शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
4
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
5
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
6
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
7
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
8
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
9
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
10
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
11
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
12
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
13
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
14
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
15
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
16
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
17
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
18
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
19
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
20
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?

हा तर जिलेटिन स्फोटाच्या चौकशीला सुरुंग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:31 IST

अशी शंका येण्याचे कारणही तसेच आहे. ब्रम्हगिरीच्या रक्षणासाठी लढणाऱ्या पर्यावरणप्रेमींच्या लढ्याला यश येत असल्याचे दिसत असताना पुन्हा त्याच ठिकाणी ...

अशी शंका येण्याचे कारणही तसेच आहे. ब्रम्हगिरीच्या रक्षणासाठी लढणाऱ्या पर्यावरणप्रेमींच्या लढ्याला यश येत असल्याचे दिसत असताना पुन्हा त्याच ठिकाणी येऊन थांबावे लागत असल्याचे दुर्दैवाने पुन्हा पुन्हा घडत आहे. पर्यावरण राज्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही जिलेटिन स्फोटाच्या चौकशीसाठी इतकी निर्ममता दाखविली जाणार असेल तर यंत्रणेकडून अपेक्षा करणे व्यर्थ ठरते. अशावेळी नागरिकांच्या संयमाचाच स्फोट झाला तर त्याचे हादरे किती दूरवर पोहोचू शकतील याचा विचारही यंत्रणांनी करायला हवा.

२०१९ मध्ये नव्याने रुजू झालेल्या खनिकर्म अधिकाऱ्याने अवैध उत्खनन प्रकरणी थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला होता. परंतु, हा निव्वळ पोकळ इशाराच ठरला. नव्याने स्थापन झालेल्या टास्क फोर्सची एक बैठक होऊन त्यावर उपसमित्या स्थापन होऊन गेल्या. पहिली तिमाही बैठक आता सप्टेंबरमध्ये होणार आहे. त्यामुळे टास्क फोर्स महिनाभर तरी काहीही करू शकणार नाही हेही स्पष्ट होऊन गेले आहे. आज जरी यावरील नाराजी असली तरी यानिमित्ताने उपस्थित होणारे प्रश्न कायम आहेत. गाजावाजा करून स्थापन झालेल्या टास्क फोर्सचे फलित काय?, जिल्ह्यात किती खाणकामांना परवानगी देण्यात आली याची माहिती का देण्यात आलेली नाही? कोणत्या कायद्याने डोंगर फोडण्याची परवानगी दिली जाते? कुणाच्या आशीर्वादाने डोंगर फोडले जात आहेत? असे अनेक प्रश्न पर्यावरणप्रेमींनी आता विचारायला सुरुवात केली आहे. आज ना उद्या याचे उत्तरही यंत्रणेला द्यावे लागणार आहे.

पर्यावरण राज्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर जिल्हा खनिकर्म अधिकारी, प्रदूषण नियंत्रण विभाग, वन विभाग यांचा एकेक अधिकारी तसेच स्थानिक नागरिक आणि ब्रम्हगिरी कृती समितीचे सदस्य अशा समितीने चौकशी करणे अपेक्षित होते. परंतु, शासकीय विभागांचे कुणीही अधिकारी यासाठी पुढे आले नाहीत. कृती समितीने याबाबतचे स्मरण देऊनही यंत्रणा हलली नाही आणि त्यातच पाहू, करू असे म्हणत सात दिवसांचा कालावधीही संपुष्टात आला. खरेतर अपेक्षित तेच झाले, पर्यावरणप्रेमींच्या अपेक्षांना सुरुंग लावण्यात आला.

--इन्फो--

सात दिवसांचा कालावधी उलटून गेल्यानंतर अनेक घटना घडल्या आहेत त्या दुर्लक्षून चालणार नाही. बेलगाव ढगा ग्रामसभेत उत्खननाला कायमच तीव्र विरोध करण्याचा ठराव करण्यात आला. महसूल यंत्रणा अधिकाराचा वापर करणार नसेल तर ग्रामस्थांनी लढा सुरू ठेवावा यावरही ग्रामसभेत चर्चा झाली ती हलक्यात घेता येणारी नाही. यंत्रणांनी त्यांचे काम करावे, राजकीय इच्छाशक्तीचे पाठबळ मिळावे आणि समन्वयातून समाधान शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न झाला तरच अपेक्षा ठेवता येईल. गावपातळीवर संतप्त भावना धुमसत आहेत हे वेळीच लक्षात घ्यावे लागेल.

- संदीप भालेराव, जिल्हाधिकारी कार्यालयातून