शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

नाशिक जिल्ह्यातील पाणी गुजरातला जाऊ देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 01:38 IST

नाशिक जिल्ह्यातील पाणी गुजरातमध्ये पळविण्याचा घाट घातला जात असून यामुळे येथील पाण्याचा हक्क कायमचा जाणार आहे. नाशिक जिल्ह्यातील पाण्याचा एक थेंब सुद्धा गुजरातमध्ये जाऊ देणार नाही. यासाठी प्रसंगी लढा द्यावा लागला तरी चालेल असा इशारा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दिला.

ठळक मुद्देछगन भुजबळ : मनमाड येथील संपर्क यात्रेत धनराज महाले यांचा कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

मनमाड : नाशिक जिल्ह्यातील पाणी गुजरातमध्ये पळविण्याचा घाट घातला जात असून यामुळे येथील पाण्याचा हक्क कायमचा जाणार आहे. नाशिक जिल्ह्यातील पाण्याचा एक थेंब सुद्धा गुजरातमध्ये जाऊ देणार नाही. यासाठी प्रसंगी लढा द्यावा लागला तरी चालेल असा इशारा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दिला.राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘निर्धार परिवर्तनाचा’ या मनमाड येथे आलेल्या संपर्क यात्रेत ते बोलत होते.माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सराकारच्या कारभारावर सडकून टीका केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असलेले नेते दिल्लीमधे नसल्याने शेतकºयांवर आत्महत्येची वेळ आली असल्याचे पवार यांनी सांगितले.याप्रसंगी झालेल्या सभेच्या व्यासपीठावर माजी मंत्री फौजिया खान, आमदार जितेंद्र आव्हाड, पंकज भुजबळ, महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, ओबीसी प्रदेशाध्यक्ष इश्वर बालबुद्धे, माजी खासदार समीर भुजबळ, रवींद्र पगार, श्रीराम शेटे, संजय चव्हाण, भारती पवार, प्रेरणा बलकवडे, राजेंद्र पगारे, साहेबराव पाटील आदी उपस्थित होते.याप्रसंगी दिंडोरीचे माजी आमदार धनराज महाले यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह अजित पवारछगन भुजबळ यांच्या उपस्थितीत राष्टÑवादी कॉँग्रेसमधे प्रवेश केला. कुठल्याही लाभाची अपेक्षा न करता राष्टÑवादीचा कार्यकर्ता म्हणून काम करण्यासाठी पक्षप्रवेश केला असल्याचे महाले यांनी यावेळी सांगितले. सूत्रसंचालन जयंत जाधव यांनी केले.देशातील प्रश्नांवरच चर्चाया निर्धार परिवर्तनाचा संपर्क यात्रेनिमित्त येथे झालेल्या जाहीर सभेमध्ये विविध वक्त्यांची भाषणे झाली; मात्र या भाषणांमध्ये सर्वच नेत्यांनी स्थानिक वा राज्याच्या प्रश्नांवर बोलण्यापेक्षा केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारची धोरणे यावरच टीकेची झोड उठविली. या सभेप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यापूर्वीच्या भाषणांची व्हिडीओ क्लिप दाखवून त्यांचा खोटेपणा दाखवून दिला गेला.शरद पवार यांना दिल्लीमधे ताकद देण्यासाठी आपण सर्वांनी खंबीरपणे राष्टÑवादी कॉंग्रेसच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन अजित पवार यांनी केले.सध्या सरकारकडून रोज नवीन नवीन घोषणा करण्यात येत असून निवडणुकीच्या तोंडावर सुरू असलेल्या घोषणा म्हणजे जनतेची शुध्द फसवणूक असल्याचा आरोप छगन भुजबळ यांनी केला. कार्यक्रमाचे

टॅग्स :NashikनाशिकPoliticsराजकारणChhagan Bhujbalछगन भुजबळAjit Pawarअजित पवार