शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
3
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
4
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
5
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
6
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
7
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
8
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
9
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
10
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
11
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
12
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
13
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
14
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
15
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
16
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
17
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
18
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
19
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
20
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
Daily Top 2Weekly Top 5

रेशनवरील तूर डाळीची योजना संपुष्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:42 IST

पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत गरीब कुटुंबांना पाच किलो गहू, तांदूळ तसेच एक किलो डाळ दिली जात होती. या योजनेत ...

पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत गरीब कुटुंबांना पाच किलो गहू, तांदूळ तसेच एक किलो डाळ दिली जात होती. या योजनेत चणा आणि तूर डाळ देण्यात आली. वास्तविक केवळ चणा डाळ देण्याची घेाषणाच सरकारने केली होती. परंतु नंतर तूर डाळ वाटपाला प्राधान्य देण्यात आले. योजना सुरू असतानाच्या कालावधीतदेखील डाळ वाटपाबाबतची अनियमितता निर्माण झाली होती. काही ठिकाणी डाळी पोहोचली तर काही भागात डाळ उपलब्धच झाली नाही. त्यामुळे अनेक कार्डधारक हे डाळीपासून वंचितच होते. कमी अधिक प्रमाणात जिल्ह्यात डाळींचे वितरण झाले आता मात्र योजनाच नसल्याने डाळही मिळणार नाही.

काेरोनाच्या काळात कुणीही उपाशी राहू नये म्हणून राबविण्यात आलेल्या पंतप्रधान गरीब कल्याण योजनेला एकदा मुदतवाढ देण्यात आली. वाढीव मुदतीनुसार नोव्हेंबर अखेर मुदत संपुष्टात आली; परंतु ऑक्टोबर महिन्यातील धान्य उशिरा प्राप्त झाल्यामुळे नोव्हेंबरमध्ये मेाफत धान्य याेजनेचे वाटप होऊ शकले नाही. त्यामुळे केंद्राकडून डिसेंबर अखेरची मुदत मागवून घेण्यात आली होती. आता ही योजनाच बंद झाल्यामुळे जानेवारीत कार्डधारकांना मोफतची डाळ उपलब्ध होऊ शकली नाही.

--इन्फो--

गहू आणि तांदूळ

मोफत धान्य योजना बंद झाल्यामुळे आता रेशनवर केवळ गहू, तांदूळ कार्डधारकांना मिळत आहे. अंत्योदय कार्डधारक वगळता अन्य कार्डधारकांना नियमानुसार गहू आणि तांदूळ यांचे वाटप केले जाते. जिल्ह्यातील २,६०७ दुकानांमधून धान्यांचा पुरवठा केला जातो. सध्या धान्य वितरणात विस्कळीतपणा आला आहे. दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असल्यामुळे पंजाब, हरयाणातून येणाऱ्या धान्य वाहतुकीवर काही प्रमाणात परिणाम जाणवू लागला आहे.

--इन्फो--

जिल्ह्यात २ हजारच्या जवळपास रेशन धान्य दुकाने आहेत. डिसेंबर अखेरपर्यंत मोफत धान्य योजनेचे वाटप सुरू होते. योजना नोव्हेंबरमध्ये संपुष्टात आली असली तरी योजेनचे धान्य वाटप करण्याची जबाबदारी दुकानदारांवर होती. त्यानुसार दुकानदारांनी वाढीव मुदत घेत डिसेंबर अखेरपर्यंत मोफत योजनेचे धान्य वाटप केले. जानेवारीपासून खऱ्य अर्थाने कार्डधारकांना डाळ मिळणे बंद झाले आहे. रेशनवर नियमित कार्डधारकांना गहू, तांदूळ मिळत आहेच; पण मोफत डाळ मिळणे बंद झाले आहे.