठरवले असेल तर हरकत नाही. मात्र मेट्रो चालविण्याइतपत या शहराची गरज नाही.प्रश्न: मेट्रो सेवा अयोग्य का वाटते?महाजन: मेट्रोसाठी प्रवासी क्षमतेची मोठी गरज असते. सुमारे वीस हजार प्रवासी दर प्रवासी क्षमता मेट्रो रेल्वेसाठी असते. ती नाशिकची क्षमता नाही. परंतु त्यामुळे खांबावर चालवणारी मेट्रो बस हा पर्याय होऊ शकत नाही. लोकसंख्या, भौगोलिक क्षेत्र आणि प्रवाशांची संख्या गरज या सर्व बाबीचा विचार मेट्रोत केला जातो. परंतु सध्याचे सरकार हे फक्त मेट्रोवर भर देणारे आहे. मुंबई, पुणे, नागपुर, नाशिक अशा सर्वच ठिकाणी मेट्रोच करण्याचा आग्रह आहे. मेट्रो म्हंटले की त्यात कंस्ट्रक्शन खूप असते. १६०० कोटींचा प्रोजेक्ट असेल तर ९०० कोटी रूपये कंस्ट्रक्शनसाठी असतात. कदाचित यामुळेच मेट्रोला पुढे रेटले जात आहे. परंतु त्यातून काहीही साध्य होणार नाही. महापालिका कर्जबाजारी होईल त्यापलिकडे काहीच होणार नाही.

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाMetroमेट्रोPublic Transportसार्वजनिक वाहतूक