शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
3
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
4
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
5
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
6
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
7
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
8
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
9
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
10
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
11
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
12
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
13
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
14
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
15
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
16
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
17
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
18
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
19
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
20
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाड्या-पाड्यांमध्ये पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 19:08 IST

त्र्यंबकेश्वर : तालुक्यात आज अनेक गावे, वाड्या, पाडे येथे भीषण पाणीटंचाई जाणवत असून, महिलावर्गाची पाण्यासाठी वणवण भटकंती चालू आहे. रात्री, पहाटे, तर कधी दिवसभर उन्हात पाण्यासाठी थांबावे लागते.

ठळक मुद्देमहिलांवर पायपीट करण्याची वेळ

त्र्यंबकेश्वर : तालुक्यात आज अनेक गावे, वाड्या, पाडे येथे भीषण पाणीटंचाई जाणवत असून, महिलावर्गाची पाण्यासाठी वणवण भटकंती चालू आहे. रात्री, पहाटे, तर कधी दिवसभर उन्हात पाण्यासाठी थांबावे लागते.

सोमनाथनगर, वेळे मुरंबी, मुळवड, शिरसगाव, कोटंबी, मेटघेरा किल्ला व त्याच्या सहा वाड्या, खरशेत, सावरपाडा, खैरायपाली, कास देवडोंगरा, काथवटपाडा, घोटबारी, चौरापाडा, सावरीचा माळ, बारीमाळ वळण, विनायकनगर, अशा अनेक गावांमध्ये भीषण पाणीटंचाई आहे; पण टंचाईग्रस्त गावाच्या ग्रामपंचायतींकडून अधिकृत प्रस्ताव अजूनही नसल्याने आमच्या तालुक्यात पाणीटंचाई नाही, असे सांगितले जात आहे.परिणामी, टंचाईग्रस्त असलेल्या गावांना प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात नाहीत. तथापि, त्र्यंबकेश्वर तालुक्यात आजही फिरले, तर अनेक गावांना भीषण पाणीटंचाई असल्याचे दिसून येत आहे. त्र्यंबक तालुक्यात ग्रामपंचायतींकडून अधिकृत टंचाई प्रस्तावच नसल्याने तालुक्यात सर्व काही आलबेल असल्याचे जाहीर केले जात आहे.आज त्र्यंबकेश्वर तालुक्यात हरसूल परिसरात मुरंबी, शिरसगाव, कोटंबी या गावांसह हरसूलच्या पश्चिम पट्ट्यातील खरशेत, सावरपाडा, खैरायपाली, कास देवडोंगरा, काथवटपाडा आदी गावांमध्ये भीषण पाणीटंचाई आहे. या भागातील विहिरी, नदी, नाले, झरे आदी पाण्याचे स्रोत आटल्याने या जलाशयांमध्ये शेवटचे राहिलेले दूषित पाणी भरतात आणि साथीच्या रोगांना निमंत्रण देतात. मुळवड परिसरात पाणीटंचाईमध्ये चिंच, ओहळ, पैकी, बेलीपाडा येथे १५ दिवसांपासून पाणी नाही. तरीसुद्धा ग्रामसेवक व सरपंचांनी दिवाळीपासून टाकलेल्या पाइपलाइनला अजून पाणी आलेच नाही. निदान आता तरी पाणी पाठवा, अशी तेथील ग्रामस्थांचीच नव्हे, तर मुळवड ग्रामपंचायतीचे सदस्य रघुनाथ घाटाळ यांनीही मागणी केली आहे.नुकतीच तालुक्यातील पाणीटंचाईबाबत मुळवड ग्रामपंचायतअंतर्गत वळण, घोटबारी, सावरीचा माळ, चौरापाडा, बारीमाळ या भागात गेल्या १५ दिवसांपासून विहिरींनी तळ गाठला असून, लोक पाण्यासाठी भर उन्हात वणवण भटकत आहेत. दुर्गम भागातील डोंगर उताराची जमीन असल्याने पडलेला पाऊस सरळ डोंगर उताराने पाण्याच्या स्वरूपात वाहून जाते. साठवण बंधाऱ्याअभावी पश्चिमेकडे अर्थात गुजरात राज्यात वाहून जाते.दरम्यान, या टंचाईग्रस्त गावांबरोबरच तालुक्यातील वळण, बर्ड्याची वाडी, विनायकनगर, सोमनाथनगर, शिवाजीनगर आदी भागांतील विहिरींनी तळ गाठला आहे. लोक पाण्यासाठी वणवण भटकत आहेत. तालुक्यात ग्रामीण पाणीपुरवठा योजनेच्या १० कामांचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आले होते; पण दहापैकी केवळ चारच प्रस्ताव मंजूर झाले. नेहमीप्रमाणे चारही कामे प्रगतीत असल्याचे समजते. अन्य सहा कामे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली.त्र्यंबकेश्वर तालुक्यात पाणीटंचाई यापूर्वीच बर्ड्याच्या वाडीच्या रूपाने सुरू झाली होती. अर्थात, बर्ड्याच्या वाडीचा पाणीटंचाईचा प्रश्न सुटल्यासारखा झाला आहे.प्रस्ताव फेटाळण्यासाठी नाटक!टंचाई प्रस्ताव ग्रामसेवकाने दिला. तरी व्हेरिफिकेशनच्या दौऱ्यात तो फेटाळला जातो. वास्तविक ग्रामसेवक कोण असतो? सरकारचा प्रतिनिधी! तरी ग्रामसेवकाने पाठवलेल्या प्रस्तावाची शहानिशा (व्हेरिफिकेशन) करण्यासाठी पुनश्च तहसीलदार, गटविकास अधिकारी, ल.पा. विभागाचे अभियंता आदींच्या समितीने व्हेरिफिकेशनमध्ये तीन कि.मी.दरम्यान एखादा पाण्याचा स्रोत विहीर, मग तिच्यात चार, आठ दिवस पाणी असेल तरीही टंचाई प्रस्ताव फेटाळला जातो. म्हणून त्र्यंबक तालुक्यात टंचाई नसल्याचे सांगितले जाते; परंतु प्रत्यक्षात पाणीटंचाई आजही आहे! 

टॅग्स :water shortageपाणीकपातtrimbakeshwarत्र्यंबकेश्वर