शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

टँगोचा टेंपो पलटी :पाच जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2020 19:18 IST

सटाणा : देशी मद्य घेऊन जाणारा टेंम्पो पलटी झालेल्या अपघातात पाच जण जखमी झाले. तर बाटल्या फुटल्याने तीन लाख ...

ठळक मुद्देतीन लाख रुपयांचे मद्य गेले वाहून

सटाणा : देशी मद्य घेऊन जाणारा टेंम्पो पलटी झालेल्या अपघातात पाच जण जखमी झाले. तर बाटल्या फुटल्याने तीन लाख रुपयांचे मद्य वाहून गेले .हा अपघातात गुरुवारी (दि. 29) दुपारी दीड वाजेच्या सुमारास नाशिक रस्त्यावरील मोरेनगर नजीक घडला.नासिक येथून बागलाण तालुक्यातील ताहाराबाद येथे देशी मद्य (टैंगो) घेऊन जाणारा टेंम्पो (टऌ 15-अॠ 5886) याचे गुरूवारी दुपारी दीड वाजता मोरेनगर गावा जवळील सबस्टेशन समोर डाव्या बाजूचे मागचे टायर फुटल्याने टेंम्पो जागीच पलटी झाला. टायर फुटल्याचा आवाज ऐकुण परिसरातील नागरीक रस्त्यावर आल्यावर त्यांना टेंम्पो पलटी झाल्याचे दिसले. यावेळी येथील सामाजीक कार्यकर्ते परशुराम पाकळे, पिंपळदरचे सरपंच संदीप पवार,अनिल पगारे यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने मद्यच्या खोक्यांखाली अडकलेल्या कामगारांना व कॅबीन मध्ये अडकलेला चालक यांना बाहेर काढून तात्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.या अपघातात शुभम रवि नायक( 25) नासिक रोड याचा हात फॅक्चर होऊन तोंडाला दारूच्या बाटल्यांचे काच लागून गंभीर जखमा झाल्या आहेत तर चालक फकीरा भगवंता बर्वे (50), संजय नामदेव डांबेकर(52), देविदास श्रीधर भालेराव (28) नासिक रोड, आनंद शंकर पगारे(पिंपळदरा) हे किरकोळ जखमी झाले आहेत.अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे , पोलीस कर्मचारी पुंडलीक डंबाळे,अजय महाजन, योगेश गुंजाळ घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी अपघातामुळे खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली. अपघात स्थळी आगीसारखी दुर्घटना घडू नये यासाठी सटाणा नगर परिषरीषदेची अग्नीशामक गाडीही तात्काळ दाखल झाली होती. या अपघाता दारूच्या बाटल्या फुटल्याने रस्त्यावर काचांचा खच पडला होता. यावेळी परिसरातील व रस्त्याने जानाऱ्यात तळीरामांनी मात्र हात साफ करून घेतला. 

 

टॅग्स :AccidentअपघातPoliceपोलिस