शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळी कांदा साठवणुकीवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 17:51 IST

खामखेडा : खामखेडा परिसरात उन्हाळ कांदा साठवणूकीकरीता शेतकरी धावपळ करीत आहे. सध्या कसमादे भागात कांदा चांगला पिकला आहे. गेल्या ...

ठळक मुद्दे भाव नसल्याने तो चाळीत ठेवत आहे.

खामखेडा : खामखेडा परिसरात उन्हाळ कांदा साठवणूकीकरीता शेतकरी धावपळ करीत आहे. सध्या कसमादे भागात कांदा चांगला पिकला आहे. गेल्या तीन-चार वर्षापासून गरपीट, अवकाळी पाऊस व ह्या वर्षी दुष्काळाच्या दुष्टचक्र मागे लागलेले असतांना या सर्व संकटावर मात करु न कसा बसा कांदा पिकवला. आणि हाच कांदा आता बाजारात पाचशे ते आठशे भावात विकला जातो आहे. त्यामुळे उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही. कांद्याचे चांगले उत्पादन मिळाले असुन बाजारभाव मिळत नसल्याने कांदा साठवणुक केल्याशिवाय पर्याय नाही.गेल्या वर्षी उन्हाळी कांद्याचे भरपूर प्रमाणात उत्पादन झाल्याने तेव्हा कांदा काढणीच्या वेळेस आज ज्या भावात कांदा विकला जात आहे.त्याचं भावात गेल्या वर्षी विकला जात होता, तेव्हा पुढे भाव वाढ होईल या आशेवर शेतकऱ्याने चाळीत कांदा साठवणूक केली होती. परंतु पूर्ण वर्षभर कांद्याच्या भावात वाढ झाली नाही. कांद्याच्या भावात वाढ होईल या आशेवर नोव्हेंबर मिहन्यापर्यत ठेवला परंतु भाव वाढला नाही. तेव्हा कांदा चाळीत सडला. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती डबघाईस आली. हा कांदा चाळीतून काढून उकिरड्यावर फेकावा लागला. तरीही या वर्षी मोठ्या हिमतीने शेतकºयाने कांद्याची लागवड केली आहे. या कांदापिकासाठी उधार, उसनवर पैसे आणून उन्हाळी कांद्याची लागवड केली आहे. परंतु पाहिजे तसा भाव नसल्याने तो चाळीत ठेवत आहे.या वर्षी चांगल्या वातावरणामुळे अल्पसा पाऊस असुनही शेतकरी वर्गाला कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर साधले आहे. मात्र उत्पादन खर्च हजार रु पये एकरी असतांना कांद्याला मिळत असलेल्या सरासरी पाचशे ते आठशे रु पये बाजार भावामुळे शेतकरी वर्ग कांदा साठवणुकीस जोर देऊ लागला आहे. मातीमोल दरात कांदा देण्यापेक्षा शेतकरी साठवण करण्यास अधिक पसंती देत असल्याने सध्या खामखेडा परिसरात कांदा साठवणूक करतानाचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे.देवळा तालुक्यातील गावांना सलग चार वर्षांपासून नैसर्गिक संकटाने ग्रासले आहे. गारपीट, अवकाळी पाऊस व आता पाणीटंचाईमुळे उन्हाळी कांदा उत्पादन मोठ्या प्रमाणात घटल्याने कांदा पिकास फटका बसला आहे.गिरणा परिसरातील खामखेड, भऊर, बगडू, पिळकोस, बेज, भादवण, विसापूर या परिसरामध्ये उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. दरवर्षी सर्वसाधारण शेतकरी दोनशे ते तीनशे क्विंटल कांद्याची चाळीत साठवणूक करत होता. मात्र ह्या वर्षी अल्पश्या पावसावर लागवड केलेल्या कांद्यास अल्प बाजार भाव मिळत असल्याने शेतकरीवर्गाने कांदा साठवणुकीवर भर दिली आहे.या वर्षी कांदा पिकास पोषक वातवरण असल्याने शेतकरी वर्गास अपेक्षेपेक्षा अधिक उत्पन्न साधल्याने साठवणुकीची क्षमते पेक्षा अधिक उत्त्पन मिळाल्याने तशेच सध्या कांद्यास सरासरी चारशे ते सातशे रु पयापर्यंत बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी कांदा साठवणूकीवर भर देऊ लागला आहे. अनेक शेतकऱ्यांनी कांदा साठवणुकी साठी कायम स्वरूपी केलेल्या सोयी कांदा चाळी भरून गेल्याने खामखेडा, भऊर, सावकी, विठेवाडी परिसरात तात्पुरते कुड व अन्य सोयी उभारून कांदा साठवण्याची तयारी करीत आहे.