शहरं
Join us  
Trending Stories
1
पडळकर-आव्हाड समर्थक राडा प्रकरणी अहवाल सादर; "'त्या' कार्यकर्त्यांना २ दिवस कारावास अन्..."
2
विनेश फोगाटचा यू-टर्न! पुन्हा कुस्तीच्या आखाड्यात परतणार, निवृत्तीचा निर्णय रद्द, कारण...
3
CBSE अभ्यासक्रमात छत्रपती शिवरायांचा इतिहास फक्त ६८ शब्दांत, सत्यजीत तांबेंचा विधानसभेत संताप
4
भारतात येत असताना...! विनफास्ट अमेरिकेत डीलरशीप बंद करू लागली; संख्या दोन डझनांखाली आली...
5
व्हेनेजुएला-अमेरिका वादात रशियाची उडी; मादुरोंच्या मदतीला पुतिन धावले, ट्रम्पना धक्का...
6
’सोयाबीन खरेदीचे केंद्र सुरू करण्यासाठी मंत्र्यांचे ओएसडी तीन लाख घेत आहेत’, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप  
7
‘स्लीपर वंदे भारत’वर मोठी अपडेट! १ हजार किमी अंतर ८ तासात, १६० प्रति तास वेग; पहिली सेवा...
8
रिलेशिनशिप कन्फर्म केल्यानंतर पहिल्यांदा एकत्र दिसले गौरव कपूर-कृतिका कामरा, व्हिडीओ व्हायरल
9
इंस्टाग्रामच्या कंटाळवाण्या रील्सला म्हणा 'बाय बाय'! फक्त एका सेटिंगने बदला फीडचा अल्गोरिदम
10
Gujarat Flyover Collapse: गुजरातमध्ये निर्माणाधीन पूल कोसळला! ४ कामगार गंभीर जखमी, एक बेपत्ता
11
"माझ्या एका सिगारेटने दिल्लीच्या प्रदूषणात फरक पडणार नाही"; TMC खासदाराचं भाजपाला प्रत्युत्तर
12
Rahul Gandhi: "लाखो मुलांचे भविष्य उद्ध्वस्त होत आहे" लोकसभेत राहुल गांधींचं महत्वाच्या मुद्द्यावर भाष्य!
13
मुंबईतील ७० टक्के मुस्लीम बहुल भागात एकनाथ शिंदेंना पसंती; भाजपाच्या सर्व्हेतून काय आलं समोर?
14
टेस्लाला मोठा झटका! जागतिक विक्री ४ वर्षांतील नीचांकी पातळीवर; भारतात तर डोकेही वर निघेना...
15
इंडिगोचं विमान ऐनवेळी रद्द, मुलाची परीक्षा चुकू नये म्हणून वडिलांनी रात्रभर चालवली कार, अखेरीस... 
16
"ज्येष्ठ नेते शिवराज पाटील यांच्या निधनाने अनुभवी, अभ्यासू व सुसंकृत नेतृत्व हरपले’’,  हर्षवर्धन सपकाळ यांनी वाहिली श्रद्धांजली
17
Garud Puran: गरुड पुराणानुसार विवाह बाह्य संबंध ठेवणाऱ्यांना मिळते 'ही' भयानक शिक्षा!
18
या अभिनेत्रीचे वडील उरीमध्ये दहशतवाद्यांशी लढताना झाले होते शहीद, ८०० कोटींच्या सिनेमातून रातोरात झाली लोकप्रिय
19
नात्याला काळीमा! इस्रायलचं स्वप्न, विम्याच्या रकमेसाठी लेक झाला हैवान; वडिलांचा काढला काटा
20
मोठी बातमी! वेनेझुएलावर अमेरिकेने हल्ला केलाच, रशिया संरक्षण करणार; मादुरो यांना पुतीन यांचा फोन गेला...
Daily Top 2Weekly Top 5

स्वाध्याय परिवाराची अनोखी जलभक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 01:05 IST

ल हे केवळ माणसाचेच जीवन नाही, धरणी मातेचेही आहे. तहानलेल्या पृथ्वीला पाणी देणे, ते मुरवणे म्हणजे धरणी मातेला तृप्त करणेच होय. अशा भक्तिभावातून नाशिक जिल्ह्यात स्वाध्याय परिवाराचे अध्वर्यू पूजनीय आठवले शास्त्री ऊर्फ दादा यांच्या प्रेरणेतून काम सुरू झाले

