शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

सुखकर उन्हाळ्यासाठी दिनचर्येत बदल आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 01:04 IST

थंडी थंडी म्हणता उन्हाळा येऊन दाखल झाला असून, तपमानातही परिवर्तन व्हायला सुरु वात झाली आहे. या पार्श्वभूमीवर दिनचर्येत बदल करणे आवश्यक आहे.

नाशिक : थंडी थंडी म्हणता उन्हाळा येऊन दाखल झाला असून, तपमानातही परिवर्तन व्हायला सुरु वात झाली आहे. या पार्श्वभूमीवर दिनचर्येत बदल करणे आवश्यक आहे. मात्र थंडी कमी झाली आणि ऊन पडू लागले म्हणजे उन्हाळा सुरू झाला असा समज करून न घेता या मित्र ऋतूला जपून सामोरे जावे, असे आवाहन वैद्यकीय सूत्रांनी केले आहे. भरपूर पाणी (थंड नको), संतुलित आहार व उन्हापासून संरक्षण या गोष्टी कटाक्षाने पाळल्यास उन्हाळा सुसह्य होऊ शकतो. सध्या तप्त ऊन पहायला मिळत नसले तरी दिवसभर कडक ऊन पहायला मिळत आहे. त्यामुळे कडक उन्हाळा सुरू होण्याअगोदरच दिनचर्येत बदल करून उन्हाला तोंड देण्याची तयारी करणे गरजेचे आहे. ती केल्यास कडक उन्हाळा सुकर जाईल, असे मतही व्यक्त करण्यात आले आहे.अशी घ्या काळजीतप्त दुपार आणि गरम हवा शरीरावरही परिणाम करते. त्यामुळे उन्हाळा आल्यानंतर जेवणाच्या दिनचर्येतही बदल गरजेचा आहे. उन्हाळ्यात अधिक तेलकट खाणे टाळावे. संतुलित आहार घ्यावा. दिवसाची सुरु वात लिंबू पाण्याने करा. दिवसभर जास्तीत जास्त पाणी पिणे आवश्यक असते. शरीरातील पाण्याची कमतरता दूर करणाºया टरबूज, काकडी, खरबूज, द्राक्षे, लिंबू, स्ट्रॉबेरी, सफरचंद, आंबे ही फळे घ्यावीत. त्यातून मिळणारे व्हिटॅमिन्स आणि खनिजे आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढवितात. या व्यतिरिक्त उन्हाळ्यात रॉक सॉल्ट (खनिज मीठ), जिरे, शोप, वेलची हे मसाले तसेच दही, कैरीचे पन्हे, पुदिना, बेलच्या फळाचा रस, सरबते, चटणी, जलजिरा या वस्तूंचे अधिक प्रमाणात सेवन करावे. सुती कपडे वापरावेत. गरज असेल तरच दुपारच्या वेळी उन्हात बाहेर पडावे. अन्यथा सकाळ-संध्याकाळच्या वेळेत आपली कामे पूर्ण करून घ्यावीत.मार्चअखेरपर्यंत थांबाथंडी कमी झाल्याने उन्हाळा सुरू झाला असा समज करून न घेता सध्या सावध भूमिका घेणे गरजेचे आहे. सध्या वसंतऋतूची चाहूल लागली असली तरी पानगळही सुरू आहे. त्यामुळे सध्या मिश्र ऋतू सुरू आहे. अशा ऋतूत थंड पेये, आइस्क्रीम, नैसर्गिक थंड पेये पिण्याचा मोह टाळावा. कारण हे पदार्थ घेतल्यास फ्लू, अंगदुखी आदी आजार वाढण्याची शक्यता आहे. १५ मार्चनंतरच खºया अर्थाने उन्हाळा सुरू होणार असल्याने तेव्हाच उन्हाळ्याशी निगडीत गोष्टी करा-व्यात.उन्हाळा सुरू झाल्याने या ऋ तूला अनुसरून दिनचर्या, आहार विहार असणे आवश्यक आहे. अति तिखट, अति थंड, अति तेलकट पदार्थ टाळावेत. सर्दी, खोकला, कफ होऊ देऊ नये. मधाचे, सुंठ्याचे पाणी प्यावे. ज्येष्ठमध खा. कोमट पाणी प्या. घरातून बाहेर पडताना सनक्रि न लोशन, स्कार्फ, समर कोट आदींचा वापर आवर्जून करावा. पाण्याचे प्रमाण वाढवावे.  - वैद्य विजय कुलकर्णी, आयुर्वेद तज्ज्ञऋतूला अनुसरून दिनचर्या ठेवली तर उन्हाळ्याला घाबरण्याचे काही कारण नाही. या दिवसात चांगल्या दर्जाचे गॉगल, स्कार्फ, टोपी यांचा वापर करावा. फ्रिजमधले पाणी पिण्यापेक्षा माठातले पाणी प्यावे. कार्बनयुक्त शीतपेये टाकून नैसर्गिक शीतपेये प्यावीत. बाहेर पडताना सोबत छत्री, पाण्याची बाटली, ग्लुकोज, लिंबूपाणी आवर्जून ठेवावे.- डॉ. नरेंद्र पाटील, फॅमिली फिजिशियन

टॅग्स :Nashikनाशिक