शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

नोव्हेंबरमध्येच ३४० गांवाना टँकरचे पाणी; नाशिकचा पाणीप्रश्न सध्या ऐरणीवर

By sandeep.bhalerao | Updated: November 7, 2023 18:47 IST

येवला तालुक्यातही ३५ गावे आणि १५ वाड्यांना पाण्याचे टँकर्स सुरू आहेत.

नाशिक : एकीकडे जायकवाडीला पाणी सोडण्याच्या मुद्यावर पेच निर्माण झालेला असताना नाशिक जिल्ह्यात पाण्याची टंचाई असलेल्या ३४० गाव-वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. कमी झालेले पर्जन्यमान आणि धरणांमधील कमी साठा यामुळे नाशिक जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती आहे. सात तालुक्यांमध्ये नोव्हेंबरमध्येच टँकरबद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली असल्याने दुष्काळी स्थितीचा अंदाज येत आहे. सद्यस्थितीत ९८ टँकरद्वारे ३४० गाव-वाड्यांना पाणीपुरवठा सुरू आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात सर्वाधिक दुष्काळी स्थिती निर्माण झालेल्या नांदगाव तालुक्यातील १९६ गावांचा समावेश आहे. नाशिकचा पाणीप्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे.

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने दिलेल्या आदेशानुसार जायकवाडीला पाणी सोडण्याचे आदेश असल्याने त्याविरुद्ध सर्वपक्षीय आमदारांनी विरोध दर्शविला आहे. याप्रकरणी आमदार देवयानी फरांदे यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहे. कमी पाऊस झालेल्या बागलाण, चांदवड, देवळश, मालेगाव, नांदगाव, सिन्नर आणि येवला या तालुक्यांमधील २३६ वाड्या आणि १०४ गावे यामध्ये पाण्याचे टँकर्स ग्रामस्थांची तहान भागवत आहेत.  नांदगाव तालुक्यातील सर्वाधिक ३४ गावे आणि १६२ वाड्यांचा समावेश आहे. येवला तालुक्यातही ३५ गावे आणि १५ वाड्यांना पाण्याचे टँकर्स सुरू आहेत.

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणी