शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
2
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
3
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
4
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
5
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
6
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
7
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
8
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
9
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
10
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
11
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
12
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
13
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
14
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
15
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
16
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
17
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
18
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
19
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
20
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ

पाण्याचे स्रोत शुद्धिकरणाचे काम युद्धपातळीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 12:12 AM

सिन्नर : ग्रामस्थांचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी त्यांना शुद्ध पाणी देणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व ग्रामपंचायतींनी शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा, असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानुसार सिन्नर तालुक्यातील जलकुंभ, पाण्याच्या टाक्या व पाण्याचे स्रोत शुद्धिकरण करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांनी दिली.

ठळक मुद्देसिन्नरला पालिकेतर्फे अभियान पावसाळ्यात साथीचे आजार रोखण्यासाठी उपाययोजना

सिन्नर : ग्रामस्थांचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी त्यांना शुद्ध पाणी देणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व ग्रामपंचायतींनी शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा, असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानुसार सिन्नर तालुक्यातील जलकुंभ, पाण्याच्या टाक्या व पाण्याचे स्रोत शुद्धिकरण करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांनी दिली.पावसाळ्यात ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिले होते. त्यानुसार बुधवारपासून (दि. २०) तालुक्यातील ग्रामपंचायत, अंगणवाडी, शाळा या ठिकाणच्या पिण्याच्या पाण्याचे जलकुंभ टाकी स्वच्छता व हातपंप शुद्धिकरण अभियान राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध व सुरक्षित पाण्याचा पुरवठा आणि जलजन्य आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने हे अभियान राबविण्यात येत आहे. यामुळे गावाला शुद्ध पिण्याचा पाण्याचा पुरवठा मिळण्यास मदत होईल.दरम्यान, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधिन शेळकंदे यांनी पावसाळ्यात नियमित शुद्धिकरण करून जनतेस निर्जंतुक पाणीपुरवठा करण्याबाबत तालुका व ग्रामपंचायत यंत्रणेला निर्देश दिले असून, पावसाळ्यात एकही गावात पिण्याच्या पाण्यामुळे साथ उद्भवू नये यासाठी उपाययोजना करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.यावेळी गटविकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, शाखा अभियंता, सरपंच, जिल्हा पाणी गुणवता निरीक्षक, विस्तार अधिकारी, उपविभागीय पाणी गुणवत्ता सल्लागार, गटसमन्वयक, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, आरोग्यसेवक, आरोग्य सहाय्यक, जल सुरक्षारक्षक व ग्रामपंचायत कर्मचारी आदी उपस्थित होते.४५ पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची स्वच्छताबुधवारी तालुक्यातील दातली, चिंचोली, मोह, खडांगळी, सोनांबे, मुसळगाव, कारवाडी, देशवंडी, गुरेवाडी, नांदूरशिंगोटे, रामनगर, वडझिरे, भरतपूर, खंबाळे आदींसह ४० ते ४५ ग्रामपंचायतींमध्ये पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता करण्यात आली आहे. ज्या स्रोताचे पाणी पिण्यास वापरले जाते त्याचे तसेच हातपंपाचे शुद्धिकरण करण्यात आले. त्यावर शुद्धिकरण करणाची तारीख नमूद करण्यात आली आहे.