शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

द्वारकावर वाहतूक कोंडी कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 01:23 IST

नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरील द्वारका सर्कलवरील वाहतूक कोंडी ही नित्याचीच झाली आहे. विशेषत: सकाळी १० ते १२ व सायंकाळी ५ ते ७ यावेळेत मोठ्या संख्येने वाहतूक कोंडी होते़ नाशिक-पुणे, मुंबई-आग्रा महामार्गासह शहरातील विविध मार्गांना जोडणारा हा मुख्य चौक असल्याने चारही बाजूने येणाºया वाहनांची संख्या अधिक असल्याने येथील वाहतूक कोंडी ही नित्याचीच झाली आहे. त्यामुळे द्वारका चौकातील वाहतूक कोंडी कधी फुटणार? असा प्रश्न शहरवासीयांना पडला आहे. विशेष म्हणजे येथील वाहतूक कोंडी फोडताना वाहतूक पोलिसांनादेखील मोठी कसरत करावी लागते.

ठळक मुद्देवाहनचालक त्रस्त : पोलिसांची कसरतशहरांना विविध मार्गांना जोडणारा मुख्य चौक

नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरील द्वारका सर्कलवरील वाहतूक कोंडी ही नित्याचीच झाली आहे. विशेषत: सकाळी १० ते १२ व सायंकाळी ५ ते ७ यावेळेत मोठ्या संख्येने वाहतूक कोंडी होते़ नाशिक-पुणे, मुंबई-आग्रा महामार्गासह शहरातील विविध मार्गांना जोडणारा हा मुख्य चौक असल्याने चारही बाजूने येणाºया वाहनांची संख्या अधिक असल्याने येथील वाहतूक कोंडी ही नित्याचीच झाली आहे. त्यामुळे द्वारका चौकातील वाहतूक कोंडी कधी फुटणार? असा प्रश्न शहरवासीयांना पडला आहे. विशेष म्हणजे येथील वाहतूक कोंडी फोडताना वाहतूक पोलिसांनादेखील मोठी कसरत करावी लागते.मुंबई-आग्रा महामार्गाच्या विस्तारीकरणामध्ये उड्डाणपूल झाल्यानंतर या ठिकाणी पादचाºयांसाठी भुयारी मार्ग तयार करण्यात आला. या मार्गामुळे द्वारका चौकातील वाहतूक कोंडी दूर होईल. अशी नागरिकांची अपेक्षा होती़ मात्र, वाहतूक कोंडी दूर होण्याऐवजी कोंडी फोडण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे चौकातील वाहतुकीची स्थिती बिकट झाली आहे. विशेष म्हणजे पादचाºयांसाठी तयार करण्यात आलेला हा चौकातील भुयारी मार्गदेखील बंद आहे़ जुने नाशिक तसेच सारडा सर्कलकडून येणारे वाहनचालक बेशिस्तपणे वाहने चालवित असल्याने या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होते़ यामुळे केवळ वाहनधारकच नव्हे तर विद्यार्थी, पादचारी, ज्येष्ठ नागरिक, महिला यांनाही रस्ता ओलांडण्यासाठी कसरत करावी लागते.या ठिकाणच्या वाहतूक कोंडीत परिसरातील रिक्षाचालक व बसच्या थांब्यामुळे आणखी भर पडते़ रिक्षाचालकांची मुजोरी वाढत चालली असून, रस्त्यात कुठेही रिक्षा उभ्या करून प्रवासी बसविले जातात. तसेच द्वारका पोलीस चौकीजवळ असलेला बसथांबा व तिथेच उभे असलेले रिक्षाचालक यांच्यामध्ये वादाच्या घटनाही यापूर्वी घडलेल्या आहेत़ काठेगल्ली चौक ते द्वारकापर्यंतचा रस्त्यावर फळविक्रेते ठिकठिकाणी उभे असतात़ त्यामुळे नाशिकरोडहून शालिमारकडे जाणारी वाहतुकीस अडथळा होतो़ द्वारका सर्कलवरील या वाहतूक कोंडीमुळे या ठिकाणीरोजच लहान-मोठे अपघात होतात. त्यामुळे येथील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी नियोजनाची नितांत आवश्यकता आहे़सकाळ, सायंकाळी वाहनांच्या रांगाद्वारका सर्कलवरील वाहतूक कोंडी ही नेहमीचीच झाली आहे. विशेषत: सकाळी १० ते १२ व सायंकाळी ५ ते ७ यावेळेत मोठ्या संख्येने वाहतूक कोंडी होते़४शहरातील विविध मार्गांना जोडणारा हा मुख्य चौक असल्याने चारही बाजूने येणाºया वाहनांची संख्या अधिक असल्याने येथील वाहतूक कोंडी ही नित्याचीच बनली आहे.४वाहतूक कोंडी फोडताना वाहतूक पोलिसांनादेखील मोठी कसरत करावी लागते.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीस