शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
2
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
3
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
4
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
5
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
6
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
7
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
8
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
9
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
10
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
11
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
12
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
13
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
14
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
15
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
16
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
17
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
18
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
19
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
20
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन

सावरपाड्यात अतिसाराने दोन जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 01:57 IST

कळवण तालुक्यातील जयदर प्राथमिक केंद्रांतर्गत येणाऱ्या सावरपाडा गावात अतिसाराने दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. १७) घडली. अतिसाराची लागण झाल्यामुळे चंद्रा तान्हू ठाकरे (७०) व पंढरीनाथ अर्जुन बर्डे (७५) यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, दूषित पाण्यामुळे ८५ लोकांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

ठळक मुद्देदूषित पाण्यामुळे ८५ लोक बाधित

कळवण/कनाशी : कळवण तालुक्यातील जयदर प्राथमिक केंद्रांतर्गत येणाऱ्या सावरपाडा गावात अतिसाराने दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. १७) घडली. अतिसाराची लागण झाल्यामुळे चंद्रा तान्हू ठाकरे (७०) व पंढरीनाथ अर्जुन बर्डे (७५) यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, दूषित पाण्यामुळे ८५ लोकांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील काहींची रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.सावरपाडा येथे पुनंद पाणीपुरवठा योजनेच्या सुरू असलेल्या कामामुळे सावरपाडा पाणीपुरवठा योजनेची पाइपलाइन फुटल्याने गावाला दूषित पाण्याचा पुरवठा झाल्याने गॅस्ट्रोची गावात लागण झाल्याचा प्राथमिक अंदाज आरोग्य विभागाने व्यक्त केला. गावात बुधवारी रात्री १ वाजेपासून दूषित पाण्यामुळे ९० जणांना त्रास सुरू झाला. १०५८ लोकसंख्या असलेल्या गावातील १२३ घरांना सार्वजनिक विहीर, सार्वजनिक पाणीपुरवठा योजना, तीन हातपंपद्वारे पाण्याचापुरवठा होतो.जयदर आरोग्य केंद्रात १७, कळवण उपजिल्हा रुग्णालयात १९ रु ग्णांना दाखल करण्यात आले आहे. सावरपाडा गावात ४२ रुग्णावर औषोधोपचार सुरू आहेत. गटविकास अधिकारी बहिरम, डॉ. सुधीर पाटील व आरोग्य कर्मचारी परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत.

टॅग्स :NashikनाशिकHealthआरोग्यDeathमृत्यू