शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

त्र्यंबकेश्वर तालुक्यात टंचाई : टँकर, बैलगाडीने पाणीपुरवठा; पाण्यासाठी महिलांची भटकंतीआराखड्यात विंधनविहिरींवर भर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 23:28 IST

त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर तालुक्यात दरवर्षी टंचाई काळात टँकरने तसेच काही भागात बैलगाडीने पाणीपुरवठा करण्याचे दुष्टचक्र संपता संपलेले नाही.

ठळक मुद्देएकदा निवडून गेले की आश्वासनांचा विसर टंचाईची दाहकता मात्र काही अंशी कमी

त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर तालुक्यात दरवर्षी टंचाई काळात टँकरने तसेच काही भागात बैलगाडीने पाणीपुरवठा करण्याचे दुष्टचक्र संपता संपलेले नाही. नेतेमंडळी, आमदार, खासदार दर पाच वर्षांनी टँकरमुक्त तालुका करण्याची आश्वासने देतात; पण हे दुष्टचक्र अजूनही थांबलेले नाही आणि हीच मोठी शोकांतिका आहे. तालुक्यातील पाणीटंचाई दूर करू, तालुका टंचाईमुक्त करू अशी आश्वासने दर निवडणुकीत दिली जातात; मात्र एकदा निवडून गेले की त्यांना आपण दिलेल्या आश्वासनांचा विसर पडतो. निर्मला गावित गेल्या दहा वर्षांपासून या तालुक्याचे नेतृत्व करतात. महिला आमदार असल्याने त्यांना महिलांच्या समस्यांची जाणीव आहे. महिला वर्गाला पाण्याचा किती त्रास होत असतो याचीही जाणीव आहे. पण दहा वर्षांत त्यांना पाण्याची समस्या सोडविता आलेली नाही. अर्थात तालुका पूर्णत: टँकरमुक्त झाला नसला तरी टंचाईची दाहकता मात्र काही अंशी कमी झाली आहे. तथापि, दरवर्षी मार्चपासूनच तालुक्यात लोकांना टंचाई स्थितीशी सामना करण्याची वेळ येते आणि उन्हाळ्यातल्या पाणीटंचाईचे प्रारब्ध चुकता चुकत नाही. आता यावर्षी मात्र विंधनविहिरींवर भर देण्यात आला आहे. विंधनविहिरींनाच विद्युत कनेक्शनद्वारे नळपाणीपुरवठा योजना कार्यान्वित करून गावाला पाणीपुरवठा करावयाचा आहे. आणि योजना नाहीच यशस्वी झाली तर शेवटी टँकरने पाणीपुरवठा करण्याचा पर्याय आहेच. तालुक्यात तीन टप्प्यांत पाणीटंचाई भासते. आॅक्टोबर ते डिसेंबर पहिला टप्पा. जानेवारी ते मार्च दुसरा टप्पा व एप्रिल ते जून तिसरा टप्पा अशाप्रकारे नियोजन केले आहे. आराखडा आॅक्टोबरमध्ये केल्यावर टंचाई नियोजनात इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघाच्या आमदार निर्मलाताई गावित, तहसीलदार महेंद्र पवार, गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे व जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाचे उपअभियंता वनमने यांच्या स्वाक्षरीने टंचाई नियोजन आराखडा तयार केला जातो. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात सहसा टंचाई स्थिती निर्माण होत नाही. यावर्षी सन २०१७ च्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस पडला होता. त्यामुळे टंचाई स्थिती अद्यापपावेतो सुरू झालेली नाही. दि. १९ रोजी सोमनाथनगर येथील पहिलाच प्रस्ताव दाखल झाला आहे. यावर्षी तिसºया टप्प्यात ज्यांना टंचाईची झळ पोहोचेल अशा ८५ गावांचा व १८३ वाड्या-पाड्यांचा आराखड्यात समावेश करण्यात आला आहे व त्या दृष्टीने प्रशासनाने नियोजन केले आहे. या नियोजनात ५५ गावांना व १०९ वाड्या-पाड्यांना नव्याने विंधनविहिरी घेणे प्रस्तावित आहे, तर टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी एकूण ३० गावे व ७० वाड्यांना व १०४ गावांना पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. असे तिसºया टप्प्यात एकूण ८५ गावे व १८३ वाड्या मिळून २६८ गावांचे टंचाई नियोजन करण्यात आले आहे.