शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
4
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
5
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
6
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
7
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
8
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
9
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
10
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
11
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
12
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
13
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
14
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
15
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
16
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
17
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
18
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
19
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
20
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकेश्वरला गोदावरी प्रदूषणमुक्तीसाठी मेपर्यंत मुदत

By admin | Updated: April 8, 2015 01:26 IST

त्र्यंबकेश्वरला गोदावरी प्रदूषणमुक्तीसाठी मेपर्यंत मुदत

  नाशिक : गोदावरी नदीत जाणारे सांडपाणी थांबविणे आणि अन्य कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्यासाठी त्र्यंबकेश्वर नगरपालिकेस मेअखेरपर्यंतची मुदत पुण्याच्या हरित न्यायाधिकरणाने दिली आहे. त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदीच्या उगमस्थानीच त्यावर झालेले कॉँक्रिटीकरण हटवावे आणि प्रदूषण थांबवावे या दोन मागण्यांसाठी ललिता शिंदे, निशिकांत पगारे आणि राजेश पंडित यांनी हरित न्यायाधिकरणात याचिका दाखल केली आहे. त्याआधारे न्यायाधिकरणाने नगरपालिकेस काही सूचना केल्या होत्या. नदीपात्रात जाणारे सांडपाणी थांबविण्यासाठी नगरपालिकेचे कामकाज सुरू असून, मे महिन्याच्या प्रारंभी हे काम पूर्ण होईल, अशी माहिती नगरपालिकेच्या वतीने देण्यात आली. नदीपात्रात जाणारे पूजेचे साहित्य आणि अन्य कचरा या माध्यमातून बायोमिथेन तयार करण्याच्या प्रकल्पाचे काम सुरू असून, हे कामही याच कालावधीत पूर्ण होईल, असे सांगण्यात आले. मात्र, न्यायाधिकरणाने आणखी काही दिवस मुदत देत २८ मेपर्यंत दोन्ही कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले. गोदापात्राला पूररेषेचे सीमांकन करण्याचे काम जलसंपदा विभागामार्फत सुरू असून, तेदेखील या कालावधीतच पूर्ण करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.