शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

कपातीमुळे अवघी ५ टक्केच पाणी बचत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 11:20 PM

महापालिकेने शहरात गेल्या ३० जूनपासून केलेल्या पाणीकपातीमुळे ७५ दशलक्ष घनफूट पाणी वाचल्याचा दावा प्रशासनाने केला असला तरी ही कपात अवघी ५ टक्केच झाली होती. त्यातून गावठाण भागात दोन वेळ ऐवजी एकवेळ पाणीपुरवठा करून असून, उच्चभ्रू भागात मात्र कोणतीही कपात करण्यात आली नाही, असा आरोप नगरसेवक गुरुमित बग्गा यांनी केला आहे.

ठळक मुद्देबग्गा यांचा दावा : गावठाणाला वेठीस धरले

नाशिक : महापालिकेने शहरात गेल्या ३० जूनपासून केलेल्या पाणीकपातीमुळे ७५ दशलक्ष घनफूट पाणी वाचल्याचा दावा प्रशासनाने केला असला तरी ही कपात अवघी ५ टक्केच झाली होती. त्यातून गावठाण भागात दोन वेळ ऐवजी एकवेळ पाणीपुरवठा करून असून, उच्चभ्रू भागात मात्र कोणतीही कपात करण्यात आली नाही, असा आरोप नगरसेवक गुरुमित बग्गा यांनी केला आहे.गंगापूर धरणात पुरेसा साठा नाही, त्यातच पाणलोट क्षेत्रात पावसाने दडी मारल्याने शहरावर पाणी संकट गहिरे होत असल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे महापालिकेने शहरात पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ज्या चार विभागांत दोनवेळा पाणीपुरवठा होतो तेथे एकवेळ पाणीपुरवठा होईल. त्याचप्रमाणे दर गुरुवारी संपूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान, या निर्णयाला पंधरा दिवस उलटत नाही तोच दर गुरुवारी कोरडा दिवस म्हणजेच ड्राय डे मागे घेऊन नियमितपणे पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेषत: गंगापूर धरणातील साठा ५४ टक्क्यांवर गेल्याने गेल्या सोमवारी (दि.१५) दर गुरुवारची पाणीकपात मागे घेण्यात आली आहे. परंतु,ज्या भागांमध्ये दोनवेळ पाणीपुरवठा केला जातो, त्या ठिकाणी एकवेळ पाणीपुरवठा कायम ठेवला आहे. तथापि, महापालिकेने पंधरा दिवसांत ७५ दशलक्षघनफूट पाणी वाचल्याचा दावा केला असला तरी बग्गा यांनी तो फोल ठरविला आहे. ३० जून ते १३ जुलै दरम्यान प्रशासनाने ५२५४ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला आहे. महापलिकेने दररोजचा उपसा कायम ठेवला असता तर रोज ४६० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा या हिशेबाने १४ दिवसात शहराला ६४४० दशलक्ष दशलक्ष घनफूट पाणीपुरवठा करावा लागला असता.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाWaterपाणी