शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
4
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
5
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
6
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
7
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
8
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
9
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
10
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."
11
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
12
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
13
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
14
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
15
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
16
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
17
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
18
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
19
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
20
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज

धरणात मोजका पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 22:35 IST

सिन्नर : यावर्षी तालुक्यात सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस झाल्याने टंचाईच्या संकटाचे सावट गडद होऊ लागले आहे. तालुक्यातील प्रत्येक धरणात मोजकाच पाणीसाठा शिल्लक असल्याने आहे ते पाणी वर्षभर टिकविण्यासाठी प्रशासनाला कसरत करावी लागणार आहे. धरणातील पाणीसाठा मोजका असल्याने आरक्षण लवकरात लवकर ठरवून, आहे ते पाणी राखण्यासाठी प्रशासनाला काळजी घ्यावी लागणार आहे अन्यथा पाणीटंचाईची तीव्रता भयानक होण्याची चिन्हे आत्तापासूनच दिसू लागली आहे.

ठळक मुद्देप्रशासनाची कसरत : सिन्नरला पाणी नियोजनाची गरज

सिन्नर : यावर्षी तालुक्यात सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस झाल्याने टंचाईच्या संकटाचे सावट गडद होऊ लागले आहे. तालुक्यातील प्रत्येक धरणात मोजकाच पाणीसाठा शिल्लक असल्याने आहे ते पाणी वर्षभर टिकविण्यासाठी प्रशासनाला कसरत करावी लागणार आहे. धरणातील पाणीसाठा मोजका असल्याने आरक्षण लवकरात लवकर ठरवून, आहे ते पाणी राखण्यासाठी प्रशासनाला काळजी घ्यावी लागणार आहे अन्यथा पाणीटंचाईची तीव्रता भयानक होण्याची चिन्हे आत्तापासूनच दिसू लागली आहे.तालुकाभरात यंदा एकही जोरदार पाऊस न पडल्याने सर्वच बंधारे, पाझर तलाव व नदी-नाले कोरडेठाक पडले आहेत. यावर्षी पाण्याची पातळी आॅक्टोबरमध्येच तळाशी गेली आहे. प्रत्येक धरणात मोजकाच पाणीसाठा आहे. सध्या ११ गावे ८२ वाड्यावस्त्यांवर टॅँकरच्या फेऱ्या सुरू आहेत. १४ खासगी व तीन शासकीय टॅँकरच्या दररोज ६५ फेºया कराव्या लागत असल्याने आॅक्टोबर महिन्यातच टंचाईची अवस्था निदर्शनास येते आहे. नवीन गावांचेही टॅँकर मागणीचे प्रस्ताव आले आहेत. सहा गावांचे ३० ते ३५ वाड्यावस्त्यांचे प्रस्ताव पंचायत समितीकडे प्राप्त झाले असून, मंजुरीसाठी ते पाठविण्यात येणार आहेत. यावर्षी पावसाने पाठ फिरवल्याने तालुक्याच्या सर्वच भागात दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. यंदा केवळ उशिराच्या पावसाने तालुक्याच्या पश्चिम भागातील बंधारे भरले होते. तालुक्यातील धरणांतील पाणीसाठ्यावर पिण्याच्या पाण्याची भिस्त आहे. धरणातील पाणीसाठ्याची सद्य:स्थितीभोजापूर धरण साठवण क्षमता (३६१ दशलक्ष घनफूट) - पैकी शिल्लक साठा २४९ (६८.९७%), ठाणगाव येथील उंबरदरी (५०. ३० दशलक्ष घनफूट )- सध्या शिल्लक ३०.६२ (६०%), कोनांबे धरण साठवण क्षमता (४७ दशलक्ष घनफूट) - शिल्लक ३०.६७ (६५.२५%), सरदवाडी धरण साठवण (क्षमता ६५ दशलक्ष घनफूट) - ३२.१५ (४९.४६%), बोरखिंड धरण साठवण क्षमता (५५ दशलक्ष घनफूट) - शिल्लक ३७.०४ (६७.३४%) आजमितीस इतका उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. सन २०१८-२०१९ या वर्षाकरिता पाणी आरक्षणाबाबत तहसीलदार, गटविकास अधिकारी, उपअभियंता पाणीपुरवठा विभाग यांच्या संयुक्तरीत्या अहवाल पाठविण्यात आला आहे. सिन्नर तालुक्यातील भोजापूर धरणाची साठवण क्षमता ३६१ दशलक्ष घनफूट असून, त्यातून मनेगावसह पाणी योजनेसाठी ३०.५२, कणकोरी योजनेसाठी ८.९५, चास, नळवाडी, सोनेवाडी, कासारवाडी या गावांसाठी ९.७० व निºहाळे/फत्तेपूर, घोटेवाडी, माळवाडी बंधाºयासाठी ४.३९ असे मिळून ५३.५६ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षणाची मागणी करण्यात आली आहे.सर्वच धरणांतून शेतीसाठीही पाण्याचा उपसा सुरू असल्याचे चित्र आहे. पिण्याच्या पाण्यासाठी विविध पाणी योजनांतून होणारा उपसा, परवाना घेतलेल्या लिप्ट योजना या सर्व बाबींचा विचार केल्यास उन्हाळ्यात या धरणांमध्ये किती पाणी शिल्लक राहील यावर आरक्षित गावांची तहान कशी भागेल, असा प्रश्न निर्माण होत आहे.

