शहरं
Join us  
Trending Stories
1
Mallikarjun Kharge : "दुसऱ्यांच्या घरातून खुर्च्या उधार घेऊन..."; मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
2
संसदेचे विशेष अधिवेशन कधी होणार? लोकसभा अध्यक्षपदाची निवड कधी होणार? जाणून घ्या...
3
पवारांच्या राष्ट्रवादीत खदखद; जयंत पाटलांनी जाहीर भाषणात व्यक्त केली खंत, रोहित पवारांकडे रोख?
4
"बारामतीचा दादा बदला"; कार्यकर्त्याच्या मागणीवर शरद पवार म्हणाले, "आता चर्चा करु नका"
5
२०१९ च्या रोडमॅपवर चालणार एनडीए सरकार; खातेवाटपावरून दिले स्पष्ट संकेत
6
खासदार नसताना कुठलाही नेता मंत्रिपदावर किती दिवस राहू शकतो?; जाणून घ्या नियम
7
राज ठाकरेंना खरंच मोदींच्या शपथविधीचे निमंत्रण नाही? मनसे नेत्याने केलं सूचक विधान
8
Jio Finn, Zomato निफ्टी ५० मध्ये येणार का? NIFTY 50 मध्ये येण्याचा फॉर्म्युला काय? जाणून घ्या
9
चंद्राबाबू नायडू उद्या घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ, मंत्रिमंडळात २५ मंत्री होणार सामील
10
"लोकांना वाटेल की मी माझ्या जावयाला...", शाहिद आफ्रिदी संतापला, PCB ला दिला इशारा
11
जेपी नड्डांचा कार्यकाळ संपला; लवकरच BJP च्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड होणार; 'ही' नावे चर्चेत...
12
PM मोदी यांनी चार प्रमुख मंत्रालयांच्या मंत्र्यांमध्ये का केला नाही बदल, हे आहे कारण
13
शेतकऱ्यांसाठी खास मोहीम, मोदी सरकार २० जूनपर्यंत देतंय 'ही' संधी
14
Pritam Munde : Video - "आजच्या एवढ्या स्वार्थी जगात..."; रक्षा खडसेंसाठी प्रितम मुंडेंची खास पोस्ट
15
"सरकारचा गोड बोलून काटा काढण्याचा डाव"; उपोषणाच्या चौथ्या दिवशी जरांगेंची प्रकृती खालवली
16
प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याला मर्डर केसमध्ये अटक, पोलिसांकडून चौकशी सुरू
17
बिनशर्त पाठिंबा देऊन राज ठाकरेंना निमंत्रण का नाही? मुनगंटीवार म्हणाले, "घाईमध्ये राहून गेलं"
18
PAK vs CAN : पाकिस्तानला पाऊस बुडवणार? शेजाऱ्यांची अस्तित्वाची लढाई, कॅनडाचे तगडे आव्हान
19
रणबीर, शाहरुखनंतर आता प्रभासचीही आई होणार दीपिका पदुकोण; खऱ्या आयुष्यातही आहे प्रेग्नंट
20
'जीतू भैय्या' बनून आले सचिवजी, Kota Factory 3 रिलीज डेट समोर; अंगावर शहारे आणणारा Trailer

सुफी धर्मगुरू जरीफ बाबांचा दफनविधी लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2022 1:31 AM

मूळ अफगाणिस्तानचे रहिवासी असलेले मुस्लीम धर्मगुरू ‘रेफ्युजी’ जरीफ अहमद सय्यद चिश्ती (२८, मिरगाव, सिन्नर) यांचा वीस दिवसांपूर्वी नाशिकच्या येवला तालुक्यातील औद्योगिक वसाहतीत गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. जरीफ बाबा यांचे कुटुंबीय अफगाणिस्तानातून भारतात दाखल होणार असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना दुतावास कार्यालयाने दिली होती; मात्र त्यानंतर व्हिसा मिळण्यास संंबंधितांना विलंब होत असल्याचे सांगण्यात आल्याने दफनविधी लांबणीवर पडला आहे.

