शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

सबस्टेशन झाले; उच्च वाहिन्यांचे स्थलांतर कधी?

By admin | Updated: April 13, 2015 01:02 IST

सबस्टेशन झाले; उच्च वाहिन्यांचे स्थलांतर कधी?

  नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी मोठ्या प्रयत्नाने साधुग्राम आणि गणेशवाडी येथे विजेचे उपकेंद्र उभाण्यात आले आहे. अगोदर निधी आणि नंतर जागेच्या मुद्द्यावरून सबस्टेशनच्या कामाचा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर प्रयत्नांची पराकाष्ठा करीत महावितरणने दोन उपकेंद्रं उभारले असले, तरी नदीपात्रात असलेल्या पाच उच्चदाब वाहिन्यांच्या स्थलांतराचा प्रश्न अद्यापही कायम आहे. महावितरण कंपनीने सिंहस्थासाठी सुमारे २४ कोटी ५६ लाखांचा आराखडा तयार करून जिल्हा प्रशासनाला सादर केला होता. प्रारंभी महावितरणचा खर्च सिंहस्थ निधीतून करावा की महावितरण कंपनीने स्वत: निधी उभारावा यावरून वाद निर्माण झाला होता. अखेर सिंहस्थ निधीतच तरतूद करण्यात आली आणि महावितरणने सिंहस्थाची कामे सुरू केली. इतर खात्यापेक्षा महावितरणचे काम कमी असले तरी महत्त्वाचे होते. यामध्ये सर्वात मोठे काम होते ते सबस्टेशन उभारणीचे. शहरातील उपकेंद्रांमधून साधुग्रामसाठी वीज पुरविणे शक्य नसल्याने नवीन सबस्टेशन करणे गरजेचे होते. परंतु पालिकेकडे जागा नसल्याने हा प्रश्न काही महिने रेंगाळला होता. अखेर पालिकेने गणेशवाडी आणि साधुग्राममधील दोन जागांची एनओसी दिल्यानंतर सबस्टेशन कामाला सुरुवात करण्यात आली. दोन्ही सबस्टेशनचे काम जवळपास ९० टक्के पूर्ण झाल्याचा दावा महावितरणने केला आहे. ३३ केव्ही लाईन्स सबस्टेशनपर्यंत आणण्यात आल्या आहेत. परंतु ११ केव्ही वाहिनी टाकण्याचे काम अद्यापही हाती घेण्यात आलेले नाही. जोपर्यंत ११ केव्हीचे काम होणार नाही तोपर्यंत उपकेंद्र दुबळे ठरणार आहे.