शहरं
Join us  
Trending Stories
1
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
2
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
3
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
4
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
5
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
6
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
7
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
8
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
9
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
10
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
11
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
12
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
13
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
15
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
16
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
17
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
18
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
19
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
20
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले

जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेस सुरळीत प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 1:22 AM

सिन्नर : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण परीक्षा मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या वार्षिक परीक्षेस गुरुवारपासून प्रारंभ झाला. ७ परीक्षा केंद्रांवर ५ हजार १५६ विद्यार्थी परीक्षेस बसले असल्याची माहिती परीक्षक मंजूषा साळुंके आणि आर. बी. लहामगे यांनी दिली.

ठळक मुद्देकॉपीमुक्त वातावरणात पेपर लिहीत होते.

सिन्नर येथील एसजी पब्लिक स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांची प्रवेशद्वारात तपासणी करताना शिक्षक.

 

सिन्नर : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण परीक्षा मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या वार्षिक परीक्षेस गुरुवारपासून प्रारंभ झाला. ७ परीक्षा केंद्रांवर ५ हजार १५६ विद्यार्थी परीक्षेस बसले असल्याची माहिती परीक्षक मंजूषा साळुंके आणि आर. बी. लहामगे यांनी दिली.सिन्नर शहरात महात्मा फुले आणि वाजे विद्यालय अशा दोन कस्टडी असून, त्यांच्या अंतर्गत ७ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होत आहे. गटशिक्षण अधिकारी एस. जी. निर्मळ यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षेची तयारी करण्यात आली आहे. वाजे विद्यालयाअंतर्गत सिन्नर महाविद्यालय व दोडी विद्यालय या दोन केंद्रांचा समावेश आहे. या दोन केंद्रांवर एकूण २०८५ विद्यार्थी परीक्षा देत आहेत, तर फुले विद्यालयाच्या कस्टडीअंतर्गत एस. जी. पब्लिक स्कूल, फुले विद्यालय, बारागाविपंप्री विद्यालय, न्यू इंग्लिश स्कूल वडांगळी आणि वडझिरे या पाच केंद्रांचा समावेश आहे. येथून ३०७१ विद्यार्थी परीक्षेस बसले आहेत. शिक्षणविस्तार अधिकारी मंजूषा साळुंके आणि आर. बी. लहामगे या दोघांची परीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.दरम्यान, कॉपीमुक्त परीक्षा पार पाडण्यासाठी तहसीलदार, गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तीन भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. कुठलीही पूर्वसूचना न देता ही भरारी पथके परीक्षा केंद्रांवर अचानक भेट देणार आहे. त्यामुळे कॉपीबहाद्दरांवर वचक बसणार असला तरी कॉपीमुक्त परीक्षा केंद्र ठेवण्यासाठी संचालकांनाही काळजी घ्यावी घेत आहेत. माध्यमिक लोकशिक्षण मंडळाच्या एसजी पब्लिक स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या १७२ सिन्नर केंद्रावर बारावीची परीक्षा शिस्तबद्ध वातावरणात सुरळीत सुरू झाली. इंग्रजी विषयाचा पहिला पेपर होता. त्यासाठी ७१२ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. मुख्य प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांची चौकशी करून सोडले जात होते. कॉपीमुक्त वातावरणात पेपर लिहीत होते. संस्था अध्यक्ष अण्णासाहेब गडाख यांनी केंद्रावर आवश्यक त्या सुविधा पुरविल्या असून, केंद्र संचालक रघुनाथ एरंडे यांच्यासह शिक्षक कर्मचारी परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी परिश्रम घेत आहे.