शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
3
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
4
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
5
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
6
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
7
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
8
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
9
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
10
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
11
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
12
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
13
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
14
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
15
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
16
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
17
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
18
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
19
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
20
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण

आगामी निवडणुकीत गोदावरीचे पाणी पेटणार

By श्याम बागुल | Updated: October 16, 2018 16:07 IST

मराठवाड्यातील जायकवाडी धरणात १७२ दशलक्ष घनफूट पाण्याची कमतरता असल्यामुळे समन्यायी पाणी वाटपानुसार नाशिक व नगर जिल्ह्यातील धरणांमधून किमान ६ टीएमसी पाणी सोडण्याचे प्रयत्न गोदावरी पाटबंधारे महामंडळाकडून सुरू झाले

ठळक मुद्दे‘गंगापूर’मधून पाणी देण्यास विरोध; तीन वर्षांची होणार पुनरावृत्ती

नाशिक : ‘आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास’ अशी परिस्थिती यंदा पावसाअभावी नाशिक जिल्ह्यावर ओढवलेली असताना त्यात समन्यायी पाणी वाटपाचा आधार घेत गंगापूर धरणातून पाणी पळविण्याचा मराठवाड्याकडून होणारा प्रयत्न पाहता आगामी निवडणुकीत नाशिक व नगर जिल्ह्यात ‘गोदावरी’चे पाणी पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांमध्ये पिके करपून, पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्यामुळे गंगापूरचे पाणी अन्य जिल्ह्यासाठी सोडल्यास तीन वर्षांपूर्वीच्या राजकीय तणावाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.मराठवाड्यातील जायकवाडी धरणात १७२ दशलक्ष घनफूट पाण्याची कमतरता असल्यामुळे समन्यायी पाणी वाटपानुसार नाशिक व नगर जिल्ह्यातील धरणांमधून किमान ६ टीएमसी पाणी सोडण्याचे प्रयत्न गोदावरी पाटबंधारे महामंडळाकडून सुरू झाले आहेत. सोमवारी या संदर्भात झालेल्या बैठकीत गोदावरी पाटबंधारे महामंडळाने नगर व नाशिक जिल्ह्यातील धरणातील पाण्याची आकडेवारी जाणून घेतली. त्यात जायकवाडीची तूट भरून काढण्यासाठी पाणी सोडावे लागेल, असे महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी ठामपणे सांगितले व प्रसंगी त्यासाठी लवादाकडे तक्रार दाखल करण्याचेही सूतोवाच केले आहे. त्यामुळे पाणी सोडण्यासाठी दबाव टाकण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत १३ टक्के तर गंगापूर धरणात ११ टक्के पाण्याची कमतरता यंदा निर्माण झाली आहे. गंगापूरमध्ये ८८ टक्के साठा असून, जिल्ह्यातील धरणांमध्ये ७७ टक्के साठा आहे. आॅक्टोबरमध्ये होणारे धरणातील पाण्याचे आरक्षण अद्याप जाहीर झालेले नाही. त्यामुळे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, नगरपालिका, रेल्वे आदींसाठी जुलै अखेरपर्यंत पाण्याची तजवीज केल्यानंतर धरणातील उर्वरित पाणी सिंचनासाठी देण्याची तरतूद आहे. यंदा खरीप पिकासाठी अखेरचे आवर्तन न मिळाल्यामुळे तसेच परतीचा पाऊस न आल्यामुळे जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत गंगापूर धरणातून पाणी सोडल्यास त्याचा या धरणावर अवलंबून असलेल्या तालुक्यांमध्ये राज्य सरकारच्या विरोधात वातावरण पेटण्याची चिन्हे आहेत. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर दुसऱ्याच वर्षी सन २०१५ मध्ये जायकवाडी धरणासाठी नगर, नाशिकमधून १२ टीएमसी पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे भाजपा सरकारविरोधात सर्वपक्षीयांनी आंदोलन केले होते. लोकसभेच्या व विधानसभेच्या निवडणुका तोंडावर असून, यंदा अपु-या पाण्यामुळे जनता होरपळून निघत असताना हक्काचे पाणी पळविल्यास त्याचा विरोधकांकडून निवडणुकीत सत्ताधाºयांच्या विरोधात प्रचार केला जाणार आहे.

टॅग्स :Erai Damइरई धरणNashikनाशिक