शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

जायखेड्याच्या वारकऱ्यांना पुुण्यात मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2020 11:02 PM

जायखेडा : तुकाराम बीजनिमित्त पंढरपूरहून देहूला निघालेल्या जायखेडा, ता. बागलाण येथील दिंडीतील वारकऱ्यांना मद्यपान केलेल्या पाच ते सहा जणांनी शिवीगाळ करीत दगडाने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार खडकी (पुणे) येथे घडला. या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत असून, हल हल्लेखोरांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी कृष्णाई प्रतिष्ठान व परिसरातील वारकरी बांधवांकडून करण्यात येत आहे. ही घटना मंगळवारी (दि. १०) दुपारी १ वाजता खडकी येथे घडली. याप्रकरणी खडकी पोलिसांकडे तक्र ार अर्ज देण्यात आला आहे.

ठळक मुद्दे१८ ते २० वारकºयांना त्यांनी काठीने व दगडाने मारहाण करण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कजायखेडा : तुकाराम बीजनिमित्त पंढरपूरहून देहूला निघालेल्या जायखेडा, ता. बागलाण येथील दिंडीतील वारकऱ्यांना मद्यपान केलेल्या पाच ते सहा जणांनी शिवीगाळ करीत दगडाने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार खडकी (पुणे) येथे घडला. या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत असून, हल हल्लेखोरांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी कृष्णाई प्रतिष्ठान व परिसरातील वारकरी बांधवांकडून करण्यात येत आहे. ही घटना मंगळवारी (दि. १०) दुपारी १ वाजता खडकी येथे घडली. याप्रकरणी खडकी पोलिसांकडे तक्र ार अर्ज देण्यात आला आहे.दरवर्षाप्रमाणे यंदाही तुकाराम बीजनिमित्त पंढरपूर ते देहू पायी दिंडी निघाली होती. या दिंडीमध्ये जायखेडा येथील वै. कृष्णाजी माउलींच्या शिष्यांसह ९५० वारकरी सहभागी झाले होते.या घटनेची माहिती काही वारकºयांनी जायखेडा येथील मूळ रहिवासी व पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार गोसावी यांना मोबाइलद्वारे कळवताच त्यांनी तातडीने वरिष्ठ पोलीस अधिकाºयांशी संपर्क साधून पोलिसांची मदत मिळून दिली. त्यानंतर कडेकोट बंदोबस्तात दिंडी देहूकडे रवाना करण्यातआली.या प्रकरणातील गुंड फरार झाले असून, या घटनेचा सर्व स्तरातून निषेध करण्यात येत आहे. या प्रकरणी धनंजय महाजन, केशव सोनवणे, शशिकांत बच्छाव, नानाजी बच्छाव, निवृत्ती अहिरे, यशवंत गांगुर्डे, अनिल अहिरे, रवींद्र अहिरे, गंगाराम चव्हाण, भूषण बोरसे, धनंजय अहिरे, विष्णू घुले, संजय देवरे, सुनील जगताप यांच्यासह १५ वारकºयांनी पोलिसात तक्रार दिली आहे. गुंडांवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.तुकाराम बीजनिमित्त ह.भ.प. कृष्णाजी माउली यांच्या काळापासून हा पायी दिंडी सोहळा सुरू आहे. या दिंडीचे वैशिष्ट्ये म्हणजे फक्त पाचच दिवसात पंढरपूर ते देहू असे ३५० किलोमीटर अंतर पार करावे लागते. म्हणजे दिवसाला सरासरी ७० किलोमीटर अंतर पायी चालावे लागते. परंपरेप्रमाणे सदर सोहळा चालत आलेला आहे. मंगळवारी खडकी बाजार, पुणे येथे काही समाजकंटकांनी दारूच्या नशेत वारकºयांवर हल्ला केला व मारहाण केली. या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत. येथून पुढे असे प्रकार वारकरी संप्रदाय सहन करणार नाही. आरोपींना लवकरात लवकर अटक करून पोलिसांनी कडक कारवाई करावी अन्यथा महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय स्वस्थ बसणार नाही. यापुढे सदर पायी दिंडी सोहळ्यासाठी पुणे पोलिसांनी दिंडीसोबत बंदोबस्त द्यावा.- नंदकुमार गोसावी, सामाजिक कार्यकर्तेमद्यपींकडून प्रकारमंगळवारी दुपारी १ वाजता ही दिंडी खडकीतील किर्लोस्कर कंपनीजवळील ब्राउन चेरी येथे पोहोचली. त्यावेळी मद्यपान केलेल्या पाच जणांनी वारकºयांना शिवीगाळ करीत त्यांच्यावर दारूच्या बाटल्या फेकल्या व१८ ते २० वारकºयांना त्यांनी काठीने व दगडाने मारहाण करण्याचा प्रयत्न केला.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी