शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

वाडीव-हेजवळ भोजन : ‘शिदोरी’वरच मोर्चेकरी बळीराजाने काढला दिवस अन् रात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 14:46 IST

सत्ताधारी पक्षाच्या वतीने किंवा सत्ताधारी पक्षाची सत्ता असलेल्या नाशिक महापालिका प्रशासनाकडूनदेखील कुठल्याहीप्रकारची न्याहारी अथवा भोजनाची व्यवस्था या मोर्चेकरी शेतक-यांसाठी करण्यात आलेली नव्हती. केवळ एक पिण्याचा पाण्याचा टॅँकर महामार्ग बसस्थानकावर

ठळक मुद्देकेवळ एक पिण्याचा पाण्याचा टॅँकर

नाशिक : आपल्या न्याय हक्कासाठी राज्यातील शेतकरी आदिवासी कष्टकरी पुन्हा रस्त्यावर उतरला आहे. बुधवारी राज्यातील विविध जिल्ह्यांमधून दाखल झालेल्या शेतकऱ्यांनी सोबत दोन वेळ नव्हे तर दोन दिवस पुरेल अशी शिदोरी बांधून आणली होती. या शिदोरीच्या आधारे मोर्चेकरी ज्येष्ठ पुरूष महिलांनी बुधवारचा दिवस अन् रात्र नाशिकच्या महामार्ग बसस्थानकात काढली. मागण्यांसंदर्भात कुठलाही तोडगा न निघाल्यामुळे अखेर गुरूवारी सकाळी मोर्चेक-यांनी बसस्थानकाचे आवार न्याहारी न करताच सोडले.

वर्षभरापुर्वी सरकारकडे मांडलेल्या विविध समस्या आणि मागण्यांचे गा-हाणे सरकारने केवळ एका कानाद्वारे ऐकून दुस-या कानाने सोडून दिल्याने पुन्हा या गा-हाण्याचा जाब विचारण्यासाठी एल्गार पुकारला आहे. लाल बावटा घेऊन हजारो कष्टकरी शेतरकी रणरणत्या उन्हात मुंबईच्या दिशेने शासनदरबारी निघाले आहेत. कृषीप्रधान देशाचा पोशिंदा मानला जाणारा शेतकरी, शेतमजूर आदिवासी रस्त्यावर पायी चालत असून सत्ताधारी सरकारच्या मनाला अद्याप पाझर फुटलेला नाही.सत्ताधारी पक्षाच्या वतीने किंवा सत्ताधारी पक्षाची सत्ता असलेल्या नाशिक महापालिका प्रशासनाकडूनदेखील कुठल्याहीप्रकारची न्याहारी अथवा भोजनाची व्यवस्था या मोर्चेकरी शेतक-यांसाठी करण्यात आलेली नव्हती. केवळ एक पिण्याचा पाण्याचा टॅँकर महामार्ग बसस्थानकावर उपलब्ध करून देण्यापलीकडे कु ठलीही तसदी प्रशासनाकडून घेतली गेली नाही.शेतकरी मोर्चेकरी दुपार आणि रात्रीचे भोजन आपआपल्या शिदोरीवर भागवून निद्रीस्त झाले. सकाळी उठल्यावर स्वतखर्चाने महामार्गाच्या द्वारावर असलेल्या टपरीवर चहा बिस्किटे खाऊन न्याहारीचे समाधान करून घेतले आणि साडेनऊ वाजतात नेत्यांच्या पाठीमागे मुंबईच्या दिशेने कूच केली.

‘शिदोरी’त नेमके होते तरी काय?हिरवी मिरची लसणाचा ठेचा अन बाजरीची भाकर, गुळाचा खडा मीठाची पुडी यापलीकडे बहुतांश शेतकऱ्यांच्या शिदोरीमध्ये दुसºया प्रकारचा खाद्यपदार्थ आढळून आला नाही. कारण विविध तालुके जिल्ह्यांमधून प्रवास करून थकलेल्या बळीराजाने महामार्ग बस्थानकावर शिदोरी उघडून दुपारची भूक भागविली. याच शिदोरीचा आधार रात्रीच्या जेवणासाठी घेतला आणि सकाळची न्याहारी न करताच मुंबईच्या दिशेने प्रस्थान केले.नाशिकच्या द्राक्षांची चवच न्यारी...नाशिकच्या द्राक्षांची चवच न्यारी असल्याचे सांगत परजिल्ह्यांमधून आलेल्या मोर्चेक-यांनी महामार्ग बसस्थानकाच्या आवारात द्राक्ष विक्रेत्यांकडून द्राक्ष खरेदी करत त्याचाही आधार भूक-तहान भागविण्यासाठी घेतल्याच दिसून आले.चहा अन् गरमागरम पाववडामहामार्ग बसस्थानकाबाहेर वाफाळलेला चहा अन् गरमागरम वडापावचा दरवळलेला खमंग सुगंधाने अनेक मोर्चेक-यांना मोह आवरता आला नाही. मोर्चेक-यांनी पाववडा, बटाटावडा खाऊन चहाचा आस्वाद घेत न्याहारी आटोपली अन् हातात लाल बावटा घेत घोषणा देत मोर्चात सहभाग नोंदविला.

टॅग्स :Kisan Sabha Long Marchकिसान सभा लाँग मार्चNashikनाशिकFarmerशेतकरीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा