शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

वयोवृद्ध शेतकऱ्याची कमाल; १५ महिन्यात दीड एकरातून घेतले १७ लाखांचे विक्रमी उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 12:20 IST

यशकथा : एखाद्या कॉर्पोरेट क्षेत्रातील उच्च पदस्थाच्या वार्षिक वेतनापेक्षा अधिक उत्पन्न केवळ ५७ आर क्षेत्रातून मिळविले

- संजय दुनबळे ( नाशिक ) 

एखाद्या कॉर्पोरेट क्षेत्रातील उच्च पदस्थाच्या वार्षिक वेतनापेक्षा अधिक उत्पन्न केवळ ५७ आर क्षेत्रातून मिळविता येऊ शकते, हे सिद्ध केले आहे नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील खर्डे येथील मन्साराम वामन देवरे या वयोवृद्ध शेतकऱ्याने. एकाच वेळी तीन पिके घेऊन १५ महिन्यांमध्ये देवरे यांनी तब्बल १७ लाख रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. तीनही पिकांना मिळून त्यांना एकूण एक लाख ५० हजारांचा खर्च आला.  

देवळा तालुक्यातील खर्डे येथे मन्साराम देवरे यांची केवळ ५७ आर इतकी शेतजमीन आहे. दरवर्षी शेतात नवनवीन प्रयोग करणारे शेतकरी म्हणून ते परिसरात परिचित आहेत. यावर्षी मन्साराम देवरे यांनी आपल्या  क्षेत्रात लाल कांदा, उन्हाळ कांदा आणि पपईचे उत्पन्न घेऊन चांगले उत्पन्न मिळविले आहे. सुरुवातीला त्यांनी शेतात तब्बल पाच ट्रक शेणखत टाकले. त्यानंतर जमिनीची मशागत करून प्रथम लाल कांद्याची लागवड केली. कांदा लागवडीनंतर त्यांनी त्याच क्षेत्रात पपई लागवडीचा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे कामास सुरुवात केली.

निफाड तालुक्यातील उगाव येथील नर्सरीतून त्यांनी तैवान ७८६ वाणाची पपईची रोपे आणली. पपईचे एक रोप त्यांना १० रुपयांना घरपोहोच मिळाले. वाफ्यांच्या वरंबीवर सात बाय सातच्या अंतरावर त्यांनी १३०० रोपांची लागवड केली. पपईची झाडे असल्यामुळे त्यांना कांदा पिकात तणनाशक मारता येत नव्हते त्यामुळे तीन वेळा कांद्याची निंदणी करावी लागली. यासाठी त्यांना ४० हजार रुपयांचा खर्च आला. तीन ते साडेतीन महिन्यांत लाल कांद्याचे पीक निघून गेले. लाल कांद्याचे २५० क्विंटल उत्पादन त्यांना मिळाले. या कांद्याला त्यावेळी १४०० ते १५०० रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. लाल कांदा काढल्यानंतर त्यांनी पुन्हा त्याच जमिनीत उन्हाळ कांद्याची लागवड केली. तोपर्यंत पपईची झाडे मोठी होत होती. उन्हाळ कांद्याचेही त्यांना २५० क्विंटल उत्पादन मिळाले. त्यालाही चांगला भाव मिळाला. दोन्ही कांदे निघेपर्यंत ७-८ महिन्यांचा काळ निघून गेला. या काळात पपईच्या झाडांची चांगली वाढ झाली.

उन्हाळ कांदा निघाल्यानंतर पपईला फळधारणा झाली. लागवडीनंतर नवव्या महिन्यापासून त्यांना पपईचे उत्पादन सुरू झाले. ते पुढे सहा महिने चालले. पपईचे त्यांना ४० ते ४५ टन उत्पादन झाले. ते त्यांनी व्यापाऱ्याला १२ ते १३ रुपये किलोने जागेवर विकले. पपईचा हंगाम संपत आल्यानंतर त्यांनी पपईच्या झाडांचा चीक काढण्याचा सौदा व्यापाऱ्याला दिला. चिकापोटी त्यांना १ लाख २५ हजार रुपये मिळाले. तीनही पिकांतून देवरे यांना १५ महिन्यांत खर्च वजा जाता १७ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. आता पपईचा हंगाम संपला असून, झाडांचा चीक काढल्याने ती वाळू लागली आहेत. आता झाडांवर रोटरी मारून त्याचेच ते पुढील पिकासाठी खत करणार आहेत. पाण्यासाठी त्यांच्याकडे बोअर आहे. पाणी कमी पडल्यास त्यांच्याकडे १० हजार लिटरचा टॅँकर असून, गावातून पाणी आणून ते पीक जगवितात, असे देवरे यांनी सांगितले.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी