शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

गावठाणात आता टॅँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 1:17 AM

पावसाने दिलेली ओढ आणि धरणात कमी होत जाणारा साठा यामुळे शहरात सर्वत्र एकवेळ पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला खरा, परंतु त्यामुळे दोन वेळा पाणी मिळणाऱ्या भागावरच अन्याय झाला अन्य भागांत कपातीची झळ पोहोचलीच नाही तर गावठाण आणि झोपडपट्टी भागात चार चार दिवस पाणीपुरवठा होत नसल्याने टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची वेळ आली.

ठळक मुद्देमहापौरांचे आदेश : कपातीमुळे अनेक भागांवर अन्याय, सात तास जोरदार चर्चा

नाशिक : पावसाने दिलेली ओढ आणि धरणात कमी होत जाणारा साठा यामुळे शहरात सर्वत्र एकवेळ पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला खरा, परंतु त्यामुळे दोन वेळा पाणी मिळणाऱ्या भागावरच अन्याय झाला अन्य भागांत कपातीची झळ पोहोचलीच नाही तर गावठाण आणि झोपडपट्टी भागात चार चार दिवस पाणीपुरवठा होत नसल्याने टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची वेळ आली. अधिकाऱ्यांचे सहकार्य आणि विस्कळीत नियोजन यामुळे महापालिकेच्या महासभेत सलग सात तास वादळी चर्चा करून प्रशासनाला धारेवर धरण्यात आले, तर महापौर रंजना भानसी यांनी सर्व अभियंते आणि विभागीय अधिकाºयांना केबीनमधून बाहेर पडा आणि प्रत्यक्ष जागेवर जाऊन समस्या सोडवा, असे आदेश महापौर रंजना भानसी दिले. त्याचबरोबर गावठाणात छोट्या टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे महत्त्वाचे आदेशही त्यांनी दिले.महापालिकेची महासभा महापौर रंजना भानसी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि.१९) पार पडली. यावेळी पाणीकपातीचा महत्त्वाचा प्रस्ताव महासभेवर होता. वास्तविक, पाणीकपातीचा निर्णय अगोदरच झाला होता. त्यानंतर फेरनिर्णयदेखील झाल्यानंतरही हा प्रस्ताव महासभेवर असल्याने नगरसेवकांनी गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या कपातीमुळे कोणत्या भागावर अन्याय झाला, त्याचा पाढाच नगरसेवकांनी मांडला.नलावडे यांना धरले धारेवरपाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता संदीप नलावडे यांना नगरसेवकांनी धारेवर धरले. ते जलशुद्धीकरण केंद्रांवर जात नाही तसेच केबीनमध्ये बसून नियोजन करतात, असे आरोप करण्यात आले. महापालिका दररोज ४६० दशलक्ष लिटर्स पाणी उपसा करते त्यातील १७४ दशलक्ष लिटर्स पाण्याचे बिलिंग होत नसल्याचा धक्कादायक प्रकार नगरसेवक गुरुमित बग्गा यांनी उघड केला. त्याबाबतदेखील नलावडे समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाwater shortageपाणीटंचाई