सिन्नर तालुक्यातील भोजापूर धरणात सध्या शिल्लक असलेला पाणीसाठा. प्रशासनाची कसरत : सिन्नरला पाणी नियोजनाची गरजधरणात मोजका पाणीसाठासिन्नर : यावर्षी तालुक्यात सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस झाल्याने टंचाईच्या संकटाचे सावट गडद होऊ लागले आहे. तालुक्यातील प्रत्येक धरणात मोजकाच पाणीसाठा शिल्लक असल्याने आहे ते पाणी वर्षभर टिकविण्यासाठी प्रशासनाला कसरत करावी लागणार आहे. धरणातील पाणीसाठा मोजका असल्याने आरक्षण लवकरात लवकर ठरवून, आहे ते पाणी राखण्यासाठी प्रशासनाला काळजी घ्यावी लागणार आहे अन्यथा पाणीटंचाईची तीव्रता भयानक होण्याची चिन्हे आत्तापासूनच दिसू लागली आहे.तालुकाभरात यंदा एकही जोरदार पाऊस न पडल्याने सर्वच बंधारे, पाझर तलाव व नदी-नाले कोरडेठाक पडले आहेत. यावर्षी पाण्याची पातळी आॅक्टोबरमध्येच तळाशी गेली आहे. प्रत्येक धरणात मोजकाच पाणीसाठा आहे. सध्या ११ गावे ८२ वाड्यावस्त्यांवर टॅँकरच्या फेऱ्या सुरू आहेत. १४ खासगी व तीन शासकीय टॅँकरच्या दररोज ६५ फेºया कराव्या लागत असल्याने आॅक्टोबर महिन्यातच टंचाईची अवस्था निदर्शनास येते आहे. नवीन गावांचेही टॅँकर मागणीचे प्रस्ताव आले आहेत. सहा गावांचे ३० ते ३५ वाड्यावस्त्यांचे प्रस्ताव पंचायत समितीकडे प्राप्त झाले असून, मंजुरीसाठी ते पाठविण्यात येणार आहेत. यावर्षी पावसाने पाठ फिरवल्याने तालुक्याच्या सर्वच भागात दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. यंदा केवळ उशिराच्या पावसाने तालुक्याच्या पश्चिम भागातील बंधारे भरले होते. तालुक्यातील धरणांतील पाणीसाठ्यावर पिण्याच्या पाण्याची भिस्त आहे. धरणातील पाणीसाठ्याची सद्य:स्थितीभोजापूर धरण साठवण क्षमता (३६१ दशलक्ष घनफूट) - पैकी शिल्लक साठा २४९ (६८.९७%), ठाणगाव येथील उंबरदरी (५०. ३० दशलक्ष घनफूट )- सध्या शिल्लक ३०.६२ (६०%), कोनांबे धरण साठवण क्षमता (४७ दशलक्ष घनफूट) - शिल्लक ३०.६७ (६५.२५%), सरदवाडी धरण साठवण (क्षमता ६५ दशलक्ष घनफूट) - ३२.१५ (४९.४६%), बोरखिंड धरण साठवण क्षमता (५५ दशलक्ष घनफूट) - शिल्लक ३७.०४ (६७.३४%) आजमितीस इतका उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. सन २०१८-२०१९ या वर्षाकरिता पाणी आरक्षणाबाबत तहसीलदार, गटविकास अधिकारी, उपअभियंता पाणीपुरवठा विभाग यांच्या संयुक्तरीत्या अहवाल पाठविण्यात आला आहे. सिन्नर तालुक्यातील भोजापूर धरणाची साठवण क्षमता ३६१ दशलक्ष घनफूट असून, त्यातून मनेगावसह पाणी योजनेसाठी ३०.५२, कणकोरी योजनेसाठी ८.९५, चास, नळवाडी, सोनेवाडी, कासारवाडी या गावांसाठी ९.७० व निºहाळे/फत्तेपूर, घोटेवाडी, माळवाडी बंधाºयासाठी ४.३९ असे मिळून ५३.५६ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षणाची मागणी करण्यात आली आहे.सर्वच धरणांतून शेतीसाठीही पाण्याचा उपसा सुरू असल्याचे चित्र आहे. पिण्याच्या पाण्यासाठी विविध पाणी योजनांतून होणारा उपसा, परवाना घेतलेल्या लिप्ट योजना या सर्व बाबींचा विचार केल्यास उन्हाळ्यात या धरणांमध्ये किती पाणी शिल्लक राहील यावर आरक्षित गावांची तहान कशी भागेल, असा प्रश्न निर्माण होत आहे.