शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
2
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
3
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
4
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
5
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
6
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
7
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
8
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
9
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
10
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
11
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
12
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
13
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
14
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
15
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
16
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
17
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
18
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
19
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
20
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात

ं‘मी टू’ मोहिमेला फडणवीस यांचा पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 1:06 AM

‘मी टू’ मोहिमेला माझा पाठिंबा आहे. या मोहिमेचे मी स्वागत करते. ‘मी टू’ मोहीम हे एक वादळ आहे. मंथन होत आहे. या मंथनातून अनेक धक्कादायक गोष्टी बाहेर येत आहेत. बायका हिंमत करून पुढे येत आहेत. आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडत आहेत.

नाशिक : ‘मी टू’ मोहिमेला माझा पाठिंबा आहे. या मोहिमेचे मी स्वागत करते. ‘मी टू’ मोहीम हे एक वादळ आहे. मंथन होत आहे. या मंथनातून अनेक धक्कादायक गोष्टी बाहेर येत आहेत. बायका हिंमत करून पुढे येत आहेत. आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडत आहेत. शहरांप्रमाणेच ग्रामीण भागातील महिलांनीही या मोहिमेत सहभागी होत व्यक्त व्हायला हवे, असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केले.  बुधवारी (दि.१७) कालिदास कलामंदिर येथे ‘संकल्प स्त्रित्वाच्या सन्मानाचा’ या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून त्या उपस्थित होत्या. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विविध प्रश्नांवर आपले मत व्यक्त केले. ‘मी टू’ मोहिमेतील आरोपांचे पुढे काय होणार? या प्रश्नावर ‘काय खरे आहे-काय खोटे आहे ते लवकरच समजेल. पण महिला पुढे येऊन त्याबद्दल बोलत आहेत हीच खूप मोठी गोष्ट आहे. आपल्या देशात घडत असलेली ही क्रांती आहे. त्यामुळे ‘मी टू’त व्यक्त होणाऱ्या गोष्टी नीट ऐकून घ्यायला हव्यात. त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले तरी ते त्यांच्यासाठी खूप आहे. या महिलांना पाठिंबा दिला पाहिजे’ असे आवाहन फडणवीस यांनी केले.  शबरीमला प्रकरणाविषयी त्या म्हणाल्या, या देशात सर्वांना समान हक्क आहे. मग ते पुरुष असो वा महिला, त्यामुळे महिलांना मंदिरात प्रवेश मिळाला पाहिजे. दर्शन घेता आले पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.जनजागृती व्हावी‘सॅनिटरी नॅपकिनच्या वापरात देशाची स्थिती’ याबाबत त्या म्हणाल्या, आपल्या देशात ८० टक्के महिला सॅनिटरी नॅपकिन वापरत नाही. ग्रामीण भागात हे प्रमाण सर्वाधिक आहे. याची जनजागृती झाली पाहिजे. असे कार्यक्रम देशभर झाले  तर नक्कीच हा प्रश्न सुटू  शकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

 

टॅग्स :Amruta Fadnavisअमृता फडणवीसWomenमहिला