शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

नाशिक बाजार समितीत भाज्यांचे भाव कडाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2018 1:16 AM

राष्ट्रीय किसान महासंघ व किसान एकता मंचाने पुकारलेल्या देशव्यापी शेतकरी संपामुळे शुक्रवारी (दि.१) नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भाज्यांची आवक घटली असून, भाज्यांचे दर २० ते २५ टक्क्यांनी वाढले आहे.

नाशिक : राष्ट्रीय किसान महासंघ व किसान एकता मंचाने पुकारलेल्या देशव्यापी शेतकरी संपामुळे शुक्रवारी (दि.१) नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भाज्यांची आवक घटली असून, भाज्यांचे दर २० ते २५ टक्क्यांनी वाढले आहे. देशव्यापी संपाला शहर परिसर व संपूर्ण तालुक्यातून संमिश्र प्रतिसाद मिळत असला तरी शेतकऱ्यांमध्ये शेतमाल करणाºया वाहनांचे नुकसान होण्याची भीती असल्याने अनेक शेतकºयांनी आंदोलनाच्या पहिल्या दिवशी शेतीमाल बाजार न नेण्याचा निर्णय घेतल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात केवळ ३० टक्केच शेतमाल विक्रीसाठी आला होता.  पुणतांब्यातील शेतकºयांनी गेल्यावर्षी १ जूनला पुकारलेल्या शेतकरी संपाला नाशिक जिल्ह्णातून प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. त्याचप्रमाणे ३ जूनच्या मध्यरात्री सरकार आणि आंदोलनाच्या प्रतिनिधींमध्ये झालेल्या चर्चेनंतर शेतकºयांची फसवणूक झाल्याची भावना शेतकºयांमध्ये पसरल्याने संपाची धुरा हातात घेणाºया नाशिक जिल्ह्णातच यावेळी संपाला अनेक भागांतून अत्यल्प तर काही भागांतून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. गेल्यावर्षी एकजुटीने संपाची धग सरकारपर्यंत पोहचविणाºया नाशिक जिल्ह्णात शेतकरी संपात एक जुटीचा अभाव दिसून आला असून, संप यशस्वी करण्याची जबाबदारी असलेले शेतकरी नेतेही दुसºया जिल्ह्णात असल्याने आंदोलनात समन्वयाचाही अभाव दिसून आला. दरम्यान, नाशिक जिल्ह्णातील मालेगाव, देवळा, सटणा, विंचूर, चांदवड, मनमाड, निफाड सायखेडा, सिन्नर परिसरासह पेठ, सुरगाणा परिसरातील गोळशी फाट्यावर आंदोलकांनी भाजीपाल्याची वाहने अडविण्याचा प्रयत्न झाला. परंतु पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे परिसरातील वाहने बाजार समितीत दाखल होऊ शकली. बाजार समितीत आलेल्या सर्व कृषिमालाचे लिलाव नियमितपणे सुरू होते. परंतु आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी आवक घटल्याने भाजीपाल्याचे दर २० ते २५ टक्क्यांनी वाढल्याचे दिसून आले.शेतकरी संघटनांच्या वेगळ्या चुलीगेल्यावर्षी एकजुटीने संपात उतरलेल्या वेगवेगळ्या शेतकरी संघटनांनी यावर्षी वेगवेगळ्या चुली मांडल्याचे दिसून आले. किसान सभेने शेतकरी कर्जमुक्ती, हमीभाव व वनजमिनी कसणाºया शेतकºयांच्या नावे करण्याची मागणी करीत आंदोलन केले, तर नाशिक जिल्हा शेतकरी आंदोलन समितीने हुतात्मा स्मारकात अभिवादन सभा घेऊन शेतकरी आंदोलनाच्या माध्यमातून हुतात्मा झालेल्या शेतकरी व शेतकरी नेत्यांना अभिवादन केले. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विभागीय निबंधकांना निवेदन देऊन शेतकºयांच्या सातबारा उताºयावर बँकांचे नाव न लावण्याची मागणी केली.

टॅग्स :vegetableभाज्या