शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
2
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
3
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
4
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
5
Rohini Acharya : "मला घाणेरड्या शिव्या दिल्या, मारायला चप्पल उचलली, आई-वडिलांना..."; रोहिणी यांची भावुक पोस्ट
6
प्यार किया तो डरना क्या! ८३ वर्षीय आजीच्या प्रेमात वेडा झाला २३ वर्षांचा तरुण, कुटुंबाने दिली साथ
7
याला म्हणतात धमाका शेअर...! फक्त 2 वर्षांत दिला 16000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल आता 5 बोनस शेअर वाटणार कंपनी
8
जैश टेरर मॉड्यूलवर मोठी कारवाई: अनंतनागमध्ये छाप्यानंतर हरियाणाची महिला डॉक्टर ताब्यात
9
अ‍ॅसिड फेकलं, छतावरुन ढकललं; 'तो' वाद टोकाला गेला, नवरा थेट बायकोच्या जीवावर उठला
10
Mumbai: वाकोला ते बीकेसी उन्नत मार्गाचे ८० टक्के काम पूर्ण; लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार!
11
गोरखपूरमध्ये उभारलं जातंय जागतिक दर्जाचे विज्ञान उद्यान; योगी सरकारने घेतला मोठा निर्णय
12
National Jamboree: ६१ वर्षांनंतर लखनौत ऐतिहासिक 'राष्ट्रीय जंबोरी'; ३२,००० हून अधिक स्काउट्स होणार सहभागी
13
घरबसल्या पैसे दुप्पट कसे होतील? तेजस्वी प्रकाशने सांगितला फॉर्म्युला, मुलींना दिला आर्थिक सल्ला
14
Mumbai: मुंबई महापालिकेच्या ३०० कोटींच्या उद्यान देखभालीच्या निविदा प्रक्रियेत संशयाच्या भोवरा
15
बिहार निवडणूक; 'या' मतदारसंघात भाजप उमेदवाराचा अवघ्या 30 मतांनी पराभव
16
IPL 2026 : रवींद्र जडेजाच्या पगारात ४ कोटींची कपात होण्यामागचं कारण काय? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
17
Tata Sierra आता नव्या रुपता! मिळणार ट्रिपल स्क्रीन सेटअप अन् अ‍ॅडव्हॉन्स फीचर्स, किती असेल किंमत? जाणून घ्या सविस्तर
18
BMC Election: सर्वपक्षीय १२८ माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेला पालिकेत हव्या १२५ जागा!
19
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: कसे कराल व्रत? शिवशंकर देतील शुभाशिर्वाद, कल्याण-मंगलच होणार!
20
Cyber Security: सर्वांचा डेटा आता होणार सुरक्षित, पुढील १८ महिन्यांत नियम आणखी कडक होणार!
Daily Top 2Weekly Top 5

द्वारकावर वाहतूक कोंडी कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 01:23 IST

नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरील द्वारका सर्कलवरील वाहतूक कोंडी ही नित्याचीच झाली आहे. विशेषत: सकाळी १० ते १२ व सायंकाळी ५ ते ७ यावेळेत मोठ्या संख्येने वाहतूक कोंडी होते़ नाशिक-पुणे, मुंबई-आग्रा महामार्गासह शहरातील विविध मार्गांना जोडणारा हा मुख्य चौक असल्याने चारही बाजूने येणाºया वाहनांची संख्या अधिक असल्याने येथील वाहतूक कोंडी ही नित्याचीच झाली आहे. त्यामुळे द्वारका चौकातील वाहतूक कोंडी कधी फुटणार? असा प्रश्न शहरवासीयांना पडला आहे. विशेष म्हणजे येथील वाहतूक कोंडी फोडताना वाहतूक पोलिसांनादेखील मोठी कसरत करावी लागते.

ठळक मुद्देवाहनचालक त्रस्त : पोलिसांची कसरतशहरांना विविध मार्गांना जोडणारा मुख्य चौक

नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरील द्वारका सर्कलवरील वाहतूक कोंडी ही नित्याचीच झाली आहे. विशेषत: सकाळी १० ते १२ व सायंकाळी ५ ते ७ यावेळेत मोठ्या संख्येने वाहतूक कोंडी होते़ नाशिक-पुणे, मुंबई-आग्रा महामार्गासह शहरातील विविध मार्गांना जोडणारा हा मुख्य चौक असल्याने चारही बाजूने येणाºया वाहनांची संख्या अधिक असल्याने येथील वाहतूक कोंडी ही नित्याचीच झाली आहे. त्यामुळे द्वारका चौकातील वाहतूक कोंडी कधी फुटणार? असा प्रश्न शहरवासीयांना पडला आहे. विशेष म्हणजे येथील वाहतूक कोंडी फोडताना वाहतूक पोलिसांनादेखील मोठी कसरत करावी लागते.मुंबई-आग्रा महामार्गाच्या विस्तारीकरणामध्ये उड्डाणपूल झाल्यानंतर या ठिकाणी पादचाºयांसाठी भुयारी मार्ग तयार करण्यात आला. या मार्गामुळे द्वारका चौकातील वाहतूक कोंडी दूर होईल. अशी नागरिकांची अपेक्षा होती़ मात्र, वाहतूक कोंडी दूर होण्याऐवजी कोंडी फोडण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे चौकातील वाहतुकीची स्थिती बिकट झाली आहे. विशेष म्हणजे पादचाºयांसाठी तयार करण्यात आलेला हा चौकातील भुयारी मार्गदेखील बंद आहे़ जुने नाशिक तसेच सारडा सर्कलकडून येणारे वाहनचालक बेशिस्तपणे वाहने चालवित असल्याने या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होते़ यामुळे केवळ वाहनधारकच नव्हे तर विद्यार्थी, पादचारी, ज्येष्ठ नागरिक, महिला यांनाही रस्ता ओलांडण्यासाठी कसरत करावी लागते.या ठिकाणच्या वाहतूक कोंडीत परिसरातील रिक्षाचालक व बसच्या थांब्यामुळे आणखी भर पडते़ रिक्षाचालकांची मुजोरी वाढत चालली असून, रस्त्यात कुठेही रिक्षा उभ्या करून प्रवासी बसविले जातात. तसेच द्वारका पोलीस चौकीजवळ असलेला बसथांबा व तिथेच उभे असलेले रिक्षाचालक यांच्यामध्ये वादाच्या घटनाही यापूर्वी घडलेल्या आहेत़ काठेगल्ली चौक ते द्वारकापर्यंतचा रस्त्यावर फळविक्रेते ठिकठिकाणी उभे असतात़ त्यामुळे नाशिकरोडहून शालिमारकडे जाणारी वाहतुकीस अडथळा होतो़ द्वारका सर्कलवरील या वाहतूक कोंडीमुळे या ठिकाणीरोजच लहान-मोठे अपघात होतात. त्यामुळे येथील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी नियोजनाची नितांत आवश्यकता आहे़सकाळ, सायंकाळी वाहनांच्या रांगाद्वारका सर्कलवरील वाहतूक कोंडी ही नेहमीचीच झाली आहे. विशेषत: सकाळी १० ते १२ व सायंकाळी ५ ते ७ यावेळेत मोठ्या संख्येने वाहतूक कोंडी होते़४शहरातील विविध मार्गांना जोडणारा हा मुख्य चौक असल्याने चारही बाजूने येणाºया वाहनांची संख्या अधिक असल्याने येथील वाहतूक कोंडी ही नित्याचीच बनली आहे.४वाहतूक कोंडी फोडताना वाहतूक पोलिसांनादेखील मोठी कसरत करावी लागते.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीस