शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
2
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
3
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
4
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
5
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
6
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
7
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
8
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
9
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
10
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
11
Marathi News LIVE: मुंबईकरांवर पाणीसंकट, १५ मेपासून १० टक्के पाणी कपातीचा निर्णय, जलाशयात घट
12
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा टोला
13
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
14
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
15
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
16
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
17
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
18
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
19
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
20
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
Daily Top 2Weekly Top 5

मनसे सोडणाऱ्यांना पुन्हा ‘नो एण्ट्री’?

By admin | Updated: January 3, 2017 23:39 IST

काहींना घरवापसीचे वेध : उमेदवारीबाबत वाढली स्पर्धा

नाशिक : महापालिकेत सत्ताधारी असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तब्बल २६ नगरसेवकांनी पक्षाला रामराम ठोकत सेना-भाजपाशी घरोबा केला आहे. परंतु, आता सेना-भाजपात मनसेतून आलेल्या नगरसेवकांना उमेदवारी देण्याबाबत पक्षातूनच विरोधाचे सूर उमटू लागल्याने संबंधित दलबदलूंना घाम फुटला आहे. त्यातून काही नगरसेवकांना पुन्हा स्वगृही परतण्याचे वेध लागले असले तरी मनसेने मात्र पक्ष सोडून गेलेल्यांना पुन्हा दारात उभे न करण्याची भूमिका घेतली असल्याची माहिती पक्षाच्या वरिष्ठ सूत्राने दिली. त्यामुळे येत्या काळात काहींची अवस्था ‘ना घरका ना घाटका’ अशी झाली तर आश्चर्य वाटायला नको.  महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर पक्षांतरे सुरू आहेत. त्याचा सर्वाधिक फटका हा सत्ताधारी मनसेला बसला आहे. मनसेच्या आतापर्यंत एका स्वीकृत सदस्यासह तब्बल २६ नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिलेली आहे. त्यात मनसेचे सर्वाधिक १६ सदस्य हे शिवसेनेत तर उर्वरित १० सदस्य हे भाजपात दाखल झालेले आहेत. आगामी महापालिका निवडणुकीत उमेदवारी मिळण्याच्या अपेक्षेनेच सदर सदस्यांनी पक्षांतर केलेले आहे, तर अनेकांना उमेदवारीबाबत शब्द दिला नसल्याचे सेना-भाजपातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.  मनसेतून सेना-भाजपात दाखल झालेल्या नगरसेवकांना पुन्हा उमेदवारी देण्याबाबत आता दोन्ही पक्षांतील निष्ठावंत कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांकडून विरोधाचा सूर आळवला जाऊ लागला आहे. काही नगरसेवकांची पुन्हा निवडून येण्याची क्षमताच नसल्याचेही वरिष्ठ स्तरावर पटवून दिले जात आहे. त्यामुळे, मनसेतून गेलेल्या सर्वांनाच पुन्हा उमेदवारी मिळेलच याची शाश्वती उरलेली नाही. त्यातच, काही नगरसेवकांनी सेना-भाजपात तिकिटासाठी वाढती स्पर्धा पाहून उमेदवारी मिळण्याबाबत धसका घेतला आहे. त्यांची अवस्था केविलवाणी बनली असून, पुन्हा स्वगृही परतण्याचे वेध लागले आहेत. परंतु, मनसेने मात्र आता पक्षाशी गद्दारी करून बाहेर गेलेल्यांना पुन्हा दरवाजे बंद असल्याची भूमिका घेतल्याचे समजते. त्यामुळे संबंधितांची घरवापसी अशक्य बनणार आहे. परिणामी, त्यांच्या एकूणच राजकीय अस्तित्वावरही प्रश्नचिन्ह लटकले आहे. (प्रतिनिधी)