शहरं
Join us  
Trending Stories
1
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
2
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
3
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
4
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
5
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
6
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
7
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
8
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा खोचक टोला
9
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
10
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
11
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
12
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
13
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
14
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
15
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
16
Solo Trip: ऑफिस आणि घरापलीकडचं जग! स्त्रियांनी आयुष्यात एकदा तरी 'एकट्याने' का फिरावं?
17
Mithilesh Tiwari: बिहारच्या शिक्षणमंत्र्यांचे मुलींबद्दल हे कसले विचार? व्हिडीओ झाला व्हायरल, लोक संतापले!
18
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
19
Travel : जगाचा निरोप घेण्यापूर्वी 'या' १५ पर्यटन स्थळांचा अनुभव नक्की घ्या; आयुष्य सार्थकी लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

नांदगावी शेतकऱ्याची आत्महत्त्या

By admin | Updated: January 4, 2017 00:25 IST

नांदगावी शेतकऱ्याची आत्महत्त्या

नाशिक : नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी आत्महत्त्येचे दुष्टचक्र नवीन वर्षातही कायम असून, नांदगाव तालुक्यातील तरुण शेतकऱ्याने नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी शेतात गळफास घेऊन आत्महत्त्या केली आहे. शांताराम तानाजी बच्छाव (३५) रा. हिंगणदेहरे, ता. नांदगाव असे या शेतकऱ्याचे नाव असून, १ जानेवारी रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास कुटुंबातील व्यक्ती झोपेत असल्याचे पाहून त्यांनी शेतातच गळफास घेतला आहे. नापिकी, कर्जबाजारी-पणाबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या नोटाबंदीमुळे शेतमालाचे भाव कोसळल्याने बच्छाव यांनी आत्महत्त्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करीत आहेत. गेल्या वर्षी जानेवारी ते डिसेंबर २०१६ या संपूर्ण वर्षात जिल्ह्यात ८५ शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्या आहेत, तर २०१५ मध्येदेखील तितक्याच शेतकऱ्यांनी नापिकीला कंटाळून आत्महत्त्या केल्या होत्या. शेतकरी आत्महत्त्येचे प्रमाण दोन्ही वर्षे कायम राहिल्याने प्रशासनही विचारात पडले आहे. गेल्या वर्षी शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्त्या पाहता शासनाने अनेक योजना जाहीर केल्या त्याचबरोबर प्रशासकीय पातळीवरही प्रयत्न करण्यात आले, परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही. साधारणत: महिन्याला सात ते आठ शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्या व विशेष म्हणजे निफाडसारख्या सधन तालुक्यातील शेतकऱ्यांचे आत्महत्त्येचे प्रमाण अधिक आहे.