शहरं
Join us  
Trending Stories
1
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
2
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
3
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
4
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
5
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
6
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
7
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
8
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
9
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
10
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
11
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
12
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
13
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
14
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
15
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
16
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
17
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
18
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
19
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
20
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट

त्र्यंबक तालुक्यात पाणीटंचाईची धग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2021 7:00 PM

त्र्यंबकेश्वर : उन्हाळ्याची तीव्रता जाणवायला लागताच तालुक्यातील पाण्याचे स्रोत आटू लागले असून, त्यामुळे काही गावांना पाणी टंचाईची झळ आतापासूनच लागायला सुरुवात झाली आहे. मूळवड ग्रामपंचायत अंतर्गत वळण, घोटबारी, सावरीचा माळ, चौरापाडा, बारीमाळ या भागात विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

ठळक मुद्देविहिरींनी गाठला तळ : पाण्यासाठी महिलांची भटकंती

त्र्यंबकेश्वर : उन्हाळ्याची तीव्रता जाणवायला लागताच तालुक्यातील पाण्याचे स्रोत आटू लागले असून, त्यामुळे काही गावांना पाणी टंचाईची झळ आतापासूनच लागायला सुरुवात झाली आहे. मूळवड ग्रामपंचायत अंतर्गत वळण, घोटबारी, सावरीचा माळ, चौरापाडा, बारीमाळ या भागात विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.मागील वर्षी त्र्यंबकेश्वरला १४२३.८ मि. मी. पाऊस पडला होता. पावसाचे शेकडा प्रमाण ७५.३६ टक्के होते; मात्र यावर्षी मार्चच्या पहिल्याच आठवड्यात पाणी टंचाईची धग जाणवायला सुरुवात झाली आहे. या पाणीटंचाईसंदर्भात मुळवडचे ग्रामपंचायत सदस्य रघुनाथ घाटाळ, सरपंच चंचला बळीराम बांगाड यांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांसह पंचायत समिती सभापतींकडे कैफीयत मांडली; पण प्रशासनाकडून अद्याप काहीही उपाय योजना झालेली नाही. प्रशासनाने लवकरात लवकर उपाययोजना न केल्यास हंडामोर्चा काढण्याचा इशारा घाटाळ यांनी दिला आहे. टंचाईग्रस्त गावांबरोबरच तालुक्यातील वळण, बर्ड्याची वाडी, विनायक नगर, सोमनाथ नगर, शिवाजीनगर आदी भागातीलही विहिरी आटू लागल्या आहेत. तालुक्यात ग्रामीण पाणी पुरवठा योजनेच्या १० कामांचे प्रस्ताव प्रशासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आले होते. दहापैकी केवळ चारच प्रस्तावांना मंजुरी मिळाली. अन्य सहा कामे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहेत. बर्ड्याच्या वाडीच्या पाणी प्रश्नाची तर सर्वत्र चर्चा झाली; परंतु तेथीलही पाणी टंचाईचा प्रश्न पूर्णपणे सुटू शकलेला नाही.पडताळणीत वेळकाढूपणापाणीटंचाईच्या काळात टँकरची मागणी होऊनही प्रशासनाकडून त्याबाबत दुर्लक्ष केले जाते. तालुक्यातील बऱ्याच गावांमध्ये सेवाभावी संस्थांच्यावतीने पाणीटंचाईबाबत उपाययोजना केल्या जात असतात. त्यामुळे प्रशासनाकडूनही या सेवाभावी संस्थांची प्रतीक्षा केली जात असते. प्रशासनाकडे स्थानिक स्तरावरून टंचाई प्रस्ताव पाठविले जात असले तरी त्याच्या पडताळणी प्रक्रियेतच वेळकाढूपणा केला जात असतो. त्यामुळे लालफीतीच्या कारभाराचा अनुभव येत असतो.(०१ विहिरी)

टॅग्स :Waterपाणीtrimbakeshwarत्र्यंबकेश्वर