शहरं
Join us  
Trending Stories
1
चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले...
2
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
3
"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
5
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
6
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
7
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
8
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
9
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
10
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
11
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
12
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
13
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
14
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
15
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
16
'वापरा आणि फेकून द्या' हीच मंत्री मुश्रीफ यांची नीती, संजय मंडलिक यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
17
...तर युती बराचवेळ टीकेल', हसन मुश्रीफ अन् समरजित घाटगे एकत्र आले, नेमकं काय घडलं सगळंच सांगितलं
18
बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर...
19
BCCI नं टीम इंडियाची बांगलादेशविरुद्धची द्विपक्षीय मालिका केली स्थगित; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

पाणीप्रश्नी भामरे-चव्हाणांमध्ये श्रेयवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 23:52 IST

नाशिक : नेहमीच अवर्षणग्रस्त असलेल्या बागलाण तालुक्यासाठी हरणबारी व केळझर धरणातून सुमारे ५३ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित ठेवण्यास जलसंपदा खात्याने मान्यता दिल्यामुळे आगामी निवडणुकीच्या तोंडावर खासदार तथा संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे व आमदार दीपिका चव्हाण यांच्यात श्रेयवाद सुरू झाला असून, दोघांनीही आपल्या पाठपुराव्यामुळे पाणीप्रश्न सुटल्याचे म्हटले आहे.

ठळक मुद्देबागलाण : केळझर, हरणबारीतून ५३ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित

नाशिक : नेहमीच अवर्षणग्रस्त असलेल्या बागलाण तालुक्यासाठी हरणबारी व केळझर धरणातून सुमारे ५३ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित ठेवण्यास जलसंपदा खात्याने मान्यता दिल्यामुळे आगामी निवडणुकीच्या तोंडावर खासदार तथा संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे व आमदार दीपिका चव्हाण यांच्यात श्रेयवाद सुरू झाला असून, दोघांनीही आपल्या पाठपुराव्यामुळे पाणीप्रश्न सुटल्याचे म्हटले आहे.जलसंपदा विभागाच्या निर्णयामुळे साल्हेर वळण योजना क्रमांक एकमधून १४.३६ दशलक्ष घनफूट, साल्हेर वळण योजना क्रमांक २ मधून २१.९१ दशलक्ष घनफूट व वाघंबा वळण योजनेतून १६.७५ दशलक्ष घनफूट इतके पाणी बागलाण तालुक्याला मिळणार असून, या हरणबारी धरणातून पाणी मिळावे यासाठी जनतेने आंदोलने केली आहेत. पारनेर, निताणे, आखतवाडे, गोराणे, आनंदपूर, कोटबेल, फोफीर, खिरमाणे, रातीर, सारदे, कºहे, चौगाव, अजमेर, सौंदाणे, देवळाणे, वायगाव, भाक्षी, मुळाणे या गावांना दरवर्षी पाणी प्रश्न भेडसावित असून, त्यासाठी पाठपुरावाही झाला आहे; परंतु दखल घेतली जात नसल्याने बाजार समिती निवडणुकीत ग्रामस्थांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. संरक्षणमंत्री भामरे यांच्यामुळेच सरकारला निर्णय घ्यावा लागल्याचा तर आमदार चव्हाण यांनी प्रधान सचिवांसोबत बैठक घेतल्यामुळे पाणी प्रश्न सुटल्याचे समर्थकांचे म्हणणे आहे. दोन्ही बाजूंनी कामाचे श्रेय घेताना आजवरच्या पत्राचा संदर्भ देत पुरावे जाहीर केले आहेत. तत्कालीन आघाडी सरकारने बागलाणसाठी योजना व्यवहार्य नसल्याचे सांगून फेटाळली होती; आमदार दीपिका चव्हाण व संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी आपापल्या पातळीवर या संदर्भात पाठपुरावा सुरू ठेवला होता. तरीही विलंब होत असल्याचे पाहून अलीकडेच वीरगाव येथे शेतकऱ्यांनी आंदोलनही छेडले होते.जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी तळवाडे भामेर एक्स्प्रेस कालवा, हरणबारी, केळझर चारी क्रमांक ८ व सटाणा शहरासाठी पाणी योजना मंजूर करण्याचा निर्णय घेतला. आता जलसंपदा खात्याने हरणबारी व केळझरमधील पाणी बागलाणसाठी राखीव ठेवण्यास अनुमती दिल्याने त्यातून श्रेयवाद सुरू झाला.