शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

...तर नाशिककरांवरील जलसंकट अधिक गहिरे होणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 16:15 IST

नाशिक- धरणांचा जिल्हा असलेल्या नाशिकमध्ये काही तालुके तेथील स्थानिक अपुऱ्या पर्जन्यमानामुळे दुष्काळी आहेत. परंतु तब्बल पाच धरणांतून पाणीपुरवठा होऊनदेखील नाशिक शहराला आता नियमितपणे पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असेल तर त्याचे खरोखरीच आॅडिट होणे गरजेचे आहे. धरणातून पाणी वाढले, परंतु वितरणावर नियंत्रण नाही, बेसुमार वापर आणि दुरगामी नियोजन नाही यामुळे मुबलकता असूनही शहरावर जलसंकट अधिक गहिरे होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देअनागोंदी कारभारनियोजनाचा अभावबेसुमार पाणीपुरवठा

संजय पाठक, नाशिकधरणांचा जिल्हा असलेल्या नाशिकमध्ये काही तालुके तेथील स्थानिक अपुऱ्या पर्जन्यमानामुळे दुष्काळी आहेत. परंतु तब्बल पाच धरणांतून पाणीपुरवठा होऊनदेखील नाशिक शहराला आता नियमितपणे पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असेल तर त्याचे खरोखरीच आॅडिट होणे गरजेचे आहे. धरणातून पाणी वाढले, परंतु वितरणावर नियंत्रण नाही, बेसुमार वापर आणि दुरगामी नियोजन नाही यामुळे मुबलकता असूनही शहरावर जलसंकट अधिक गहिरे होण्याची शक्यता आहे.

नाशिक म्हटले की मुबलक पाणी असा एक समज आहे. नाशिकमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनादेखील हीच जमेची बाजू आवर्जुन सांगितली जाते. परंतु गेल्या काही वर्षांत नाशिकमध्ये दरवर्षीच पावसाने ओढ दिल्याने पाणीकपात करावी लागत आहे. पावसाने ओढ देणे ही नैसर्गिक बाब असली तरी मुळातच जुलै आॅगस्टपर्यंत पाणीपुरेल अशा पद्धतीचे कोणतेही नियोजन महापालिकेकडे नाही. पाण्याच्या बेसुमार वापराविषयी वेळोवेळी चर्चा होतेच, परंतु सुमारे 70 ते 80 दशलक्ष लिटर्स पाण्याच्या बिलांचा हिशेबच लागत नाही, हे पाणी कोठे मुरते या संदर्भात जलसंपदा विभागाने वारंवार प्रश्न करूनदेखील महापालिकेला त्याचा सविस्तर अहवाल सादर करता आलेला नाही.

नाशिक शहराला गंगापूर धरणातून पाणीपुरवठा केला जातो. पूर्वी या धरणाची क्षमता ७२०० दशलक्ष घनफूट होती. ती आता ५६०० झाली आहे. म्हणून धरण समूहात कश्यपी आणि गौतमी गोदावरी ही दोन मध्यम प्रकारची धरणेदेखील बांधण्यात आली आहेत, तर दारणा धरणातून जेमतेम नाशिकरोड विभागापुरते पाणी घेतले जात असले तरी आता नाशिक शहरासाठी मुकणे धरणाच्या माध्यमातून मोठा साठा उपलब्ध झाला आहे. या धरणाची साठवण क्षमताही सात हजार २३९ दशलक्ष घनफूट आहे. म्हणजेच पाच धरणांमधून पाणीपुरवठा होत असताना वितरणाचे नियोजन नाही. गेल्या दोन वर्षांत शहरात ८५ दशलक्ष लिटर्स पाण्याचा पुरवठा वाढला आहे. नैसर्गिकरीत्या पाण्याची मागणी वाढणार हे समजू शकतो. मात्र, अभियांत्रिकीय दृष्टिकोनातून विचार केला तर दरडोई पाणीपुरवठ्याच्या निकषानुसार शहरात पाच लाख ६६ हजार नागरिक वाढले काय? असा प्रश्न निर्माण होतो. परंतु याचे उत्तर प्रशासनाकडे नाही.

गेल्या काही वर्षांत पाणीपुरवठा विभागाचे सर्वच नियोजन चुकत आहे. जलकुंभांचे टेंडर काढण्याची स्पर्धा लागली आहे. मात्र, त्यासाठी सुयोग्य वितरण वाहिन्यांचे जाळे विणलेले नाही. मुळातच रस्ते आणि इमारत बांधकाम हा नगरसेवकांचा आवडीचा विषय असल्याने पाणीपुरवठा विभागाला पुरेसे बजेटच मिळाले नाही. तुकाराम मुंढे यांनी यासाठी लक्ष घालून जलवाहिन्यांचा आराखडा तयार केला. त्यासाठी साडेतीनशे कोटींची गरज होती. मात्र, जमिनीखालील कामे केली, तर नागरिकांना दिसत नाही, त्यामुळे नगरसेवकांनी आणि आमदारांनीदेखील त्यांना निधी देण्यास विरोध केला होता. आता मुंढे गेल्यानंतर तर आर्थिक नियोजन आणखी कोलमडले आहे. इंजिनिअर्सचा अभाव, प्रत्येक कामाचे खासगीकरण आणि त्यातून मिळणारे लाभ यापलीकडे मनुष्यबळाचे नियोजन नाही दूरदृष्टी नाही असे एकूणच कामकाज सुरू आहे. वीस वर्षांपूर्वी गंगापूर धरणातून थेट जलवाहिनी योजना राबविण्यात आली. आता त्या जलवाहिनी कालबाह्य होत आल्या तरी त्याला पर्यायी व्यवस्था नाही. साधे गंगापूर धरणातील जलबोगद्यापर्यंत पाणी आणण्यासाठी एक छोटा स्ट्रेच टाकण्याचे काम वीस वर्षांपासून अपूर्ण आहे ते सुद्धा पूर्ण झाले नाही की, चेहेडी बंधाºयातून पाणी उचलताना वालदेवीच्या दूषित पाण्याचा प्रश्नदेखील सोडविला गेला नाही.

नाशिक शहरात पूर्वी पाणीकपात म्हटल्यावर आश्चर्याचा धक्का बसायचा. मात्र आता ही नियमित बाब झाली आहे. त्याच महापालिकेच्या प्रशासनाला आणि पाच पाच टर्म निवडून येणाºया नगरसेवकांना काहीच वाटेनासे झाले आहे. त्यामुळेच भविष्यात नाशिककरांवर जलसंकट आणखी गहिरे होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाwater scarcityपाणी टंचाईDamधरण