शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

यंदा उन्हाळ कांद्याचे उत्पादन घटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2020 11:38 PM

पिळकोस : कळवण तालुक्यातील पिळकोससह परिसरात शेवटच्या टप्प्यातील सर्व उन्हाळ कांदा लागवड करपा रोगाच्या प्रादुर्भावाने पूर्णपणे बाधित झाली आहे. ...

ठळक मुद्देकरपा रोगाचा प्रादुर्भाव : बळीराजा हवालदिल

पिळकोस : कळवण तालुक्यातील पिळकोससह परिसरात शेवटच्या टप्प्यातील सर्व उन्हाळ कांदा लागवड करपा रोगाच्या प्रादुर्भावाने पूर्णपणे बाधित झाली आहे. त्यामुळे यंदा उन्हाळ कांदा उत्पादनात मोठी घट दिसून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.परिसरात गेल्या पावसाळ्यात विक्रमी पाऊस झाला. त्यामुळे शेती डिसेंबर अखेरपर्यंत ओलिताखाली होती. त्यानंतर शेतकऱ्यांनी शेतीची तीन ते चार वेळेस आंतरमशागत करून अतिपाववसाने बाधित झालेली शेती लागवडीखाली आणली. त्यात उन्हाळ कांद्याची लागवड केली. यंदा परिसरात झालेली कांदा लागवड टप्प्याटप्प्यानेझाली असून, पहिल्या व दुसºया टप्प्यातील कांद्याची लागवड झाली ती आज काढणी सुरु आहे. मात्र दरवर्षीच्या तुलनेत उत्पादन कमी निघाले आहे. यात बहुतेक शेतकरी हा कांदा विक्री करत आहे तर काही शेतकरी कांदाचाळीत साठवत आहे. तिसºया टप्प्यातील कांदा लागवड ही करपा रोगाला बळी पडली असून तो कांदा परिपक्व नसल्याने तो चाळीत साठविता येणार नाही. त्यामुळे यंदा तरी परिसरात कांदा उत्पादन घटले असून चाळीत साठवणूकदेखील कमी प्रमाणात होणार असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

खर्च गेला वायायंदा परिसरात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने शेती उपळून निघाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरिपाचे केलेले मका पीक वाया गेले. त्यानंतर शेतीत डिसेंबर अखेरपर्यंत पाणी होते. शेतकºयांनी शेतजमीन तीन ते चार वेळेस आंतरमशागत करून शेती उन्हाळ कांद्याच्या लागवडीयोग्य बनवली व त्यात उन्हाळ कांदा लागवड केली. ही लागवड शेवटच्या टप्प्यातील असून, लागवड केलेल्या कांद्याला शेतकरी बांधवांनी मोठे आर्थिक भाग भांडवल लावले. कांदा कुठल्याही रोगाला बळी पडू नये यासाठी रोगप्रतिबंधक फवारण्याही केल्या, परंतु गेल्या दहा दिवसांपासून परिसरात उन्हाचा तडाखा वाढल्याने ही तिसºया टप्प्यातील व उपळट झालेल्या शेतात केलेली सर्व कांदा लागवड करपा रोगाला बळी पडली असून, शेतकºयांचा सर्व खर्च वाया गेला असल्याचे शेतकरी बांधवांनी सांगितले.शेतकºयांचे अतोनात नुकसान झाल्याने कृषी विभागाकडून या सर्व शेताची पाहणी करून शासनाकडे याबाबत अहवाल पाठवावा. ज्या शेतकºयांचा खरीप व रब्बीही वाया गेला असा शेतकरी सावरावा यासाठी आर्थिक मदत मिळावी.- दादाजी रेवबा जाधव, शेतकरी, पिळकोसकांदा पीक वाचविण्यासाठी टॅँकरने पाणीसायगाव : गावासह परिसरात विहिरींनी तळ गाठल्याने रब्बी हंगाम संकटात सापडला आहे. हातातोंडाशी आलेले पीक वाचविण्यासाठी या भागातील शेतकरी २५ हजार लिटर क्षमतेचे पाणी टँकर तीन हजार रुपये दराने विकत घेत आहेत. यंदा चांगला पाऊस पडला. येवला तालुक्यात किमान रब्बी हंगामातील उन्हाळ कांद्याचे पीक हमखास निघेल या आशेवर मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड करण्यात आली. पण, फेब्रुवारी महिन्यातच नदी-नाले, छोटे-मोठे बंधारे कोरडेठाक झाले. मार्चच्या शेवटी तर गाव परिसरातील विहिरींनीही तळ गाठला. त्यामुळे बळीराजाच्या तोंडचे पाणीच पळाले आहे. मशागत, महागड्या दराचे कांदा रोप, लागवड, रासायनिक खते यामुळे कांदा पीक उभे करण्यासाठी एकरी ४० हजार रुपये खर्च झाला आहे. हातातोंडाशी आलेले पीक वाचविण्यासाठी या भागात शेतकरी टँकरने पाणी विकत घेऊन पिकांना देत आहे. एकरभर कांद्याला एक पाणी द्यायचे म्हटल्यावर चार टँकर लागतात. विकतच्या पाण्यामुळे कांदा उत्पादन खर्चात २० हजार रुपयांची वाढ होणार आहे. सध्या उन्हाळ कांद्याच्या बाजारभावाची घसरण बघता कांदा उत्पादकांच्या हाती शिल्लक नफा राहणार नसल्याचे चित्र आहे.

टॅग्स :onionकांदाMarketबाजार