शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

वागदर्डी धरण भरून वाहू लागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 1:10 AM

मनमाड : गेल्या अनेक वर्षांत पाणीटंंचाईने कळस गाठल्याने हवालदिल झालेल्या मनमाडकरांना नुकत्याच झालेल्या पावसाने दिलासा मिळाला आहे. गेल्या आठवडाभरात शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने शहराला पाणीपुरवठा करणारे वागदर्डी धरण भरून ओव्हरफ्लो झाले आहे. २०१६ सालानंतर वागदर्डी धरण प्रथमच भरल्याने मनमाडकरांची यावर्षी पाणीटंचाईतून मुक्तता झाली आहे.

ठळक मुद्देसुकाळ : पाणीटंचाईतून मनमाडकरांची मुक्तता

मनमाड : गेल्या अनेक वर्षांत पाणीटंंचाईने कळस गाठल्याने हवालदिल झालेल्या मनमाडकरांना नुकत्याच झालेल्या पावसाने दिलासा मिळाला आहे. गेल्या आठवडाभरात शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने शहराला पाणीपुरवठा करणारे वागदर्डी धरण भरून ओव्हरफ्लो झाले आहे. २०१६ सालानंतर वागदर्डी धरण प्रथमच भरल्याने मनमाडकरांची यावर्षी पाणीटंचाईतून मुक्तता झाली आहे.गेल्या अनेक वर्षांत वाढत्या पाणीटंचाईमुळे पाणीपुरवठ्याच्या दिवसात सातत्याने वाढ होत गेली. यावर्षी शहराला टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या जलसंकटानंतर यावर्षी सर्वत्र समाधानकारक पाऊस होत असला तरी मनमाड परिसर मात्र याला अपवाद होता. मधूनच अल्पशा येणाºया पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळत असले तरी भूगर्भातील पाणी पातळीत सुधारणा होत नव्हती. गेल्या आठवडाभरापासून झालेल्या समाधानकारक पावसाने वागदर्डी धरण भरून ओव्हरफ्लो झाले आहे. धरणाच्या सांडव्यातून आज पाणी बाहेर निघाले. याबरोबरच शहरासाठी तयार करण्यात आलेला पाटोदा साठवणूक तलाव पूर्ण भरला असून, या उपलब्ध पाण्यामुळे गेल्या काही वर्षांपासून पाणीटंचाईने होरपळलेल्या मनमाडकरांना दिलासा मिळाला आहे. पाणीपुरवठ्याच्या दिवसात कपात होणार असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. आॅक्टोबर २०१६ मध्ये हे धरण भरले होते. त्यानंतर सततच्या दुष्काळामुळे वागदर्डी धरण दरवर्षी रिकामे राहत होते.यावर्षी सुरुवातीपासूनच पाऊस सक्रिय झाल्याने शेतकऱ्यांच्या खरिपाबरोबरच रब्बी हंगामाच्या आशा पल्लवित झाल्या आहे.गेल्या अनेक वर्षांपासून रिकामे असलेले मनमाड शहराला पाणीपुरवठा करणारे वागदर्डी धरण ओव्हरफ्लो झाले आहे. पाणीपुरवठ्याच्या दिवसांमध्ये कपात करण्याबाबतची कार्यवाही पालिका प्रशासनाकडून सुरू आहे.-पद्माावती धात्रक,नगराध्यक्ष, मनमाड न.पा.

टॅग्स :DamधरणWaterपाणी