शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
2
अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
3
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
4
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
5
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
6
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
7
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
8
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
9
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन
10
धक्कादायक! अखेर ७ सिंहांना मृत्यूदंडाची शिक्षा; 'जंगलाच्या राजा'ला मारण्याची तयारी कोण करतंय?
11
₹१६०० पर्यंत जाणार Paytm चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, आजही शेअरमध्ये मोठी तेजी
12
'एकाच ठिकाणी.. कुठे तरी राहा' राज ठाकरेंनी पिट्याभाईला सुनावले
13
...अन् व्हीलचेअरवर बसलेल्या प्रतीकासाठी PM मोदींनी स्वतः आणून दिला तिच्या आवडीचा पदार्थ (VIDEO)
14
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
15
Video - बापाची धडपड! ट्रॅफिकमध्ये अडकलेली रुग्णवाहिका, आजारी लेकीला उचलून घेऊन...
16
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
17
अमित शाहांनी म्हटलं, 'पिंटू बडा आदमी बनेगा'; काही क्षणांनी भाजपा उमेदवाराचा अश्लील व्हिडिओ व्हायरल
18
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
19
Mahabharat: शुक्राचार्यांना एकच डोळा का? ते शिवपुत्र होते? नावामागेही आहे रोचक कथा!
20
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी

सुखकर उन्हाळ्यासाठी दिनचर्येत बदल आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 01:04 IST

थंडी थंडी म्हणता उन्हाळा येऊन दाखल झाला असून, तपमानातही परिवर्तन व्हायला सुरु वात झाली आहे. या पार्श्वभूमीवर दिनचर्येत बदल करणे आवश्यक आहे.

नाशिक : थंडी थंडी म्हणता उन्हाळा येऊन दाखल झाला असून, तपमानातही परिवर्तन व्हायला सुरु वात झाली आहे. या पार्श्वभूमीवर दिनचर्येत बदल करणे आवश्यक आहे. मात्र थंडी कमी झाली आणि ऊन पडू लागले म्हणजे उन्हाळा सुरू झाला असा समज करून न घेता या मित्र ऋतूला जपून सामोरे जावे, असे आवाहन वैद्यकीय सूत्रांनी केले आहे. भरपूर पाणी (थंड नको), संतुलित आहार व उन्हापासून संरक्षण या गोष्टी कटाक्षाने पाळल्यास उन्हाळा सुसह्य होऊ शकतो. सध्या तप्त ऊन पहायला मिळत नसले तरी दिवसभर कडक ऊन पहायला मिळत आहे. त्यामुळे कडक उन्हाळा सुरू होण्याअगोदरच दिनचर्येत बदल करून उन्हाला तोंड देण्याची तयारी करणे गरजेचे आहे. ती केल्यास कडक उन्हाळा सुकर जाईल, असे मतही व्यक्त करण्यात आले आहे.अशी घ्या काळजीतप्त दुपार आणि गरम हवा शरीरावरही परिणाम करते. त्यामुळे उन्हाळा आल्यानंतर जेवणाच्या दिनचर्येतही बदल गरजेचा आहे. उन्हाळ्यात अधिक तेलकट खाणे टाळावे. संतुलित आहार घ्यावा. दिवसाची सुरु वात लिंबू पाण्याने करा. दिवसभर जास्तीत जास्त पाणी पिणे आवश्यक असते. शरीरातील पाण्याची कमतरता दूर करणाºया टरबूज, काकडी, खरबूज, द्राक्षे, लिंबू, स्ट्रॉबेरी, सफरचंद, आंबे ही फळे घ्यावीत. त्यातून मिळणारे व्हिटॅमिन्स आणि खनिजे आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढवितात. या व्यतिरिक्त उन्हाळ्यात रॉक सॉल्ट (खनिज मीठ), जिरे, शोप, वेलची हे मसाले तसेच दही, कैरीचे पन्हे, पुदिना, बेलच्या फळाचा रस, सरबते, चटणी, जलजिरा या वस्तूंचे अधिक प्रमाणात सेवन करावे. सुती कपडे वापरावेत. गरज असेल तरच दुपारच्या वेळी उन्हात बाहेर पडावे. अन्यथा सकाळ-संध्याकाळच्या वेळेत आपली कामे पूर्ण करून घ्यावीत.मार्चअखेरपर्यंत थांबाथंडी कमी झाल्याने उन्हाळा सुरू झाला असा समज करून न घेता सध्या सावध भूमिका घेणे गरजेचे आहे. सध्या वसंतऋतूची चाहूल लागली असली तरी पानगळही सुरू आहे. त्यामुळे सध्या मिश्र ऋतू सुरू आहे. अशा ऋतूत थंड पेये, आइस्क्रीम, नैसर्गिक थंड पेये पिण्याचा मोह टाळावा. कारण हे पदार्थ घेतल्यास फ्लू, अंगदुखी आदी आजार वाढण्याची शक्यता आहे. १५ मार्चनंतरच खºया अर्थाने उन्हाळा सुरू होणार असल्याने तेव्हाच उन्हाळ्याशी निगडीत गोष्टी करा-व्यात.उन्हाळा सुरू झाल्याने या ऋ तूला अनुसरून दिनचर्या, आहार विहार असणे आवश्यक आहे. अति तिखट, अति थंड, अति तेलकट पदार्थ टाळावेत. सर्दी, खोकला, कफ होऊ देऊ नये. मधाचे, सुंठ्याचे पाणी प्यावे. ज्येष्ठमध खा. कोमट पाणी प्या. घरातून बाहेर पडताना सनक्रि न लोशन, स्कार्फ, समर कोट आदींचा वापर आवर्जून करावा. पाण्याचे प्रमाण वाढवावे.  - वैद्य विजय कुलकर्णी, आयुर्वेद तज्ज्ञऋतूला अनुसरून दिनचर्या ठेवली तर उन्हाळ्याला घाबरण्याचे काही कारण नाही. या दिवसात चांगल्या दर्जाचे गॉगल, स्कार्फ, टोपी यांचा वापर करावा. फ्रिजमधले पाणी पिण्यापेक्षा माठातले पाणी प्यावे. कार्बनयुक्त शीतपेये टाकून नैसर्गिक शीतपेये प्यावीत. बाहेर पडताना सोबत छत्री, पाण्याची बाटली, ग्लुकोज, लिंबूपाणी आवर्जून ठेवावे.- डॉ. नरेंद्र पाटील, फॅमिली फिजिशियन

टॅग्स :Nashikनाशिक