शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकेश्वर तालुक्यात टंचाई : टँकर, बैलगाडीने पाणीपुरवठा; पाण्यासाठी महिलांची भटकंतीआराखड्यात विंधनविहिरींवर भर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 23:28 IST

त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर तालुक्यात दरवर्षी टंचाई काळात टँकरने तसेच काही भागात बैलगाडीने पाणीपुरवठा करण्याचे दुष्टचक्र संपता संपलेले नाही.

ठळक मुद्देएकदा निवडून गेले की आश्वासनांचा विसर टंचाईची दाहकता मात्र काही अंशी कमी

त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर तालुक्यात दरवर्षी टंचाई काळात टँकरने तसेच काही भागात बैलगाडीने पाणीपुरवठा करण्याचे दुष्टचक्र संपता संपलेले नाही. नेतेमंडळी, आमदार, खासदार दर पाच वर्षांनी टँकरमुक्त तालुका करण्याची आश्वासने देतात; पण हे दुष्टचक्र अजूनही थांबलेले नाही आणि हीच मोठी शोकांतिका आहे. तालुक्यातील पाणीटंचाई दूर करू, तालुका टंचाईमुक्त करू अशी आश्वासने दर निवडणुकीत दिली जातात; मात्र एकदा निवडून गेले की त्यांना आपण दिलेल्या आश्वासनांचा विसर पडतो. निर्मला गावित गेल्या दहा वर्षांपासून या तालुक्याचे नेतृत्व करतात. महिला आमदार असल्याने त्यांना महिलांच्या समस्यांची जाणीव आहे. महिला वर्गाला पाण्याचा किती त्रास होत असतो याचीही जाणीव आहे. पण दहा वर्षांत त्यांना पाण्याची समस्या सोडविता आलेली नाही. अर्थात तालुका पूर्णत: टँकरमुक्त झाला नसला तरी टंचाईची दाहकता मात्र काही अंशी कमी झाली आहे. तथापि, दरवर्षी मार्चपासूनच तालुक्यात लोकांना टंचाई स्थितीशी सामना करण्याची वेळ येते आणि उन्हाळ्यातल्या पाणीटंचाईचे प्रारब्ध चुकता चुकत नाही. आता यावर्षी मात्र विंधनविहिरींवर भर देण्यात आला आहे. विंधनविहिरींनाच विद्युत कनेक्शनद्वारे नळपाणीपुरवठा योजना कार्यान्वित करून गावाला पाणीपुरवठा करावयाचा आहे. आणि योजना नाहीच यशस्वी झाली तर शेवटी टँकरने पाणीपुरवठा करण्याचा पर्याय आहेच. तालुक्यात तीन टप्प्यांत पाणीटंचाई भासते. आॅक्टोबर ते डिसेंबर पहिला टप्पा. जानेवारी ते मार्च दुसरा टप्पा व एप्रिल ते जून तिसरा टप्पा अशाप्रकारे नियोजन केले आहे. आराखडा आॅक्टोबरमध्ये केल्यावर टंचाई नियोजनात इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघाच्या आमदार निर्मलाताई गावित, तहसीलदार महेंद्र पवार, गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे व जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाचे उपअभियंता वनमने यांच्या स्वाक्षरीने टंचाई नियोजन आराखडा तयार केला जातो. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात सहसा टंचाई स्थिती निर्माण होत नाही. यावर्षी सन २०१७ च्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस पडला होता. त्यामुळे टंचाई स्थिती अद्यापपावेतो सुरू झालेली नाही. दि. १९ रोजी सोमनाथनगर येथील पहिलाच प्रस्ताव दाखल झाला आहे. यावर्षी तिसºया टप्प्यात ज्यांना टंचाईची झळ पोहोचेल अशा ८५ गावांचा व १८३ वाड्या-पाड्यांचा आराखड्यात समावेश करण्यात आला आहे व त्या दृष्टीने प्रशासनाने नियोजन केले आहे. या नियोजनात ५५ गावांना व १०९ वाड्या-पाड्यांना नव्याने विंधनविहिरी घेणे प्रस्तावित आहे, तर टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी एकूण ३० गावे व ७० वाड्यांना व १०४ गावांना पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. असे तिसºया टप्प्यात एकूण ८५ गावे व १८३ वाड्या मिळून २६८ गावांचे टंचाई नियोजन करण्यात आले आहे.