शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
2
धनंजय मुंडेंनी माफी मागावी! ‘वंजारा-बंजारा एकच’ वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक
3
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
4
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
5
एक घर अन् ४२७१ मतदार! निवडणूक तोंडावर अन् AIने केली पोलखोल; कुठे घडला हा प्रकार?
6
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video
7
वारंवार हल्ले करणाऱ्या कुत्र्यांना जन्मठेप होणार! उत्तर प्रदेश सरकारने घेतला मोठा निर्णय
8
इश्क का जुनून! ६ मुलांचा ३८ वर्षीय बाप पडला १७ वर्षांच्या मुलीच्या प्रेमात; पुढे झालं असं काही...
9
ऑनलाईन गेमचा नाद लय बेकार! ११ लाख गमावल्यानंतर सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या
10
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी आमदार निर्मला ठोकळ यांचे निधन 
11
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
12
वाशीच्या दिशेने येणारा ट्रक उड्डाणपुलावरून कोसळला, मुंबई-पुणे महामार्गावरील घटना
13
Pitru Paksha 2025: पितृपक्षात कसे केले जाते दशमी श्राद्ध? वाचा महत्त्व, मुहूर्त आणि श्राद्धविधी!
14
दुकानं-बस वाहून गेल्या, सगळीकडे पाणीच पाणी! हिमाचलच्या मंडीमध्ये पावसामुळे हाहाकार; ३ जणांचा मृत्यू
15
१७ वर्षाच्या मुलीला अजूनही मासिक पाळी आली नाही; तपासणी करताच वेगळेच सत्य उघड, डॉक्टरही हैराण
16
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
17
अभिनेत्री हुमा कुरेशीने गुपचूप उरकला साखरपुडा, खाजगी समारंभातील फोटो आला समोर
18
आता कॅश काढण्यासाठी ATM ची गरज नाही! स्मार्टफोनने काढता येणार १०००० रुपये; कुठे मिळणार सुविधा?
19
यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा
20
पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का?

सुखकर उन्हाळ्यासाठी दिनचर्येत बदल आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 01:04 IST

थंडी थंडी म्हणता उन्हाळा येऊन दाखल झाला असून, तपमानातही परिवर्तन व्हायला सुरु वात झाली आहे. या पार्श्वभूमीवर दिनचर्येत बदल करणे आवश्यक आहे.

नाशिक : थंडी थंडी म्हणता उन्हाळा येऊन दाखल झाला असून, तपमानातही परिवर्तन व्हायला सुरु वात झाली आहे. या पार्श्वभूमीवर दिनचर्येत बदल करणे आवश्यक आहे. मात्र थंडी कमी झाली आणि ऊन पडू लागले म्हणजे उन्हाळा सुरू झाला असा समज करून न घेता या मित्र ऋतूला जपून सामोरे जावे, असे आवाहन वैद्यकीय सूत्रांनी केले आहे. भरपूर पाणी (थंड नको), संतुलित आहार व उन्हापासून संरक्षण या गोष्टी कटाक्षाने पाळल्यास उन्हाळा सुसह्य होऊ शकतो. सध्या तप्त ऊन पहायला मिळत नसले तरी दिवसभर कडक ऊन पहायला मिळत आहे. त्यामुळे कडक उन्हाळा सुरू होण्याअगोदरच दिनचर्येत बदल करून उन्हाला तोंड देण्याची तयारी करणे गरजेचे आहे. ती केल्यास कडक उन्हाळा सुकर जाईल, असे मतही व्यक्त करण्यात आले आहे.अशी घ्या काळजीतप्त दुपार आणि गरम हवा शरीरावरही परिणाम करते. त्यामुळे उन्हाळा आल्यानंतर जेवणाच्या दिनचर्येतही बदल गरजेचा आहे. उन्हाळ्यात अधिक तेलकट खाणे टाळावे. संतुलित आहार घ्यावा. दिवसाची सुरु वात लिंबू पाण्याने करा. दिवसभर जास्तीत जास्त पाणी पिणे आवश्यक असते. शरीरातील पाण्याची कमतरता दूर करणाºया टरबूज, काकडी, खरबूज, द्राक्षे, लिंबू, स्ट्रॉबेरी, सफरचंद, आंबे ही फळे घ्यावीत. त्यातून मिळणारे व्हिटॅमिन्स आणि खनिजे आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढवितात. या व्यतिरिक्त उन्हाळ्यात रॉक सॉल्ट (खनिज मीठ), जिरे, शोप, वेलची हे मसाले तसेच दही, कैरीचे पन्हे, पुदिना, बेलच्या फळाचा रस, सरबते, चटणी, जलजिरा या वस्तूंचे अधिक प्रमाणात सेवन करावे. सुती कपडे वापरावेत. गरज असेल तरच दुपारच्या वेळी उन्हात बाहेर पडावे. अन्यथा सकाळ-संध्याकाळच्या वेळेत आपली कामे पूर्ण करून घ्यावीत.मार्चअखेरपर्यंत थांबाथंडी कमी झाल्याने उन्हाळा सुरू झाला असा समज करून न घेता सध्या सावध भूमिका घेणे गरजेचे आहे. सध्या वसंतऋतूची चाहूल लागली असली तरी पानगळही सुरू आहे. त्यामुळे सध्या मिश्र ऋतू सुरू आहे. अशा ऋतूत थंड पेये, आइस्क्रीम, नैसर्गिक थंड पेये पिण्याचा मोह टाळावा. कारण हे पदार्थ घेतल्यास फ्लू, अंगदुखी आदी आजार वाढण्याची शक्यता आहे. १५ मार्चनंतरच खºया अर्थाने उन्हाळा सुरू होणार असल्याने तेव्हाच उन्हाळ्याशी निगडीत गोष्टी करा-व्यात.उन्हाळा सुरू झाल्याने या ऋ तूला अनुसरून दिनचर्या, आहार विहार असणे आवश्यक आहे. अति तिखट, अति थंड, अति तेलकट पदार्थ टाळावेत. सर्दी, खोकला, कफ होऊ देऊ नये. मधाचे, सुंठ्याचे पाणी प्यावे. ज्येष्ठमध खा. कोमट पाणी प्या. घरातून बाहेर पडताना सनक्रि न लोशन, स्कार्फ, समर कोट आदींचा वापर आवर्जून करावा. पाण्याचे प्रमाण वाढवावे.  - वैद्य विजय कुलकर्णी, आयुर्वेद तज्ज्ञऋतूला अनुसरून दिनचर्या ठेवली तर उन्हाळ्याला घाबरण्याचे काही कारण नाही. या दिवसात चांगल्या दर्जाचे गॉगल, स्कार्फ, टोपी यांचा वापर करावा. फ्रिजमधले पाणी पिण्यापेक्षा माठातले पाणी प्यावे. कार्बनयुक्त शीतपेये टाकून नैसर्गिक शीतपेये प्यावीत. बाहेर पडताना सोबत छत्री, पाण्याची बाटली, ग्लुकोज, लिंबूपाणी आवर्जून ठेवावे.- डॉ. नरेंद्र पाटील, फॅमिली फिजिशियन

टॅग्स :Nashikनाशिक