शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

आगामी निवडणुकीत गोदावरीचे पाणी पेटणार

By श्याम बागुल | Updated: October 16, 2018 16:07 IST

मराठवाड्यातील जायकवाडी धरणात १७२ दशलक्ष घनफूट पाण्याची कमतरता असल्यामुळे समन्यायी पाणी वाटपानुसार नाशिक व नगर जिल्ह्यातील धरणांमधून किमान ६ टीएमसी पाणी सोडण्याचे प्रयत्न गोदावरी पाटबंधारे महामंडळाकडून सुरू झाले

ठळक मुद्दे‘गंगापूर’मधून पाणी देण्यास विरोध; तीन वर्षांची होणार पुनरावृत्ती

नाशिक : ‘आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास’ अशी परिस्थिती यंदा पावसाअभावी नाशिक जिल्ह्यावर ओढवलेली असताना त्यात समन्यायी पाणी वाटपाचा आधार घेत गंगापूर धरणातून पाणी पळविण्याचा मराठवाड्याकडून होणारा प्रयत्न पाहता आगामी निवडणुकीत नाशिक व नगर जिल्ह्यात ‘गोदावरी’चे पाणी पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांमध्ये पिके करपून, पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्यामुळे गंगापूरचे पाणी अन्य जिल्ह्यासाठी सोडल्यास तीन वर्षांपूर्वीच्या राजकीय तणावाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.मराठवाड्यातील जायकवाडी धरणात १७२ दशलक्ष घनफूट पाण्याची कमतरता असल्यामुळे समन्यायी पाणी वाटपानुसार नाशिक व नगर जिल्ह्यातील धरणांमधून किमान ६ टीएमसी पाणी सोडण्याचे प्रयत्न गोदावरी पाटबंधारे महामंडळाकडून सुरू झाले आहेत. सोमवारी या संदर्भात झालेल्या बैठकीत गोदावरी पाटबंधारे महामंडळाने नगर व नाशिक जिल्ह्यातील धरणातील पाण्याची आकडेवारी जाणून घेतली. त्यात जायकवाडीची तूट भरून काढण्यासाठी पाणी सोडावे लागेल, असे महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी ठामपणे सांगितले व प्रसंगी त्यासाठी लवादाकडे तक्रार दाखल करण्याचेही सूतोवाच केले आहे. त्यामुळे पाणी सोडण्यासाठी दबाव टाकण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत १३ टक्के तर गंगापूर धरणात ११ टक्के पाण्याची कमतरता यंदा निर्माण झाली आहे. गंगापूरमध्ये ८८ टक्के साठा असून, जिल्ह्यातील धरणांमध्ये ७७ टक्के साठा आहे. आॅक्टोबरमध्ये होणारे धरणातील पाण्याचे आरक्षण अद्याप जाहीर झालेले नाही. त्यामुळे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, नगरपालिका, रेल्वे आदींसाठी जुलै अखेरपर्यंत पाण्याची तजवीज केल्यानंतर धरणातील उर्वरित पाणी सिंचनासाठी देण्याची तरतूद आहे. यंदा खरीप पिकासाठी अखेरचे आवर्तन न मिळाल्यामुळे तसेच परतीचा पाऊस न आल्यामुळे जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत गंगापूर धरणातून पाणी सोडल्यास त्याचा या धरणावर अवलंबून असलेल्या तालुक्यांमध्ये राज्य सरकारच्या विरोधात वातावरण पेटण्याची चिन्हे आहेत. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर दुसऱ्याच वर्षी सन २०१५ मध्ये जायकवाडी धरणासाठी नगर, नाशिकमधून १२ टीएमसी पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे भाजपा सरकारविरोधात सर्वपक्षीयांनी आंदोलन केले होते. लोकसभेच्या व विधानसभेच्या निवडणुका तोंडावर असून, यंदा अपु-या पाण्यामुळे जनता होरपळून निघत असताना हक्काचे पाणी पळविल्यास त्याचा विरोधकांकडून निवडणुकीत सत्ताधाºयांच्या विरोधात प्रचार केला जाणार आहे.

टॅग्स :Erai Damइरई धरणNashikनाशिक