शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
14
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
15
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
16
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
17
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
18
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
19
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार

झगडेपाडा पाझर तलावातील गाळ काढण्यास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2019 1:30 AM

देवळा तालुक्यातील जनतेला पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याने दुष्काळमुक्तीसाठी जलयुक्त शिवार अभियान राबविण्यासाठी हीच संधी समजून बापू जिभाऊ पवार या शेतकऱ्याने महसूल विभागाच्या मार्गदर्शनाखाली झगडेपाडा पाझर तलावातील गाळ स्वखर्चाने काढण्यास प्रारंभ केला आहे.

देवळा : तालुक्यातील जनतेला पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याने दुष्काळमुक्तीसाठी जलयुक्त शिवार अभियान राबविण्यासाठी हीच संधी समजून बापू जिभाऊ पवार या शेतकऱ्याने महसूल विभागाच्या मार्गदर्शनाखाली झगडेपाडा पाझर तलावातील गाळ स्वखर्चाने काढण्यास प्रारंभ केला आहे.गतवर्षी देवळा तालुक्यातील अनेक गावांमध्ये छोटे-छोटे बंधारे, जलस्रोतांचे विस्तारीकरण व खोलीकरण, लोकसहभागातून धरणातील गाळ काढणे यांसारखी कामे करून जास्तीत जास्त पाण्याचा संचय करून कायमस्वरूपी दुष्काळमुक्ती होण्यासाठी जलयुक्त शिवार कार्यक्र म राबविण्यात आला. यासाठी लोकसहभागातून गाळमुक्त धरणासाठी जेसीबी मशीनला शासनातर्फेडिझेलचा पुरवठा करण्यात आला होता; परंतु गतवर्षी अत्यल्प पाऊस पडल्यामुळे हे सर्व जलस्रोत कोरडेच राहिले. तालुक्याच्या पूर्व भागातील एकही धरण, पाझर तलाव, बंधारे, अथवा नदी-नाल्यांना पाणी आले नाही. यामुळे या भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.झगडेपाडा पाझर तलावातील गाळ तीस वर्षांपासून काढण्यात आलेला नाही. यामुळे तलावाची साठवणक्षमता कमी झाली आहे. यामुळे परिसरातील शेतकºयांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. बापू पवार या शेतकºयाने मंडल अधिकारी व्ही.जी. पाटील, तलाठी सुभाष पवार आदींच्या सहकार्याने स्वखर्चाने जेसीबीच्या साहाय्याने झगडेपाडा पाझर तलावातील गाळ काढण्यास प्रारंभ केला आहे.

टॅग्स :Nashikनाशिकwater shortageपाणीटंचाई