शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

पाणीप्रश्नी भामरे-चव्हाणांमध्ये श्रेयवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 23:52 IST

नाशिक : नेहमीच अवर्षणग्रस्त असलेल्या बागलाण तालुक्यासाठी हरणबारी व केळझर धरणातून सुमारे ५३ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित ठेवण्यास जलसंपदा खात्याने मान्यता दिल्यामुळे आगामी निवडणुकीच्या तोंडावर खासदार तथा संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे व आमदार दीपिका चव्हाण यांच्यात श्रेयवाद सुरू झाला असून, दोघांनीही आपल्या पाठपुराव्यामुळे पाणीप्रश्न सुटल्याचे म्हटले आहे.

ठळक मुद्देबागलाण : केळझर, हरणबारीतून ५३ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित

नाशिक : नेहमीच अवर्षणग्रस्त असलेल्या बागलाण तालुक्यासाठी हरणबारी व केळझर धरणातून सुमारे ५३ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित ठेवण्यास जलसंपदा खात्याने मान्यता दिल्यामुळे आगामी निवडणुकीच्या तोंडावर खासदार तथा संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे व आमदार दीपिका चव्हाण यांच्यात श्रेयवाद सुरू झाला असून, दोघांनीही आपल्या पाठपुराव्यामुळे पाणीप्रश्न सुटल्याचे म्हटले आहे.जलसंपदा विभागाच्या निर्णयामुळे साल्हेर वळण योजना क्रमांक एकमधून १४.३६ दशलक्ष घनफूट, साल्हेर वळण योजना क्रमांक २ मधून २१.९१ दशलक्ष घनफूट व वाघंबा वळण योजनेतून १६.७५ दशलक्ष घनफूट इतके पाणी बागलाण तालुक्याला मिळणार असून, या हरणबारी धरणातून पाणी मिळावे यासाठी जनतेने आंदोलने केली आहेत. पारनेर, निताणे, आखतवाडे, गोराणे, आनंदपूर, कोटबेल, फोफीर, खिरमाणे, रातीर, सारदे, कºहे, चौगाव, अजमेर, सौंदाणे, देवळाणे, वायगाव, भाक्षी, मुळाणे या गावांना दरवर्षी पाणी प्रश्न भेडसावित असून, त्यासाठी पाठपुरावाही झाला आहे; परंतु दखल घेतली जात नसल्याने बाजार समिती निवडणुकीत ग्रामस्थांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. संरक्षणमंत्री भामरे यांच्यामुळेच सरकारला निर्णय घ्यावा लागल्याचा तर आमदार चव्हाण यांनी प्रधान सचिवांसोबत बैठक घेतल्यामुळे पाणी प्रश्न सुटल्याचे समर्थकांचे म्हणणे आहे. दोन्ही बाजूंनी कामाचे श्रेय घेताना आजवरच्या पत्राचा संदर्भ देत पुरावे जाहीर केले आहेत. तत्कालीन आघाडी सरकारने बागलाणसाठी योजना व्यवहार्य नसल्याचे सांगून फेटाळली होती; आमदार दीपिका चव्हाण व संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी आपापल्या पातळीवर या संदर्भात पाठपुरावा सुरू ठेवला होता. तरीही विलंब होत असल्याचे पाहून अलीकडेच वीरगाव येथे शेतकऱ्यांनी आंदोलनही छेडले होते.जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी तळवाडे भामेर एक्स्प्रेस कालवा, हरणबारी, केळझर चारी क्रमांक ८ व सटाणा शहरासाठी पाणी योजना मंजूर करण्याचा निर्णय घेतला. आता जलसंपदा खात्याने हरणबारी व केळझरमधील पाणी बागलाणसाठी राखीव ठेवण्यास अनुमती दिल्याने त्यातून श्रेयवाद सुरू झाला.