नाशिक : जल हे केवळ माणसाचेच जीवन नाही, धरणी मातेचेही आहे. तहानलेल्या पृथ्वीला पाणी देणे, ते मुरवणे म्हणजे धरणी मातेला तृप्त करणेच होय. अशा भक्तिभावातून नाशिक जिल्ह्यात स्वाध्याय परिवाराचे अध्वर्यू पूजनीय आठवले शास्त्री ऊर्फ दादा यांच्या प्रेरणेतून काम सुरू झाले आणि निर्मल नीर, शोष खड्डे, विहिरीचे पुनर्भरण आणि छतावरील पावसाळी पाण्याचा दैनंदिन जीवनात वापर यासाठी हजारो प्रकल्प उभे राहिले. त्या माध्यमातून लाखो लीटर पाणी मुरवले जाते आणि काही पाण्याचा पुनर्वापरदेखील होत आहे.दिवसेंदिवस भूगर्भातील पाण्याचा साठा आटू लागला आणि पावसाचे प्रमाण कमी-अधिक झाले तसे निसर्गाला लहरी ठरवले गेले. मात्र, पाण्याची बचत करणे आवश्यक ठरू लागल्याने शासकीय स्तरावर कायदे होऊ लागले. तथापि, कोणत्याही कायद्याशिवाय स्वेच्छेने आणि शासकीय मदतीशिवाय जलबचत आणि संचयाचे काम नेटाने स्वाध्याय परिवाराने सुरू ठेवले आहे आणि बदलत्या काळात तीच मोठी गरज निर्माण झाली आहे.पूजनीय दादांनी साठ वर्षांपूर्वी हा विचार मांडला. देवाने ही सृष्टी निर्माण केली, ती मानवानेच बिघडवली आणि आता ती पूर्ववत करण्याची जबाबदारी मानवाचीच आहे. अशा प्रेरणेतून बाल तरू संवर्धनापासून जल चळवळीपर्यंतचे अनेक प्रकारचे कार्य भक्तीमार्गाने करण्याची शिकवण पूजनीय आठवले शास्त्री आणि पूजनीय धनश्री दीदी यांनी दिली. त्याच मार्गावरून स्वाध्यायी चालत आहेत. ते कोणत्याही प्रसिद्धी, पुरस्काराची अपेक्षा न ठेवता !नाशिकमध्ये स्वाध्याय परिवाराचे जलसंचयाचे काम १९९६ पासून सुरू आहे. मात्र गुजरातमध्ये त्याआधी परिवाराच्या काही अभियंत्यांनी जलसंचयाची कामे सुरू केली होती १२ मे १९९६ रोजी. पूज्य दादांनी नाशिकच्या काही स्वाध्यायींना मुंबईत गुजरातमधील काही स्वाध्यायींकडून जलसंचयाची माहिती घेण्यासाठी बोलावले आणि त्याचदिवशी त्यांच्याकडील माहिती घेतल्यानंतर तत्काळ तेथूनच ते नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील हरसूल येथे गेले. तेथील ग्रामस्थांना एकत्र करून पाण्याचे महत्त्व आणि त्यामागील भक्तिभाव समजावून सांगितला आणि त्यानंतर सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन श्रमभक्ती (श्रमदान) करून तलाव बांधला. हा नाशिकमधील पहिला ‘निर्मल नीर’ चा प्रयोग. त्यानंतर दिंडोरी, सटाणा, पेठ, सिन्नर यांसह सर्व जिल्ह्यांत निर्मल नीर बांधले गेले. त्याच जोडीला जमिनीची धूप थांबवून उतारावरून वाहणाऱ्या पाण्यातून वाहून जाणारी माती अडवून नंतर पाणी अडवण्यासाठी चेक डॅम बांधले जाऊ लागले. त्याचदरम्यान, परिवाराने घरगुती सांडपाणी आणि अन्य वापरलेले पाणी भूगर्भात भरण्यासाठी अनोखी चळवळ चालवली आणि घरांजवळ शोषखड्डे केले. त्यातून घराबाहेर वाहणारे पाणी थांबले आणि आरोग्याचा प्रश्नही सुटला.पंचमहाभुते आपले कर्तव्य नियमितपणे करीत असतात, त्यालाच यज्ञ असे म्हणतात अशा शिकवणीतून मग पावसाचे पाणी पडल्यावर ते वाहून जाण्यापेक्षा तहानलेल्या भूमातेला देण्यासाठी रेनवॉटर हार्वेस्टिंगचे काम १९९६ पासूनच सुरू झाले. छतावरील पाणी हे कूपनलिकेजवळ सोडून वापरविणे किंवा भूजल पातळी वाढविण्यासाठी सोडणे हे काम सामान्यच आहे. वेगळेपण स्वाध्यायींनी दाखवून दिले आहे. नाशिक शहरातच अशाप्रकारचे पाचशे पावसाळी पाणी संचय उपक्रम राबविले आहेत.सर्व उपक्रमांची वैशिष्ट्ये म्हणजे परिवार म्हणून ते राबविताना सर्वजण दैवी भातृभावाच्या भावनेने एकमेकांना सहकार्य करतात. मातृसंस्थेकडून पाईप, सीमेंट वगैरे विविध प्रकारचे साहित्य नम्रपणे ‘प्रसाद’ म्हणून स्वीकारतात. नाशिक जिल्ह्यातील अशा कामांसाठी तब्बल परिवारातील चाळीस स्वाध्यायी अभियंते सहकारी ‘एकमेका सहाय्य करू..’ या उक्तीने मार्गदर्शन करतात. सरकारी कायद्यामुळे, भीतीमुळे काम होऊ शकते. परंतु प्रेरणा, भक्तिभाव आणि स्वेच्छेने काम झाले तर ते अधिक आत्मियतेने होते आणि टिकून राहाते, हेच स्वाध्याय परिवाराने दाखवून दिले आहे.१९९६ पासून सुरू केलेल्या या कार्याची फलश्रुती मोठी आहे. संपूर्ण जिल्ह्यात २२२ निर्मल नीर, १४ हजार ५५३ शोषखड्डे, ९ हजार ९९८४ चेक डॅम आणि ३ हजार ९३० विहिरी, कूपनलिकांच्या पुनर्भरणाचे उपक्रम राबविण्यात आले असून, पाचशेहून अधिक घरांवर पावसाळी पाणी साठवण आणि पुनर्वापर केला जात आहे.

टॅग्स :WaterपाणीDamधरण