शहरं
Join us  
Trending Stories
1
‘होर्मुझ’बाबत भारताचे मोठे पाऊल, केंद्र सरकारचा मेगा प्लान ठरला; तेल संकटातून दिलासा मिळेल?
2
'पॅनिक होऊन पेट्रोल-डिझेल खरेदी करू नका', तुटवड्याबद्दल अफवा, मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितले सत्य
3
Top Marathi News LIVE Updates: गॅस पाईपलाईन असूनही अर्ज केला नाही तर सिलेंडर बंद होणार! छगन भुजबळांचा ग्राहकांना इशारा
4
"पुढची २० वर्षे सुरक्षित झाली"; शरद पवारांनी PM मोदींचे कौतुक केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांकडून जोरदार स्वागत
5
Twisha Sharma : ट्विशाच्या मृत्यूला ८ दिवस उलटले; अद्याप अंत्यसंस्कार नाही! मृतदेह खराब होण्याची 'एम्स'ला भीती
6
मोठा विश्वासघात! १६ वर्षे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा मालकाला दणका; २ कोटींचं सोनं घेऊन फरार
7
"PM मोदी जगात भारताची प्रतिष्ठा जपण्याचं काम करताहेत", शरद पवारांकडून पंतप्रधानांच्या कामाचं कौतुक, काय बोलले?
8
PM मोदींकडून जॉर्जिया मेलोनी यांना 'मेलोडी' भेट! इटलीच्या पंतप्रधान व्हिडिओ शेअर करत म्हणाल्या...
9
"आई, ते माझ्या खोलीत पंखा टांगतायत..."; ट्विशा शर्मा, दीपिका नागर अन् आता पलक रजकचा करुण अंत
10
देशांतर्गत क्रिकेट गाजवलं, आयपीएलमध्ये चमकले; आता थेट भारतीय संघात निवड, कोण आहेत 'हे' ४ खेळाडू!
11
रोजच पोहे-पराठे खाऊन कंटाळलात? नाश्त्याला द्या 'हेल्दी ट्विस्ट'; करा झटपट पौष्टिक ‘बीट इडली!’
12
Indian Railway आता Logo बदलणार, मंत्रालयाचा होकार; नवे काय पाहायला मिळेल, डिझाइन कसे असेल?
13
राज्यात पेट्रोल-डिझेलचा एक महिन्याचा साठा; इंधन टंचाईवर छगन भुजबळांची टेन्शन वाढवणारी माहिती
14
Khushboo Patani : Video - "बेटी विदा नहीं, कुर्बान हुई, गप्प बसणारे आई-वडीलही जबाबदार"; खुशबू पाटनीचा संताप
15
होर्मुझ संकटानंतर आता थेट हिंद महासागरात हायव्होल्टेज ड्रामा; इराणचा १० लाख बॅरलचा ऑइल टँकर केला जप्त!
16
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
17
Vastu Tips: नोकरी-व्यवसायात हवीये मोठी झेप? 'या' ५ वास्तू टिप्स नक्की वापरुन पहा
18
मोठा खुलासा! इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकेची किती विमानं उद्ध्वस्त झाली? थक्क करणारा आहे आकडा; पाहा संपूर्ण यादी
19
Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव
20
अधिक मास २०२६: १ मंत्र ११ वेळा जपा, अशक्यही शक्य होईल; स्वामी सेवा तारेल, अद्भूत अनुभव येईल!
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नरला अवकाळीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:13 IST

सिन्नर : तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागातील पिकांचे तत्काळ पंचनामे ...

सिन्नर : तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागातील पिकांचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी सिन्नर पंचायत समितीच्या सभापती शोभा दीपक बर्के यांनी केली आहे. कृषी व महसूल विभागाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणीही बर्के यांनी निवेदनात केली आहे. तालुक्यातील बहुतेक ठिकाणी रविवारी व सोमवारी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. काही भागात गारपीट झाल्याने रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले असून, प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे तातडीने करावे, असेही सभापती बर्के यांनी म्हटले आहे. तालुक्यात गहू व कांदा या पिकांचे पंधराशेहून अधिक हेक्टवर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. प्रामुख्याने रब्बी हंगामातील काढणीसाठी आलेला गहू, हरभरा, उन्हाळ बाजरी, कांदा तसेच फळबांगाचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. आधीच कोरोनाचे संकट, शेतीमालाला बाजारभाव नाही. त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. असे असतानाच आता पुन्हा गारपिटीने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावल्याने त्यांना तातडीने मदत देण्याची मागणी बर्के यांनी केली आहे.

-------------------

२० ते २५ गावांमध्ये नुकसान

रविवारी व सोमवारी झालेल्या अवकाळी पावसात तालुक्यातील २० ते २५ गावांना फटका बसला आहे. दापूर, गोंदे, शिवाजीनगर, दत्तनगर, खंबाळे, पाथरे बुद्रुक, पाथरे खुर्द, वारेगाव, कोळगावमाळ, सायाळे, मलढोण, मऱ्हळ, वावी, कहांडळवाडी, पिंपरवाडी, मिरगाव, दोडी बुद्रक, दोडी खुर्द, निऱ्हाळे, कणकोरी, नांदूरशिंगोटे, चापडगाव आदी भागात पावसाचा तडाखा बसला.

-------------

कांदा व फळबागांचे नुकसान

दापूर व परिसराला दुसऱ्या दिवशीही वादळी पावसाचा तडाखा बसला. परिसरात डाळिंबबागांचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जाते. अवकाळी पावसाचा मोठा फटका डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. तसेच या भागात यावर्षीही कांदा पिकांची चांगल्या प्रमाणात लागवड होती. परंतु गारपिटीने सर्वच पिकांची नासाडी झाली आहे.