शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
3
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
5
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
6
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
7
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
8
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
9
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
10
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
11
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
12
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
13
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
14
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
15
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
16
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
17
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
18
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
19
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
20
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'

वडाळागाववासीयांना  शहर बससेवेची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 1:20 AM

वडाळागाववासीयांची शहर बससेवेची प्रतीक्षा अद्याप कायम आहे. बससेवेची गैरसोय केव्हा थांबणार? असा प्रश्न आहे. बससेवा सुरू करण्याची मागणी अद्यापही धूळखात पडून असल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे

इंदिरानगर : वडाळागाववासीयांची शहर बससेवेची प्रतीक्षा अद्याप कायम आहे. बससेवेची गैरसोय केव्हा थांबणार? असा प्रश्न आहे. बससेवा सुरू करण्याची मागणी अद्यापही धूळखात पडून असल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे तातडीने शहर वाहतूक विभागाने बससेवा सुरू करावी, अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे .वडाळागाव शेतकरी आणि कामगारवस्ती म्हणून ओळखली जाते. सुमारे बारा हजार लोकांची लोकवस्ती असून, यामध्ये सुमारे ६० टक्के हातावर काम करण्याची वस्ती आहे. मेहबूबनगर, अण्णा भाऊ साठेनगर, जनितनगर, पिंगुळी बाग यांसह परिसरात हातावर काम करणारे बहुतेक नागरिक वास्तव्य करतात. प्रवासी कामासाठी शहरात ये-जा करण्यासाठी आणि गावातील शेकडोच्या संख्येने असलेले विद्यार्थ्यांना शहरात शिक्षण घेण्यासाठी बससेवेची आवश्यकता आहे.परंतु सुमारे वीस वर्षांपासून अद्याप गावात बससेवा सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे विद्यार्थी वर्ग आणि गावातील नागरिकांना शहरात बससेवेअभावी रिक्षाने जीवघेणा प्रवास करावा लागतो. रिक्षांमध्ये पाठीमागच्या सीटमध्ये सहा ते सात प्रवासी आणि चालकाशेजारी तीन ते चार प्रवासी असतात तातडीने शहर वाहतूक विभागाने बससेवा सुरू करावी, अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.नागरिकांना त्रासशहर वाहतूक बससेवेची ‘जेथे लोकवस्ती आणि रस्ते तेथे बससेवा’ हे ब्रिदवाक्य फक्त नावालाच दिसून येत आहे .गावातील लोकांना बस फक्त मतदानाच्या दिवशी निवडणूक कर्मचारी आणि मतपेट्या ने-आण करताना दिसून येते.बससेवाभावी विद्यार्थी वर्ग आणि नागरिकांना आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. बससेवेच्या प्रतीक्षा केव्हा संपणार? असा प्रश्न आहे.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