शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वाडीव-हेजवळ भोजन : ‘शिदोरी’वरच मोर्चेकरी बळीराजाने काढला दिवस अन् रात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 14:46 IST

सत्ताधारी पक्षाच्या वतीने किंवा सत्ताधारी पक्षाची सत्ता असलेल्या नाशिक महापालिका प्रशासनाकडूनदेखील कुठल्याहीप्रकारची न्याहारी अथवा भोजनाची व्यवस्था या मोर्चेकरी शेतक-यांसाठी करण्यात आलेली नव्हती. केवळ एक पिण्याचा पाण्याचा टॅँकर महामार्ग बसस्थानकावर

ठळक मुद्देकेवळ एक पिण्याचा पाण्याचा टॅँकर

नाशिक : आपल्या न्याय हक्कासाठी राज्यातील शेतकरी आदिवासी कष्टकरी पुन्हा रस्त्यावर उतरला आहे. बुधवारी राज्यातील विविध जिल्ह्यांमधून दाखल झालेल्या शेतकऱ्यांनी सोबत दोन वेळ नव्हे तर दोन दिवस पुरेल अशी शिदोरी बांधून आणली होती. या शिदोरीच्या आधारे मोर्चेकरी ज्येष्ठ पुरूष महिलांनी बुधवारचा दिवस अन् रात्र नाशिकच्या महामार्ग बसस्थानकात काढली. मागण्यांसंदर्भात कुठलाही तोडगा न निघाल्यामुळे अखेर गुरूवारी सकाळी मोर्चेक-यांनी बसस्थानकाचे आवार न्याहारी न करताच सोडले.

वर्षभरापुर्वी सरकारकडे मांडलेल्या विविध समस्या आणि मागण्यांचे गा-हाणे सरकारने केवळ एका कानाद्वारे ऐकून दुस-या कानाने सोडून दिल्याने पुन्हा या गा-हाण्याचा जाब विचारण्यासाठी एल्गार पुकारला आहे. लाल बावटा घेऊन हजारो कष्टकरी शेतरकी रणरणत्या उन्हात मुंबईच्या दिशेने शासनदरबारी निघाले आहेत. कृषीप्रधान देशाचा पोशिंदा मानला जाणारा शेतकरी, शेतमजूर आदिवासी रस्त्यावर पायी चालत असून सत्ताधारी सरकारच्या मनाला अद्याप पाझर फुटलेला नाही.सत्ताधारी पक्षाच्या वतीने किंवा सत्ताधारी पक्षाची सत्ता असलेल्या नाशिक महापालिका प्रशासनाकडूनदेखील कुठल्याहीप्रकारची न्याहारी अथवा भोजनाची व्यवस्था या मोर्चेकरी शेतक-यांसाठी करण्यात आलेली नव्हती. केवळ एक पिण्याचा पाण्याचा टॅँकर महामार्ग बसस्थानकावर उपलब्ध करून देण्यापलीकडे कु ठलीही तसदी प्रशासनाकडून घेतली गेली नाही.शेतकरी मोर्चेकरी दुपार आणि रात्रीचे भोजन आपआपल्या शिदोरीवर भागवून निद्रीस्त झाले. सकाळी उठल्यावर स्वतखर्चाने महामार्गाच्या द्वारावर असलेल्या टपरीवर चहा बिस्किटे खाऊन न्याहारीचे समाधान करून घेतले आणि साडेनऊ वाजतात नेत्यांच्या पाठीमागे मुंबईच्या दिशेने कूच केली.

‘शिदोरी’त नेमके होते तरी काय?हिरवी मिरची लसणाचा ठेचा अन बाजरीची भाकर, गुळाचा खडा मीठाची पुडी यापलीकडे बहुतांश शेतकऱ्यांच्या शिदोरीमध्ये दुसºया प्रकारचा खाद्यपदार्थ आढळून आला नाही. कारण विविध तालुके जिल्ह्यांमधून प्रवास करून थकलेल्या बळीराजाने महामार्ग बस्थानकावर शिदोरी उघडून दुपारची भूक भागविली. याच शिदोरीचा आधार रात्रीच्या जेवणासाठी घेतला आणि सकाळची न्याहारी न करताच मुंबईच्या दिशेने प्रस्थान केले.नाशिकच्या द्राक्षांची चवच न्यारी...नाशिकच्या द्राक्षांची चवच न्यारी असल्याचे सांगत परजिल्ह्यांमधून आलेल्या मोर्चेक-यांनी महामार्ग बसस्थानकाच्या आवारात द्राक्ष विक्रेत्यांकडून द्राक्ष खरेदी करत त्याचाही आधार भूक-तहान भागविण्यासाठी घेतल्याच दिसून आले.चहा अन् गरमागरम पाववडामहामार्ग बसस्थानकाबाहेर वाफाळलेला चहा अन् गरमागरम वडापावचा दरवळलेला खमंग सुगंधाने अनेक मोर्चेक-यांना मोह आवरता आला नाही. मोर्चेक-यांनी पाववडा, बटाटावडा खाऊन चहाचा आस्वाद घेत न्याहारी आटोपली अन् हातात लाल बावटा घेत घोषणा देत मोर्चात सहभाग नोंदविला.

टॅग्स :Kisan Sabha Long Marchकिसान सभा लाँग मार्चNashikनाशिकFarmerशेतकरीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा