शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

धरणात मोजका पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 22:35 IST

सिन्नर : यावर्षी तालुक्यात सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस झाल्याने टंचाईच्या संकटाचे सावट गडद होऊ लागले आहे. तालुक्यातील प्रत्येक धरणात मोजकाच पाणीसाठा शिल्लक असल्याने आहे ते पाणी वर्षभर टिकविण्यासाठी प्रशासनाला कसरत करावी लागणार आहे. धरणातील पाणीसाठा मोजका असल्याने आरक्षण लवकरात लवकर ठरवून, आहे ते पाणी राखण्यासाठी प्रशासनाला काळजी घ्यावी लागणार आहे अन्यथा पाणीटंचाईची तीव्रता भयानक होण्याची चिन्हे आत्तापासूनच दिसू लागली आहे.

ठळक मुद्देप्रशासनाची कसरत : सिन्नरला पाणी नियोजनाची गरज

सिन्नर : यावर्षी तालुक्यात सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस झाल्याने टंचाईच्या संकटाचे सावट गडद होऊ लागले आहे. तालुक्यातील प्रत्येक धरणात मोजकाच पाणीसाठा शिल्लक असल्याने आहे ते पाणी वर्षभर टिकविण्यासाठी प्रशासनाला कसरत करावी लागणार आहे. धरणातील पाणीसाठा मोजका असल्याने आरक्षण लवकरात लवकर ठरवून, आहे ते पाणी राखण्यासाठी प्रशासनाला काळजी घ्यावी लागणार आहे अन्यथा पाणीटंचाईची तीव्रता भयानक होण्याची चिन्हे आत्तापासूनच दिसू लागली आहे.तालुकाभरात यंदा एकही जोरदार पाऊस न पडल्याने सर्वच बंधारे, पाझर तलाव व नदी-नाले कोरडेठाक पडले आहेत. यावर्षी पाण्याची पातळी आॅक्टोबरमध्येच तळाशी गेली आहे. प्रत्येक धरणात मोजकाच पाणीसाठा आहे. सध्या ११ गावे ८२ वाड्यावस्त्यांवर टॅँकरच्या फेऱ्या सुरू आहेत. १४ खासगी व तीन शासकीय टॅँकरच्या दररोज ६५ फेºया कराव्या लागत असल्याने आॅक्टोबर महिन्यातच टंचाईची अवस्था निदर्शनास येते आहे. नवीन गावांचेही टॅँकर मागणीचे प्रस्ताव आले आहेत. सहा गावांचे ३० ते ३५ वाड्यावस्त्यांचे प्रस्ताव पंचायत समितीकडे प्राप्त झाले असून, मंजुरीसाठी ते पाठविण्यात येणार आहेत. यावर्षी पावसाने पाठ फिरवल्याने तालुक्याच्या सर्वच भागात दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. यंदा केवळ उशिराच्या पावसाने तालुक्याच्या पश्चिम भागातील बंधारे भरले होते. तालुक्यातील धरणांतील पाणीसाठ्यावर पिण्याच्या पाण्याची भिस्त आहे. धरणातील पाणीसाठ्याची सद्य:स्थितीभोजापूर धरण साठवण क्षमता (३६१ दशलक्ष घनफूट) - पैकी शिल्लक साठा २४९ (६८.९७%), ठाणगाव येथील उंबरदरी (५०. ३० दशलक्ष घनफूट )- सध्या शिल्लक ३०.६२ (६०%), कोनांबे धरण साठवण क्षमता (४७ दशलक्ष घनफूट) - शिल्लक ३०.६७ (६५.२५%), सरदवाडी धरण साठवण (क्षमता ६५ दशलक्ष घनफूट) - ३२.१५ (४९.४६%), बोरखिंड धरण साठवण क्षमता (५५ दशलक्ष घनफूट) - शिल्लक ३७.०४ (६७.३४%) आजमितीस इतका उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. सन २०१८-२०१९ या वर्षाकरिता पाणी आरक्षणाबाबत तहसीलदार, गटविकास अधिकारी, उपअभियंता पाणीपुरवठा विभाग यांच्या संयुक्तरीत्या अहवाल पाठविण्यात आला आहे. सिन्नर तालुक्यातील भोजापूर धरणाची साठवण क्षमता ३६१ दशलक्ष घनफूट असून, त्यातून मनेगावसह पाणी योजनेसाठी ३०.५२, कणकोरी योजनेसाठी ८.९५, चास, नळवाडी, सोनेवाडी, कासारवाडी या गावांसाठी ९.७० व निºहाळे/फत्तेपूर, घोटेवाडी, माळवाडी बंधाºयासाठी ४.३९ असे मिळून ५३.५६ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षणाची मागणी करण्यात आली आहे.सर्वच धरणांतून शेतीसाठीही पाण्याचा उपसा सुरू असल्याचे चित्र आहे. पिण्याच्या पाण्यासाठी विविध पाणी योजनांतून होणारा उपसा, परवाना घेतलेल्या लिप्ट योजना या सर्व बाबींचा विचार केल्यास उन्हाळ्यात या धरणांमध्ये किती पाणी शिल्लक राहील यावर आरक्षित गावांची तहान कशी भागेल, असा प्रश्न निर्माण होत आहे.

सिन्नर तालुक्यातील भोजापूर धरणात सध्या शिल्लक असलेला पाणीसाठा. प्रशासनाची कसरत : सिन्नरला पाणी नियोजनाची गरजधरणात मोजका पाणीसाठासिन्नर : यावर्षी तालुक्यात सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस झाल्याने टंचाईच्या संकटाचे सावट गडद होऊ लागले आहे. तालुक्यातील प्रत्येक धरणात मोजकाच पाणीसाठा शिल्लक असल्याने आहे ते पाणी वर्षभर टिकविण्यासाठी प्रशासनाला कसरत करावी लागणार आहे. धरणातील पाणीसाठा मोजका असल्याने आरक्षण लवकरात लवकर ठरवून, आहे ते पाणी राखण्यासाठी प्रशासनाला काळजी घ्यावी लागणार आहे अन्यथा पाणीटंचाईची तीव्रता भयानक होण्याची चिन्हे आत्तापासूनच दिसू लागली आहे.तालुकाभरात यंदा एकही जोरदार पाऊस न पडल्याने सर्वच बंधारे, पाझर तलाव व नदी-नाले कोरडेठाक पडले आहेत. यावर्षी पाण्याची पातळी आॅक्टोबरमध्येच तळाशी गेली आहे. प्रत्येक धरणात मोजकाच पाणीसाठा आहे. सध्या ११ गावे ८२ वाड्यावस्त्यांवर टॅँकरच्या फेऱ्या सुरू आहेत. १४ खासगी व तीन शासकीय टॅँकरच्या दररोज ६५ फेºया कराव्या लागत असल्याने आॅक्टोबर महिन्यातच टंचाईची अवस्था निदर्शनास येते आहे. नवीन गावांचेही टॅँकर मागणीचे प्रस्ताव आले आहेत. सहा गावांचे ३० ते ३५ वाड्यावस्त्यांचे प्रस्ताव पंचायत समितीकडे प्राप्त झाले असून, मंजुरीसाठी ते पाठविण्यात येणार आहेत. यावर्षी पावसाने पाठ फिरवल्याने तालुक्याच्या सर्वच भागात दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. यंदा केवळ उशिराच्या पावसाने तालुक्याच्या पश्चिम भागातील बंधारे भरले होते. तालुक्यातील धरणांतील पाणीसाठ्यावर पिण्याच्या पाण्याची भिस्त आहे. धरणातील पाणीसाठ्याची सद्य:स्थितीभोजापूर धरण साठवण क्षमता (३६१ दशलक्ष घनफूट) - पैकी शिल्लक साठा २४९ (६८.९७%), ठाणगाव येथील उंबरदरी (५०. ३० दशलक्ष घनफूट )- सध्या शिल्लक ३०.६२ (६०%), कोनांबे धरण साठवण क्षमता (४७ दशलक्ष घनफूट) - शिल्लक ३०.६७ (६५.२५%), सरदवाडी धरण साठवण (क्षमता ६५ दशलक्ष घनफूट) - ३२.१५ (४९.४६%), बोरखिंड धरण साठवण क्षमता (५५ दशलक्ष घनफूट) - शिल्लक ३७.०४ (६७.३४%) आजमितीस इतका उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. सन २०१८-२०१९ या वर्षाकरिता पाणी आरक्षणाबाबत तहसीलदार, गटविकास अधिकारी, उपअभियंता पाणीपुरवठा विभाग यांच्या संयुक्तरीत्या अहवाल पाठविण्यात आला आहे. सिन्नर तालुक्यातील भोजापूर धरणाची साठवण क्षमता ३६१ दशलक्ष घनफूट असून, त्यातून मनेगावसह पाणी योजनेसाठी ३०.५२, कणकोरी योजनेसाठी ८.९५, चास, नळवाडी, सोनेवाडी, कासारवाडी या गावांसाठी ९.७० व निºहाळे/फत्तेपूर, घोटेवाडी, माळवाडी बंधाºयासाठी ४.३९ असे मिळून ५३.५६ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षणाची मागणी करण्यात आली आहे.सर्वच धरणांतून शेतीसाठीही पाण्याचा उपसा सुरू असल्याचे चित्र आहे. पिण्याच्या पाण्यासाठी विविध पाणी योजनांतून होणारा उपसा, परवाना घेतलेल्या लिप्ट योजना या सर्व बाबींचा विचार केल्यास उन्हाळ्यात या धरणांमध्ये किती पाणी शिल्लक राहील यावर आरक्षित गावांची तहान कशी भागेल, असा प्रश्न निर्माण होत आहे.