शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
2
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
3
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच सारं काही २४ कॅरेट सोन्यांने बनवलेलं...
4
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
5
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
6
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
7
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
8
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...
9
Hero Motors चा IPO येतोय! कंपनीचा बिझनेस पाहून तुम्हीही व्हाल थक्क! काय आहे भविष्यातील प्लॅन?
10
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, ताफ्यावर फेकली बाटली, बाटलीत होतं... 
11
चातुर्मास कधीपासून सुरू होणार? व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची रेलचेल; पाहा, महात्म्य अन् मान्यता
12
मी कुठंही असो.. तो मला शोधतोच! 'त्या' चर्चेवर पहिल्यांदाच व्यक्त झाली काव्या मारन
13
‘सासरा मालीश करायला लावायचा, पती नेत्यांसोबत झोपायला पाठवायचा’, पीडितेच्या आरोपांनी खळबळ
14
ZIM vs SA Test: खतरनाक 'सुपर स्पिन'! गोलंदाजाच्या भन्नाट फिरकीने केली फलंदाजांची 'दांडी गुल' (Video)
15
जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट
16
'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही', CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन
17
अंबानी-अदानींना टाकले मागे! नागपूरच्या कंपनीने घडवला इतिहास! 'या' अब्जाधीशाची विक्रमी कमाई!
18
खळबळजनक! सोनमपासून प्रेरणा घेऊन बायकोने काढला नवऱ्याचा काटा, बाईकला GPS अन्...
19
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
20
विधानसभेला बंडखोरी केली, अपक्ष निवडणूक लढवली, काँग्रेसकडून बड्या नेत्याचं निलंबन अखेर मागे  

हा तर जिलेटिन स्फोटाच्या चौकशीला सुरुंग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:31 IST

अशी शंका येण्याचे कारणही तसेच आहे. ब्रम्हगिरीच्या रक्षणासाठी लढणाऱ्या पर्यावरणप्रेमींच्या लढ्याला यश येत असल्याचे दिसत असताना पुन्हा त्याच ठिकाणी ...

अशी शंका येण्याचे कारणही तसेच आहे. ब्रम्हगिरीच्या रक्षणासाठी लढणाऱ्या पर्यावरणप्रेमींच्या लढ्याला यश येत असल्याचे दिसत असताना पुन्हा त्याच ठिकाणी येऊन थांबावे लागत असल्याचे दुर्दैवाने पुन्हा पुन्हा घडत आहे. पर्यावरण राज्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही जिलेटिन स्फोटाच्या चौकशीसाठी इतकी निर्ममता दाखविली जाणार असेल तर यंत्रणेकडून अपेक्षा करणे व्यर्थ ठरते. अशावेळी नागरिकांच्या संयमाचाच स्फोट झाला तर त्याचे हादरे किती दूरवर पोहोचू शकतील याचा विचारही यंत्रणांनी करायला हवा.

२०१९ मध्ये नव्याने रुजू झालेल्या खनिकर्म अधिकाऱ्याने अवैध उत्खनन प्रकरणी थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला होता. परंतु, हा निव्वळ पोकळ इशाराच ठरला. नव्याने स्थापन झालेल्या टास्क फोर्सची एक बैठक होऊन त्यावर उपसमित्या स्थापन होऊन गेल्या. पहिली तिमाही बैठक आता सप्टेंबरमध्ये होणार आहे. त्यामुळे टास्क फोर्स महिनाभर तरी काहीही करू शकणार नाही हेही स्पष्ट होऊन गेले आहे. आज जरी यावरील नाराजी असली तरी यानिमित्ताने उपस्थित होणारे प्रश्न कायम आहेत. गाजावाजा करून स्थापन झालेल्या टास्क फोर्सचे फलित काय?, जिल्ह्यात किती खाणकामांना परवानगी देण्यात आली याची माहिती का देण्यात आलेली नाही? कोणत्या कायद्याने डोंगर फोडण्याची परवानगी दिली जाते? कुणाच्या आशीर्वादाने डोंगर फोडले जात आहेत? असे अनेक प्रश्न पर्यावरणप्रेमींनी आता विचारायला सुरुवात केली आहे. आज ना उद्या याचे उत्तरही यंत्रणेला द्यावे लागणार आहे.

पर्यावरण राज्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर जिल्हा खनिकर्म अधिकारी, प्रदूषण नियंत्रण विभाग, वन विभाग यांचा एकेक अधिकारी तसेच स्थानिक नागरिक आणि ब्रम्हगिरी कृती समितीचे सदस्य अशा समितीने चौकशी करणे अपेक्षित होते. परंतु, शासकीय विभागांचे कुणीही अधिकारी यासाठी पुढे आले नाहीत. कृती समितीने याबाबतचे स्मरण देऊनही यंत्रणा हलली नाही आणि त्यातच पाहू, करू असे म्हणत सात दिवसांचा कालावधीही संपुष्टात आला. खरेतर अपेक्षित तेच झाले, पर्यावरणप्रेमींच्या अपेक्षांना सुरुंग लावण्यात आला.

--इन्फो--

सात दिवसांचा कालावधी उलटून गेल्यानंतर अनेक घटना घडल्या आहेत त्या दुर्लक्षून चालणार नाही. बेलगाव ढगा ग्रामसभेत उत्खननाला कायमच तीव्र विरोध करण्याचा ठराव करण्यात आला. महसूल यंत्रणा अधिकाराचा वापर करणार नसेल तर ग्रामस्थांनी लढा सुरू ठेवावा यावरही ग्रामसभेत चर्चा झाली ती हलक्यात घेता येणारी नाही. यंत्रणांनी त्यांचे काम करावे, राजकीय इच्छाशक्तीचे पाठबळ मिळावे आणि समन्वयातून समाधान शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न झाला तरच अपेक्षा ठेवता येईल. गावपातळीवर संतप्त भावना धुमसत आहेत हे वेळीच लक्षात घ्यावे लागेल.

- संदीप भालेराव, जिल्हाधिकारी कार्यालयातून