शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
3
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
4
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
5
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
6
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
7
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
8
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
9
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
10
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
11
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
12
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
13
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
14
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
15
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
16
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
17
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
18
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
19
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
20
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 

यंदा अधिक क्षमतेने गाळप होणार: श्रीराम शेटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2019 11:33 PM

कादवा सहकारी कारखाना उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक एफआरपी देणारा कारखाना असल्याने कादवा कारखान्यास ऊस देण्यास जिल्ह्यातील ऊस उत्पादक पसंती देतात; मात्र कादवा कारखान्याची यंत्रसामग्री जुनी झाल्याने व क्षमता कमी असल्याने पुरेसे गाळप करणे यापूर्वी शक्य होत नव्हते. कारखान्याने आधुनिकी- करणाचे काम पूर्ण केले असून, यावर्षी अधिक क्षमतेने गाळप होणार असल्याचे प्रतिपादन कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे यांनी केले.

ठळक मुद्देकादवा साखर कारखान्याचे बॉयलर अग्निप्रदीपन

दिंडोरी : कादवा सहकारी कारखाना उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक एफआरपी देणारा कारखाना असल्याने कादवा कारखान्यास ऊस देण्यास जिल्ह्यातील ऊस उत्पादक पसंती देतात; मात्र कादवा कारखान्याची यंत्रसामग्री जुनी झाल्याने व क्षमता कमी असल्याने पुरेसे गाळप करणे यापूर्वी शक्य होत नव्हते. कारखान्याने आधुनिकी- करणाचे काम पूर्ण केले असून, यावर्षी अधिक क्षमतेने गाळप होणार असल्याचे प्रतिपादन कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे यांनी केले.कादवा सहकारी साखर कारखान्याचा ४३ वा गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ शेटे यांच्या अध्यक्षतेखाली झाला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बॉयलरची पूजा सौ. व श्री. दत्तात्रय सुदामराव देशमुख (लखमापूर) व सौ. व श्री. भिकन माधवराव कोंड (करंजवण) यांच्या हस्ते झाली.श्रीराम शेटे पुढे म्हणाले की, नव्याने मिल, बॉयलर, टर्बाइन, पॅन चिमणी, आॅलिव्हर, क्रिस्टलायझर, व्हेपरसेल, शुगर ग्रेडर आदी मशिनरी बसविण्यात आल्या आहेत. त्यामुळे यावर्षी अधिक कार्यक्षमतेने गाळप होणे शक्य होणार आहे. जास्तीत जास्त गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे. भविष्यात इथेनॉल प्रकल्प करणे काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ऊस लागवड वाढीसाठी कारखान्याने सीडफार्ममध्ये व्हीएसआय प्रमाणित नवनवीन जातींची साडेपाच लाख ऊस रोपे तयार असून, शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त लागवड करावी, असे आवाहन श्रीराम शेटे यांनी केले.यावेळी जिल्हा बँक संचालक गणपतराव पाटील, नरेश देशमुख, बाळासाहेब नाठे, गौतम सुराणा, युनियनचे अध्यक्ष सुनील कावळे, विश्राम दुगजे, आत्माराम जाधव, तानाजी पगार आदींनी मार्गदर्शन केले. यावेळी उपाध्यक्ष उत्तमबाबा भालेराव, दत्तात्रेय पाटील, मधुकर गटकळ, त्र्यंबक संधान, बाळासाहेब जाधव, दिनकर जाधव, शहाजी सोमवंशी, विश्वनाथ देशमुख, बापू पडोळ, शिवाजी बस्ते, सुखदेव जाधव, सुभाष शिंदे, सुनील केदार, सुनील कावळे, संपतराव पाटील, संपतराव कोंड, विलास वाळके, बबनराव देशमुख, रामदास पिंगळ, शिवाजीराव जाधव, अशोक वाघ आदी उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन संचालक शहाजी सोमवंशी यांनी केले.राज्यातील साखर उद्योग अडचणीतसाखर संघाने विभागवार साखर कारखान्यांच्या बैठका घेत साखर उद्योगपुढील अडचणी जाणून घेतल्या आहेत. साखरेला मिळणाºया कमी भावामुळे साखर उद्योग अडचणीत आलेला आहे. एफआरपी देण्यासाठी केंद्र शासन सॉफ्ट लोन देत आहे; परंतु ते कर्ज असून ते सातत्याने वाढत आहे. निर्यात केलेल्या साखरेचे पैसे मिळण्यास विलंब होत असून, परिणामी सबसिडी सोडून द्यावी लागत असल्यामुळे साखर उद्योग अडचणीत आहे. शासनाने साखर उद्योगाला पॅकेज देण्याची गरज असल्याचेही श्रीराम शेटे यांनी सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकSugar factoryसाखर कारखाने