शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

नोव्हेंबरमध्येच ३४० गांवाना टँकरचे पाणी; नाशिकचा पाणीप्रश्न सध्या ऐरणीवर

By sandeep.bhalerao | Updated: November 7, 2023 18:47 IST

येवला तालुक्यातही ३५ गावे आणि १५ वाड्यांना पाण्याचे टँकर्स सुरू आहेत.

नाशिक : एकीकडे जायकवाडीला पाणी सोडण्याच्या मुद्यावर पेच निर्माण झालेला असताना नाशिक जिल्ह्यात पाण्याची टंचाई असलेल्या ३४० गाव-वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. कमी झालेले पर्जन्यमान आणि धरणांमधील कमी साठा यामुळे नाशिक जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती आहे. सात तालुक्यांमध्ये नोव्हेंबरमध्येच टँकरबद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली असल्याने दुष्काळी स्थितीचा अंदाज येत आहे. सद्यस्थितीत ९८ टँकरद्वारे ३४० गाव-वाड्यांना पाणीपुरवठा सुरू आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात सर्वाधिक दुष्काळी स्थिती निर्माण झालेल्या नांदगाव तालुक्यातील १९६ गावांचा समावेश आहे. नाशिकचा पाणीप्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे.

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने दिलेल्या आदेशानुसार जायकवाडीला पाणी सोडण्याचे आदेश असल्याने त्याविरुद्ध सर्वपक्षीय आमदारांनी विरोध दर्शविला आहे. याप्रकरणी आमदार देवयानी फरांदे यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहे. कमी पाऊस झालेल्या बागलाण, चांदवड, देवळश, मालेगाव, नांदगाव, सिन्नर आणि येवला या तालुक्यांमधील २३६ वाड्या आणि १०४ गावे यामध्ये पाण्याचे टँकर्स ग्रामस्थांची तहान भागवत आहेत.  नांदगाव तालुक्यातील सर्वाधिक ३४ गावे आणि १६२ वाड्यांचा समावेश आहे. येवला तालुक्यातही ३५ गावे आणि १५ वाड्यांना पाण्याचे टँकर्स सुरू आहेत.

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणी