शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

खर्डा परिसरात पाण्याचा गंभीर प्रश्न

By admin | Updated: June 5, 2014 01:56 IST

खर्डा परिसरात पाण्याचा गंभीर प्रश्न

 

देवळा : तालुक्यातील खर्डा व परिसरातील शेती व्यवसाय गत चार वर्षांपासून अत्यल्प पर्जन्यमानामुळे मोडीत निघाला आहे. या भागातील पाणीप्रश्न गंभीर झाल्याने शेतकरी पाण्यासाठी इतर पर्याय शोधत आहेत. चणकापूर उजव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात येणार्‍या व खर्डा गावाला लागून असलेल्या वाजगाव येथे विहिरीसाठी जागा घेण्यासाठी खर्डा गावातील शेतकर्‍यांमध्ये चढाओढ सुरू झाली असून, अव्वाच्या सव्वा किंमत देऊन विहिरीसाठी जागा खरेदी केली जात आहे. यामुळे वाजगाव परिसरात मोठ्या प्रमाणात नवीन विहिरींचे खोदकाम सुरू आहे. वाजगाव येथील ग्रामस्थांनी गावातील पाणी बाहेरगावी जाऊ द्यावयाचे नाही, असा ठराव ग्रामसभेत काही वर्षांपूर्वी केला होता. त्याप्रमाणे ग्रामस्थांनी बाहेरगावी जाणारे सर्व पाणी बंद केले होते. यासाठी सर्व गावाने एकजूट दाखविली होती. दरम्यान संबंधित देवळा व खर्डा येथील काही विहीरमालक न्यायालयात गेले होते. त्यावेळी न्यायालयाने शेतकर्‍यांचे नुकसान होऊ नये यासाठी वाजगाव येथे बाहेरगावच्या विहिरी न्यायालयात अंतिम निकाल लागेपर्यंत सुरू करून त्या शेतकर्‍यांना दिलासा दिला होता. यानंतर या बंद असलेल्या विहिरी पूर्ववत सुरू झाल्या. न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे गावातील ग्रामस्थांनी विरोध केला नाही. यामुळे वाजगाव येथील पाणी पाइपलाइनद्वारे देवळा व खर्डा येथे जाऊ लागले. बाहेरगावी पाणी जाऊ देण्याबाबत वाजगाव येथील निर्बंध हटल्याने खर्डा येथील शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या. हे शेतकरी वाजगाव येथील कालव्या लगतच्या परिसरात असलेल्या शेतकर्‍यांकडे विहिरीसाठी जागा शोधू लागले. यामुळे येथे जमिनीचे भाव एकदम कडाडले.