शहरं
Join us  
Trending Stories
1
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
2
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
3
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
4
हाकेंचा बीपी वाढला; लेखी आश्वासन शिवाय उपचार नाही - लक्ष्मण हाके 
5
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
6
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण
7
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
8
"...तर चंद्राबाबू नायडूंना पाठिंबा देऊ"; लोकसभा अध्यक्षपदाबाबत संजय राऊतांचे विधान
9
'चंदू चॅम्पियन'मध्ये पोलिस इन्स्पेक्टरच्या भुमिकेत श्रेयस तळपदे, कार्तिक आर्यनचं कौतुक करत म्हणाला...
10
Rishabh Pant : मोठ्या मनाचा रिषभ पंत! 'ती' सर्व कमाई दान करणार; चाहत्यांना दिले वचन
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना इच्छापूर्ती, व्यवसायात लाभ; नवीन नोकरीची ऑफर, मौज-मजेचा काळ!
12
सारांश : विकासाचे मार्ग आता प्रशस्त होण्याची अपेक्षा!
13
"आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, सेंच्युरी मारा"; मुख्यमंत्री शिंदेंचा अण्णा हजारेंना थेट Video Call
14
लेकींचं लग्न पाहण्याची शेवटची इच्छा; ICU त असलेल्या 'बाप' माणसासमोर विवाहसोहळा
15
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
16
शाहरुखच्या शिक्षकांची प्रकृती चिंताजनक, किंग खानजवळ व्यक्त केली 'ही' शेवटची इच्छा
17
"पाकिस्तानी खेळाडूंना वाटते की...", वसीम अक्रम संतापला; PCB कडे केली मोठी मागणी
18
तलाठी परीक्षा घोटाळ्याचा मास्टर माईंड जेरबंद; नऊ महिन्यांपासून देत होता गुंगारा
19
ऑस्ट्रेलियाला घाम फोडणारा स्कॉटलंड; पराभव होताच कर्णधार भावूक, मार्शकडून कौतुक
20
"झुंड में तो कुत्ते आते है...", राणे-सामंत यांच्यातील फलक युद्धाचे लोण रत्नागिरीपर्यंत

पाण्यासाठी भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 11:11 PM

राजापूर : परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून, येथील वाड्यावस्तींवर पाणी नसल्याने शेतकरी पिण्याच्या पाण्याच्या शोधात उन्हातान्हात भटकंती करत आहेत. राजापूर गाव तालुक्याच्या सर्वात उंच डोंगरावर असल्याने येथे निसर्गाची कृपा झाली तरच पाण्याचा प्रश्न सुटतो. पाऊस कमी झाला तर गावाला जानेवारी-पासूनच पाणीटंचाई जाणवू लागते. राजापूर गावाला नांदगाव तालुक्यातील लोहशिंगवे येथून पाणीपुरवठा केला जातो.

ठळक मुद्देयेवला : टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची तालुकावासीयांची मागणीअजूनपर्यंत टँकर सुरू झालेले नाहीत.

राजापूर : परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून, येथील वाड्यावस्तींवर पाणी नसल्याने शेतकरी पिण्याच्या पाण्याच्या शोधात उन्हातान्हात भटकंती करत आहेत. राजापूर गाव तालुक्याच्या सर्वात उंच डोंगरावर असल्याने येथे निसर्गाची कृपा झाली तरच पाण्याचा प्रश्न सुटतो. पाऊस कमी झाला तर गावाला जानेवारी-पासूनच पाणीटंचाई जाणवू लागते. राजापूर गावाला नांदगाव तालुक्यातील लोहशिंगवे येथून पाणीपुरवठा केला जातो. राजापूर येथील अलगट वस्ती, सानप वस्ती, वाघ वस्ती, भैरवनाथवाडी, हवालदार वस्ती या वाड्यावस्तीवर पाण्याचा प्रश्न हा गंभीर झाला आहे. राजापूर येथील वडपाटी पाझर तलाव हा काही वर्षांपूर्वी फुटला होता.राजापूर येथील ग्रामस्थांनी व नरेंद्र दराडे यांनी मदत केल्याने वडपाटी पाझर तलावात आजही पाणी आहे. ग्रामपंचायतीने वडपाटी येथे पाणीपुरवठा योजना राबवून राजापूरचा पाणीप्रश्न सोडवावा, अशी मागणी होत आहे. राजापूर व वाड्यावस्त्यांवर त्वरित टॅँकर सुरू करावा, अशी मागणी शंकराव अलगट, समाधान चव्हाण, भाऊसाहेब बैरागी, गोकुळ वाघ, लक्ष्मण घुगे, रवींद्र अलगट, सुभाष अलगट, सागर अलगट, प्रशांत वाघ आदींनी केली आहे.टँकरचे प्रस्ताव : अडकले लालफितीतयावर्षी पाऊस कमी झाल्याने लोहशिंगवे येथील विहीर व बोअरवेल आटल्याने राजापूर गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गरिबांना कामे नसल्यामुळे गरिबांच्या नशिबी पाणीटंचाई ही दरवर्षी पाचवीला पूजलेली आहे. राजापूर ग्रामपंचायतीने टँकरसाठी प्रशासनाकडे प्रस्ताव पाठविले आहे. मात्र अजूनपर्यंत टँकर सुरू झालेले नाहीत.