शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
6
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
7
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
8
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
9
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
10
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
11
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
12
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
13
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
14
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
15
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
16
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
17
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
18
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
19
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
20
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी

पाणी आरक्षण ‘जैसे थे’ : पाणीपुरवठ्याचे करावे लागणार सूक्ष्म नियोजनमहापालिकेची पंचाईत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 1:07 AM

नाशिक : जलसंपदा विभागाने महापालिकेसाठी चालू वर्षी गंगापूर आणि दारणा धरणातील ४३०० दलघफू पाणी आरक्षण यंदाही ‘जैसे थे’च ठेवल्याने पालिका प्रशासनाची पंचाईत झाली असून, गंगापूर धरणातून किमान १०० दलघफू पाणी आरक्षण वाढवून मिळण्याची अपेक्षा फोल ठरली आहे. त्यामुळे, महापालिका पाणीपुरवठ्याचे सूक्ष्म नियोजन करणार असून, यंदाही पाण्याचा काठोकाठ वापर करावा लागणार आहे.

ठळक मुद्देगंगापूर आणि दारणा धरणातील ४३०० दलघफू पाणी आरक्षण यंदाही ‘जैसे थे’च ठेवल्याने पालिका प्रशासनाची पंचाईत गंगापूर धरणातून किमान १०० दलघफू पाणी आरक्षण वाढवून मिळण्याची अपेक्षा फोल

नाशिक : जलसंपदा विभागाने महापालिकेसाठी चालू वर्षी गंगापूर आणि दारणा धरणातील ४३०० दलघफू पाणी आरक्षण यंदाही ‘जैसे थे’च ठेवल्याने पालिका प्रशासनाची पंचाईत झाली असून, गंगापूर धरणातून किमान १०० दलघफू पाणी आरक्षण वाढवून मिळण्याची अपेक्षा फोल ठरली आहे. त्यामुळे, महापालिका पाणीपुरवठ्याचे सूक्ष्म नियोजन करणार असून, यंदाही पाण्याचा काठोकाठ वापर करावा लागणार आहे.महापालिकेने सन २०१७-१८ या वर्षाकरिता ४६०० दलघफू पाणी आरक्षणाची मागणी जलसंपदा विभागाकडे केली होती. त्यातील ४,३०० दलघफू गंगापूर धरणातून, तर ३०० दलघफू दारणा धरणातून आरक्षण मिळावे, असा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आला होता. महापालिकेला सन २०१६-१७ या वर्षाकरिता गंगापूर धरणातून ३९०० दलघफू, तर दारणातून ४०० दलघफू पाणी आरक्षण देण्यात आले होते. मात्र, महापालिकेने वर्षभरात गंगापूर धरणातून ३९५० दलघफू, तर दारणातून ३०२ दलघफू पाण्याची उचल केली होती. दारणा धरणातील पाण्याची उचल करताना तांत्रिकदृष्ट्या अडचणी येत असल्याने महापालिकेने ४०० ऐवजी ३०० दलघफू पाण्याची मागणी नोंदवली होती. त्याऐवजी गंगापूर धरणातून पाण्याचे आरक्षण वाढवून देण्याची मागणी केली होती. शहराचा वाढता विस्तार, नवनवीन वसाहतीतून पाण्याची वाढणारी मागणी तसेच यंदाचे वर्ष श्री साईबाबांच्या जन्मशताब्दीचे वर्ष असल्याने शिर्डीला येणाºया भाविकांचा नाशिकवर पडणारा ताण लक्षात घेऊन वाढीव पाणी आरक्षणाची मागणी करण्यात आली होती. परंतु, जलसंपदा विभागाने महापालिकेची मागणी धुडकावून लावत मागील वर्षाप्रमाणेच गंगापूर धरणातून ३९०० दलघफू, तर दारणातून ४०० दलघफू पाणी आरक्षण मंजूर केले. त्यामुळे वाढीव पाणी आरक्षणाची अपेक्षा फोल ठरल्याने महापालिकेची पंचाईत झाली आहे.परिणामी, महापालिकेला यंदाही आरक्षित पाण्याचा काठोकाठ वापर करणे अपरिहार्य ठरणार आहे. सर्वसाधारणपणे, मे-जून महिन्यात पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे.एकलहरेच्या पाण्याची अपेक्षागंगापूर आणि दारणा धरणातील पाणी आरक्षण निश्चित करताना एकलहरे औष्णिक विद्युत केंद्रासाठी ७०० दलघफू पाण्याचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. सन २०१५-१६ मध्ये शहरात पाण्याची भीषण परिस्थिती उद्भवल्यानंतर जलसंपदा विभागाने एकलहरेसाठी आरक्षित पाण्यातील २०० दलघफू पाणी महापालिकेला दिले होते. जून-जुलै २०१८ मध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाल्यास महापालिकेला पुन्हा एकलहरेच्या पाण्याचा आधार मिळू शकतो. त्यामुळे, महापालिका या पाण्याबाबतही अपेक्षा ठेवून आहे.