शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
2
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
3
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
4
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
5
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
6
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
7
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
8
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
9
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
10
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
11
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
12
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
13
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
14
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
15
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
16
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
17
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
18
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
19
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
20
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...

नाशिकला मेट्रोची गरजच काय? : सुलक्षणा महाजन

By संजय पाठक | Updated: July 13, 2019 23:38 IST

नाशिक- सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी नाशिक महापालिकेने शहर बस वाहतूक सेवा ताब्यात घेण्याचे ठरवले असतानाच आता मेट्रो सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. तथापि, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी केवळ मेट्रोसारखे खर्चिक प्रकल्प राबवून उपयोग नाही, अशा प्रकारातून काहीही साध्य होत तर नाहीच परंतु महापालिकांना कर्जबाजारी होण्याची वेळ येते. परंतु सध्याच्या सरकारला मेट्रोचे वेड लागले आहे. नाशिकचा विचार केला तर मेट्रोची कोणतीही गरज नाही. सार्वजनिक बस व्यवस्था सक्षम केली आणि फारतर बीआरटीएस करून ती नियम आणि शिस्तीच्या चाकोरीत चालवली तरी खूप झाले असे मत प्रसिध्द नगररचना तज्ज्ञ सुलक्षणा महाजन यांनी व्यक्त केले आहे.

ठळक मुद्देसध्याच्या सरकारला लागले मेट्रोचे वेडमहापालिका कर्जबाजारी होणार

नाशिक- सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी नाशिक महापालिकेने शहर बस वाहतूक सेवा ताब्यात घेण्याचे ठरवले असतानाच आता मेट्रो सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. तथापि, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी केवळ मेट्रोसारखे खर्चिक प्रकल्प राबवून उपयोग नाही, अशा प्रकारातून काहीही साध्य होत तर नाहीच परंतु महापालिकांना कर्जबाजारी होण्याची वेळ येते. परंतु सध्याच्या सरकारला मेट्रोचे वेड लागले आहे. नाशिकचा विचार केला तर मेट्रोची कोणतीही गरज नाही. सार्वजनिक बस व्यवस्था सक्षम केली आणि फारतर बीआरटीएस करून ती नियम आणि शिस्तीच्या चाकोरीत चालवली तरी खूप झाले असे मत प्रसिध्द नगररचना तज्ज्ञ सुलक्षणा महाजन यांनी व्यक्त केले आहे.महाजन या मुळच्या नाशिककर असून सध्या त्या पुण्यात असतात. त्यामुळे नाशिकची चांगलीच माहिती असल्याने त्यांनी व्यवहार्य आणि परखड मते मांडली.प्रश्न- नाशिक महापालिकेच्या वतीने बस सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव मंजुर असानाच मेट्रोचा प्रस्ताव आला आणि तो अमलात येण्याची शक्यता आहे.महाजन : नाशिक शहर मला चांगलेच माहिती आहे. शहर बस वाहतूक महापालिकेने चालवण्याचा प्रस्ताव खूप अगोदरच प्रासूनचा प्रस्ताव होता. मात्र राज्यात कोठेही शहर बस वाहतूक ही फायद्यात नाही. ठाणे, पुणे, मुंबईचा देखील हाच अनुभव आहे. त्यामुळे नाशिक महापालिकेने अनेकदा हा प्रस्ताव फेटाळला आहे. आता महापालिकेने बस सेवा सुरू करायचे ठरवले असेल तर हरकत नाही. मात्र मेट्रो चालविण्याइतपत या शहराची गरज नाही.प्रश्न: मेट्रो सेवा अयोग्य का वाटते?महाजन: मेट्रोसाठी प्रवासी क्षमतेची मोठी गरज असते. सुमारे वीस हजार प्रवासी दर प्रवासी क्षमता मेट्रो रेल्वेसाठी असते. ती नाशिकची क्षमता नाही. परंतु त्यामुळे खांबावर चालवणारी मेट्रो बस हा पर्याय होऊ शकत नाही. लोकसंख्या, भौगोलिक क्षेत्र आणि प्रवाशांची संख्या गरज या सर्व बाबीचा विचार मेट्रोत केला जातो. परंतु सध्याचे सरकार हे फक्त मेट्रोवर भर देणारे आहे. मुंबई, पुणे, नागपुर, नाशिक अशा सर्वच ठिकाणी मेट्रोच करण्याचा आग्रह आहे. मेट्रो म्हंटले की त्यात कंस्ट्रक्शन खूप असते. १६०० कोटींचा प्रोजेक्ट असेल तर ९०० कोटी रूपये कंस्ट्रक्शनसाठी असतात. कदाचित यामुळेच मेट्रोला पुढे रेटले जात आहे. परंतु त्यातून काहीही साध्य होणार नाही. महापालिका कर्जबाजारी होईल त्यापलिकडे काहीच होणार नाही.

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाMetroमेट्रोPublic Transportसार्वजनिक वाहतूक