शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
4
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
5
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
6
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
7
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
8
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
9
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
10
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
11
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
12
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
13
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
14
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
15
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
16
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
17
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
18
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
19
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
20
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  

पाणीप्रश्नी भामरे-चव्हाणांमध्ये श्रेयवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 23:52 IST

नाशिक : नेहमीच अवर्षणग्रस्त असलेल्या बागलाण तालुक्यासाठी हरणबारी व केळझर धरणातून सुमारे ५३ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित ठेवण्यास जलसंपदा खात्याने मान्यता दिल्यामुळे आगामी निवडणुकीच्या तोंडावर खासदार तथा संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे व आमदार दीपिका चव्हाण यांच्यात श्रेयवाद सुरू झाला असून, दोघांनीही आपल्या पाठपुराव्यामुळे पाणीप्रश्न सुटल्याचे म्हटले आहे.

ठळक मुद्देबागलाण : केळझर, हरणबारीतून ५३ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित

नाशिक : नेहमीच अवर्षणग्रस्त असलेल्या बागलाण तालुक्यासाठी हरणबारी व केळझर धरणातून सुमारे ५३ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित ठेवण्यास जलसंपदा खात्याने मान्यता दिल्यामुळे आगामी निवडणुकीच्या तोंडावर खासदार तथा संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे व आमदार दीपिका चव्हाण यांच्यात श्रेयवाद सुरू झाला असून, दोघांनीही आपल्या पाठपुराव्यामुळे पाणीप्रश्न सुटल्याचे म्हटले आहे.जलसंपदा विभागाच्या निर्णयामुळे साल्हेर वळण योजना क्रमांक एकमधून १४.३६ दशलक्ष घनफूट, साल्हेर वळण योजना क्रमांक २ मधून २१.९१ दशलक्ष घनफूट व वाघंबा वळण योजनेतून १६.७५ दशलक्ष घनफूट इतके पाणी बागलाण तालुक्याला मिळणार असून, या हरणबारी धरणातून पाणी मिळावे यासाठी जनतेने आंदोलने केली आहेत. पारनेर, निताणे, आखतवाडे, गोराणे, आनंदपूर, कोटबेल, फोफीर, खिरमाणे, रातीर, सारदे, कºहे, चौगाव, अजमेर, सौंदाणे, देवळाणे, वायगाव, भाक्षी, मुळाणे या गावांना दरवर्षी पाणी प्रश्न भेडसावित असून, त्यासाठी पाठपुरावाही झाला आहे; परंतु दखल घेतली जात नसल्याने बाजार समिती निवडणुकीत ग्रामस्थांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. संरक्षणमंत्री भामरे यांच्यामुळेच सरकारला निर्णय घ्यावा लागल्याचा तर आमदार चव्हाण यांनी प्रधान सचिवांसोबत बैठक घेतल्यामुळे पाणी प्रश्न सुटल्याचे समर्थकांचे म्हणणे आहे. दोन्ही बाजूंनी कामाचे श्रेय घेताना आजवरच्या पत्राचा संदर्भ देत पुरावे जाहीर केले आहेत. तत्कालीन आघाडी सरकारने बागलाणसाठी योजना व्यवहार्य नसल्याचे सांगून फेटाळली होती; आमदार दीपिका चव्हाण व संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी आपापल्या पातळीवर या संदर्भात पाठपुरावा सुरू ठेवला होता. तरीही विलंब होत असल्याचे पाहून अलीकडेच वीरगाव येथे शेतकऱ्यांनी आंदोलनही छेडले होते.जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी तळवाडे भामेर एक्स्प्रेस कालवा, हरणबारी, केळझर चारी क्रमांक ८ व सटाणा शहरासाठी पाणी योजना मंजूर करण्याचा निर्णय घेतला. आता जलसंपदा खात्याने हरणबारी व केळझरमधील पाणी बागलाणसाठी राखीव ठेवण्यास अनुमती दिल्याने त्यातून श्रेयवाद सुरू झाला.