ठळक मुद्देपोलिसांकडून हालचाली गतिमान  अफगाणिस्तानातील कुटुंबियांना व्हिसासाठी अडचणी

नाशिक : मूळ अफगाणिस्तानचे रहिवासी असलेले मुस्लीम धर्मगुरू ‘रेफ्युजी’ जरीफ अहमद सय्यद चिश्ती (२८, मिरगाव, सिन्नर) यांचा वीस दिवसांपूर्वी नाशिकच्या येवला तालुक्यातील औद्योगिक वसाहतीत गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. जरीफ बाबा यांचे कुटुंबीय अफगाणिस्तानातून भारतात दाखल होणार असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना दुतावास कार्यालयाने दिली होती; मात्र त्यानंतर व्हिसा मिळण्यास संंबंधितांना विलंब होत असल्याचे सांगण्यात आल्याने दफनविधी लांबणीवर पडला आहे.

जरीफ चिश्ती बाबा व त्यांचे काही सेवेकरी हे ५ जुलै रोजी येवल्यात गेले होते. तेथे काही भक्तांनी त्यांना औद्योगिक वसाहतीत भूखंडाच्या भूमिपूजनाकरिता जायचे आहे, असा बनाव केला. तेथेच जरीफ बाबा यांच्यावर गोळीबार करण्यात आला. यानंतर हल्लेखोर फरार झाले. पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत येवला पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेला तातडीने तपासचक्रे फिरविण्याच्या सूचना केल्या. ग्रामीण पोलिसांना बाबांच्या खुनाचा कट रचून तो तडीस नेणाऱ्या चौघा संशयितांना बेड्या ठोकण्यात यश आले. या गुन्ह्यातील दोन संशयित अद्याप फरार आहेत. यामध्ये ज्याने बाबांवर गोळी झाडली, त्या शुटरचाही समावेश आहे. बाबांचा मृत्यू होऊन जवळपास तीन आठवडे पूर्ण होणार असून, त्यांच्या मृतदेहाचा अखेरचा प्रवास सुखकर करण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी हालचाली गतिमान केल्या आहेत. दरम्यान, बाबांची पत्नी तरीना जरीफ यांनीही त्यांच्या बहिणीसह पाटील यांची भेट घेऊन मारेकऱ्यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी केल्याचे समजते. तसेच अफगाणिस्तानात परतण्याची इच्छाही व्यक्त केली आहे.

--इन्फो--

परराज्यातील भक्तांसोबत पोलिसांशी चर्चा

अफगाणिस्तानातून जरीफ बाबा यांचे वडील व काही कुटुंबीय भारतात येणार असल्याचे दुतावास कार्यालयाकडून सांगितले जात होते. मात्र, आता त्यांना व्हिसा मिळण्यास विलंब होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. भारतातील त्यांच्या भक्तांसोबत ग्रामीण पोलिसांची चर्चा सुरू आहे. आंध्र पद्रेश, कर्नाटकमधील काही भक्तांसोबत प्राथमिक चर्चा पोलिसांनी केल्याचे सूत्रांनी सांगितले. येवल्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे हे याबाबत प्रयत्नशील आहेत. येत्या काही दिवसात याबाबत निर्णय होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.

--इन्फो--

आमदार शेलारांचे महासंचालकांना पत्र

निर्वासित नागरिक जरीफ बाबा यांच्याकडे इतकी मालमत्ता कोठून व कशी आली, त्यांना इतक्या मोठ्या प्रमाणात निधी देणारे कोण आहेत? याच्या चौकशीसाठी विशेष तपासणी पथक नेमण्याची मागणी आमदार आशिष शेलार यांनी महासंचालक रजनीश शेठ यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. त्यांनी पत्रातून विविध मुद्द्यांकडे लक्ष वेधले आहे.

 

टॅग्स :NashikनाशिकSocialसामाजिक