शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

वादळी पावसाने जिल्ह्यात तिघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 1:57 AM

जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांमध्ये ठिकठिकाणी वादळीवाऱ्यासह कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे तिघांचा मृत्यू झाला असून, वीज पडून मयत झालेल्या इसमाच्या वारसांना तातडीची मदत म्हणून चार लाखांचा धनादेश प्रदान करण्यात आला आहे. याप्रकरणाचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झाला आहे.

नाशिक : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांमध्ये ठिकठिकाणी वादळीवाऱ्यासह कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे तिघांचा मृत्यू झाला असून, वीज पडून मयत झालेल्या इसमाच्या वारसांना तातडीची मदत म्हणून चार लाखांचा धनादेश प्रदान करण्यात आला आहे. याप्रकरणाचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झाला आहे.नाशिक जिल्ह्यातील अनेक भागांत गेल्या तीन ते चार दिवसांपासून वादळ वाºयासह पावसाच्या जोरदार सरी बरसल्या आहेत. विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे जिल्ह्णात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पावसामुळे नांदगाव तालुक्यातील सावरगाव येथील रहिवासी बाळू देवराम सावंत (४७) यांचे अंगावर वीजपडून त्यांचा मृत्यू झाल्याची घटना दि. ६ रोजी घडली. त्याचप्रमाणे येवला तालुक्यातील आडगाव चोथवा येथील लताबाई शिवराम अहेर (४५) आणि निफाड तालुक्यातील काथरगाव येथील रहिवासी द्वारकाबाई माणिक रणपीस (५५) या महिलांचा अंगावर भिंत कोसळून मृत्यू झाला.शासानाच्या नियमाप्रमाणे नैसर्गिक आपत्तीत मयत झाल्याने सावंत यांच्या वारसांना तातडीची मदत म्हणून चार लाख रुपयांचा धनादेश नांदगाव तहसीलदारांनी त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपुर्द केला आहे. वादळी पावसामुळे दि. ७ रोजी मौजे काथरगाव येथील रहिवासी द्वारकाबाई रणपिसे  यांचा रात्री ११ वाजेच्या सुमारास अंगावर भिंत पडल्याने मृत्यू झाला. सायंकाळपासून सुरू झालेल्या वादळी पावसामुळे घराची भिंत खचल्यामुळे ही दुर्घटना घडली. या घटनेत त्यांचे पती माणिक लक्ष्मण रणपिसे (६०) हेदेखील जखमी झाले आहेत. त्यांच्यावर निफाड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे दोघे पती-पत्नी या ठिकाणी राहत होते.येवला तहसीलदारांनी लताबाई शिवराम अहेर यांच्या मृत्यू संदर्भातील प्राथमिक अहवाल जिल्हाधिकाºयांकडे सादर केला आहे.नैसर्गिक आपत्तीमध्ये पूर आणि वीज अंगावरपडून झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना आर्थिक मदतीची तरतूद आहे. भिंत अंगावर पडून मयत झालेल्या दुर्दैवी घटनेबाबत आर्थिक तरतूद नसली तरी शासनाकडून मदत मिळण्यासाठी तसा अहवाल शासनला पाठविण्यात आला आहे.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी