शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
2
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
3
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
4
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
5
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
6
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
7
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
8
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
9
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
10
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
11
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
12
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
13
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
14
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
15
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
16
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
17
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
18
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
19
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
20
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन

नाशिक जिल्ह्यातअवकाळी पावसाच्या पंचनाम्यासाठी आदेशाची प्रतिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 3:00 PM

जिल्ह्यातील सुमारे ६६२ गावांमधील २५ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. दोन दिवस उशिराने शाासनाने महसूल व कृषी खात्याला पीक पंचनामे करण्याचे आदेश दिले. महिना उलटला असला तरी, कृषी खात्याकडून अद्याप अंतीम नुकसानीची माहिती शासनाकडे पोहोचू शकली नाही,

ठळक मुद्देआॅक्टोबर महिन्याची नाही नुकसान भरपाई : त्यात पुन्हा नुकसानीची भरसर्वच तालुक्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात अवकाळी पावसाने झोडपून काढल्यामुळे द्राक्ष बागा संकटात

नाशिक : आॅक्टोबर महिन्यात झोडपून काढलेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील सुमारे ५० हजार शेतक-यांना शासनाकडून भरपाई मिळण्याची प्रतिक्षा कायम असताना गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात सर्व दूर बसरणाºया पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करायचे किंवा नाही याबाबत शासन पातळीवर अद्याप कोणतेही आदेश प्राप्त न झाल्याने नुकसान झालेले शेतकरी गर्भगळीत झाले आहेत.नाशिक जिल्ह्यात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून मान्सूनपूर्व व मान्सूनच्या पावसाने लावलेली हजेरी तब्बल चार महिने कायम होती. जिल्ह्याच्या एकूण सरासरीच्या तुलनेत यंदा १२५ टक्के पाऊस झाला आहे. सप्टेंबर महिन्यांपर्यंत खरीप हंगामासाठी या पावसाची शेतक-यांना गरज असल्याने त्याचा पिकांच्या वाढीवर चांगला परिणाम झाला असला तरी, पावसाचा जोर आॅक्टोबर महिन्यात कायम राहिला. वादळी वारा, विजेचा कडकडाट व तुफान कोसळलेल्या या पावसाने शेती पिकांची अक्षरश: धुळधाण उडविली. त्यात भात, नागली, वरई, बाजारी, भुईमूग, उडीद, खुरसणी, सोयाबीन, मका या जिरायती क्षेत्रातील पिकांची, तर बागायती क्षेत्रातील द्राक्ष, कांदा, ऊस व भाजीपाला ही पिके नष्ट झाली. जिल्ह्यातील सुमारे ६६२ गावांमधील २५ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. दोन दिवस उशिराने शाासनाने महसूल व कृषी खात्याला पीक पंचनामे करण्याचे आदेश दिले. महिना उलटला असला तरी, कृषी खात्याकडून अद्याप अंतीम नुकसानीची माहिती शासनाकडे पोहोचू शकली नाही, परिणामी शासनाकडून आॅक्टोंबर महिन्यात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकºयांना अद्यापही दिलासा दिलेला नाही. जवळपास ५० हजार शेतकरी शासनाच्या मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. असे असताना गेल्या तीन ते चार दिवसांपासून वातावरणातील बदल रब्बी पिकांवर प्रतिकूल परिणाम करू लागले आहे. अशातच मंगळवारी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात अवकाळी पावसाने झोडपून काढल्यामुळे द्राक्ष बागा संकटात सापडल्या तर शेतात काढून ठेवलेला मका व बाजरीचे नुकसान झाले आहे. येत्या दोन ते तीन दिवस हवामान खराब राहणार असल्याचे हवामान खात्याने सांगितल्यामुळे शेतकºयांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. अशा परिस्थितीत पावसामुळे झालेल्या नुकसानीचे शासनाने पंचनामे करावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात असताना शासन पातळीवर तसे कोणतेही आदेश अद्याप देण्यात आलेले नसल्याने यंत्रणा हातावर हात धरून बसली आहे.

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिक