शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

जिल्ह्याला वादळी पावसाचा तडाखा; वीज पडून चार जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 12:56 AM

नाशिक : जिल्ह्यात रविवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसाने तिघा विद्यार्थ्यांचे बळी घेतले आहे. दिंडोरी तालुक्यातील मौजे मानोरी येथील तीन मुले वीज पडून ठार झाली. वीज पडल्याने दिंडोरी तालुक्यात तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. मृतात सागर गणपत गवे, अनिल विश्वनाथ गवे व रोहित हिरामण गायकवाड यांचा समावेश आहे. अन्य घटनेत महिलेचा मृत्यू झाला. वीज पडून चांदवङ तालुक्यातील खडकओझर येथील जनाबाई सुभाष गिरी (४०) या महिलेचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देपिंपळद येथेही वीज कोसळून दोन गायी मृत्युमुखी पडल्या आहेत.

नाशिक : जिल्ह्यात रविवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसाने तिघा विद्यार्थ्यांचे बळी घेतले आहे. दिंडोरी तालुक्यातील मौजे मानोरी येथील तीन मुले वीज पडून ठार झाली. वीज पडल्याने दिंडोरी तालुक्यात तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. मृतात सागर गणपत गवे, अनिल विश्वनाथ गवे व रोहित हिरामण गायकवाड यांचा समावेश आहे. अन्य घटनेत महिलेचा मृत्यू झाला. वीज पडून चांदवङ तालुक्यातील खडकओझर येथील जनाबाई सुभाष गिरी (४०) या महिलेचा मृत्यू झाला.दिंडोरी तालुक्यातील मौजे मानोरी येथे मुले क्रिकेट खेळत असताना विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. पावसापासून बचावासाठी तीन युवक कडुलिंबाच्या झाडाखाली आडोशाला लपले असता अंगावर वीज पडून तिघेही ठार झाल्याची घटना घडली.घटनेचे वृत्त समजताच तहसीलदार बाबासाहेब गाढवे, पोलीस निरीक्षक अनिलकुमार बोरसे यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेने मानोरी गावावर शोककळा पसरली.चाळिशी गाठल्यामुळे उन्हाच्या काहिलीने त्रस्त झालेल्या जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. वादळी वारा, विजेच्या कडकडाटासह कोसळलेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली, एवढेच नव्हे तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यासाठी उत्सुक असलेल्या कार्यकर्त्यांचाही या पावसामुळे हिरमोड झाला. गेल्या तीन दिवसांपासून हवामानात कमालीचा बदल झाला असून, कडक ऊन पडून नागरिक घामाघूम होत असताना रात्री थंड वारे वाहू लागले. त्यातच अधूनमधून आकाशात ढग गर्दी करू लागले आहेत. दोन दिवसांपूर्वी चांदवड, येवला व सिन्नर तालुक्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली तर वादळाने अनेक घरांचे नुकसान केले. बदलत्या हवामानाचा शेतकऱ्यांनी धसका घेतला असताना रविवारी दुपारनंतर अचानक पुन्हा आकाशात ढगांची गर्दी होऊन हवा बंद झाली. सायंकाळी पाच वाजेनंतर सोसाट्याचा वारा सुटला व विजेचा कडकडाट करीत पावसाने जोरदार हजेरी लावली. नाशिकसह चांदवड, दिंडोरी तालुक्यात काही ठिकाणी पावसाने झोडपून काढले. दिंडोरी तालुक्यातील शिवनई येथे यमुनाबाई भाऊसाहेब गुंजाळ यांच्या शेतात वीज पडून गाय मरण पावली. नाशिक तालुक्यातील पिंपळद येथेही वीज कोसळून दोन गायी मृत्युमुखी पडल्या आहेत.