शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
2
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
3
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
4
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
5
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
6
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
7
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
8
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
9
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
10
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
11
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
12
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
13
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
14
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
15
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
16
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
17
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
18
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
19
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
20
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात

नाशिक जिल्ह्यातील पाणी गुजरातला जाऊ देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 1:38 AM

नाशिक जिल्ह्यातील पाणी गुजरातमध्ये पळविण्याचा घाट घातला जात असून यामुळे येथील पाण्याचा हक्क कायमचा जाणार आहे. नाशिक जिल्ह्यातील पाण्याचा एक थेंब सुद्धा गुजरातमध्ये जाऊ देणार नाही. यासाठी प्रसंगी लढा द्यावा लागला तरी चालेल असा इशारा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दिला.

ठळक मुद्देछगन भुजबळ : मनमाड येथील संपर्क यात्रेत धनराज महाले यांचा कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

मनमाड : नाशिक जिल्ह्यातील पाणी गुजरातमध्ये पळविण्याचा घाट घातला जात असून यामुळे येथील पाण्याचा हक्क कायमचा जाणार आहे. नाशिक जिल्ह्यातील पाण्याचा एक थेंब सुद्धा गुजरातमध्ये जाऊ देणार नाही. यासाठी प्रसंगी लढा द्यावा लागला तरी चालेल असा इशारा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दिला.राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘निर्धार परिवर्तनाचा’ या मनमाड येथे आलेल्या संपर्क यात्रेत ते बोलत होते.माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सराकारच्या कारभारावर सडकून टीका केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असलेले नेते दिल्लीमधे नसल्याने शेतकºयांवर आत्महत्येची वेळ आली असल्याचे पवार यांनी सांगितले.याप्रसंगी झालेल्या सभेच्या व्यासपीठावर माजी मंत्री फौजिया खान, आमदार जितेंद्र आव्हाड, पंकज भुजबळ, महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, ओबीसी प्रदेशाध्यक्ष इश्वर बालबुद्धे, माजी खासदार समीर भुजबळ, रवींद्र पगार, श्रीराम शेटे, संजय चव्हाण, भारती पवार, प्रेरणा बलकवडे, राजेंद्र पगारे, साहेबराव पाटील आदी उपस्थित होते.याप्रसंगी दिंडोरीचे माजी आमदार धनराज महाले यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह अजित पवारछगन भुजबळ यांच्या उपस्थितीत राष्टÑवादी कॉँग्रेसमधे प्रवेश केला. कुठल्याही लाभाची अपेक्षा न करता राष्टÑवादीचा कार्यकर्ता म्हणून काम करण्यासाठी पक्षप्रवेश केला असल्याचे महाले यांनी यावेळी सांगितले. सूत्रसंचालन जयंत जाधव यांनी केले.देशातील प्रश्नांवरच चर्चाया निर्धार परिवर्तनाचा संपर्क यात्रेनिमित्त येथे झालेल्या जाहीर सभेमध्ये विविध वक्त्यांची भाषणे झाली; मात्र या भाषणांमध्ये सर्वच नेत्यांनी स्थानिक वा राज्याच्या प्रश्नांवर बोलण्यापेक्षा केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारची धोरणे यावरच टीकेची झोड उठविली. या सभेप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यापूर्वीच्या भाषणांची व्हिडीओ क्लिप दाखवून त्यांचा खोटेपणा दाखवून दिला गेला.शरद पवार यांना दिल्लीमधे ताकद देण्यासाठी आपण सर्वांनी खंबीरपणे राष्टÑवादी कॉंग्रेसच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन अजित पवार यांनी केले.सध्या सरकारकडून रोज नवीन नवीन घोषणा करण्यात येत असून निवडणुकीच्या तोंडावर सुरू असलेल्या घोषणा म्हणजे जनतेची शुध्द फसवणूक असल्याचा आरोप छगन भुजबळ यांनी केला. कार्यक्रमाचे

टॅग्स :NashikनाशिकPoliticsराजकारणChhagan Bhujbalछगन भुजबळAjit Pawarअजित पवार