शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

एकाच आठवड्यात बिबट्याच्या हल्ल्याच्या तीन घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2020 10:03 PM

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य - वंजारवाडी रस्त्यावर असलेल्या सायखेडे शेतवस्तीवर येथील कैलास कर्पे यांच्या शेतवस्तीवर असलेल्या शिवाजी सायखेडे या शेतकर्याच्या एका जर्सी गायीच्या वासरावर पहाटे बिबट्याने हल्ला चढवत जखमी केल्याची घटना रविवारी (दि.10) घडली असून येथील शेतवस्तीवरील शेतकरी भयभीत झाले आहे.

ठळक मुद्देनांदूरवैद्य : पंधरा दिवसांपूर्वी श्वान व अकरा पिल्ले फस्त

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य - वंजारवाडी रस्त्यावर असलेल्या सायखेडे शेतवस्तीवर येथील कैलास कर्पे यांच्या शेतवस्तीवर असलेल्या शिवाजी सायखेडे या शेतकर्याच्या एका जर्सी गायीच्या वासरावर पहाटे बिबट्याने हल्ला चढवत जखमी केल्याची घटना रविवारी (दि.10) घडली असून येथील शेतवस्तीवरील शेतकरी भयभीत झाले आहे. पंधरा दिवसांपूर्वी या बिबट्याने हल्ला चढवत जवळच असलेल्या कैलास कर्पे यांनी पाळलेल्या कुञ्यावर झडप घालत फस्त केले असून येथे पुन्हा एकदा बिबट्याची दहशत वाढली असून वस्तीस राहणा-या शेतक-यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य येथील कर्पे तसेच सायखेडे मळ्यामध्ये याआधी देखील गायी, बैल आदींवर बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना घडल्या असून काही दिवसांपूर्वीच एक बिबट्या येथील शेतकरी कैलास कर्पे यांच्या निदर्शनास आला होता. या परिसरात शेती जास्त असल्यामुळे जंगलवाढ झालेली असून बिबट्याचा या परिसरात भक्ष शोधण्यासाठी नेहमी वावर असतो. याच पाशर््वभूमीवर रविवारी बिबट्याने सायखेडे यांच्या शेतवस्तीवरील घराजवळील गोठ्यात असलेल्या वासरावर बिबट्याने हल्ला चढवला असता जवळच असलेले कुञे भुंकायला लागल्यावर तसेच इतर शेतकर्यांनी आरडाओरडा केल्यानंतर सदर बिबट्याने घाबरून धूम ठोकली. बिबट्याच्या या हल्ल्यात माञ वासरू जखमी झाले आहे. याआधी दोन दिवसांपूर्वी याच वस्तीवर असलेल्या कर्पे यांच्या एका श्वानावर हल्ला चढवत ठार केले होते. तसेच जवळच असलेल्या शेतकर्यांनी देखील अनेकवेळा बिबट्या पाहिला असल्याचे सांगितले असून पुन्हा या ठिकाणी बिबट्याचा वावर वाढला असून या शेतवस्तीवर दोन पोल्ट्रीफार्म असल्याने तसेच येथील शेतकर्यांना दुग्धव्यवसायासाठी गावात जावे लागत असल्यामुळे शेतकरी भयभीत झाले असून या शेतवस्तीवर बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी दत्तु काजळे, नवनाथ कर्पे, नामदेव यंदे, मुकुंदा यंदे, रोहिदास सायखेडे, ज्ञानेश्वर कर्पे, सोपान कर्पे, लहानू सायखेडे, संतू सायखेडे, गोकुळ सायखेडे, आदी. शेतकर्यांनी केली आहे. या झालेल्या हल्ल्यामुळे येथील शेतवस्तीवर पुन्हा एकदा बिबट्याची दहशत वाढली असून शेतकरी धास्तावले आहेत. तरी वनविभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देवून सदर परिसरात पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी शेतवस्तीवरील शेतकरी करीत आहे.

 

टॅग्स :Farmerशेतकरीforestजंगल