शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
3
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
4
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
5
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
6
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
7
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
8
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
9
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
10
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
11
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
12
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
13
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
14
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
15
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
16
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
17
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
18
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
19
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
20
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक

‘ग्रीन फिल्ड’ संदर्भात शेतकऱ्यांची तातडीने बोलविली बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 1:08 AM

स्मार्ट सिटी अंतर्गत मखमलबाद शिवारात ग्रीन फिल्ड प्रकल्प राबविण्यास शेतकऱ्यांना सादरीकरण न करताच महासभेत प्रस्ताव मांडण्यात आल्यानंतर त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटू लागली आहे.

नाशिक : स्मार्ट सिटी अंतर्गत मखमलबाद शिवारात ग्रीन फिल्ड प्रकल्प राबविण्यास शेतकऱ्यांना सादरीकरण न करताच महासभेत प्रस्ताव मांडण्यात आल्यानंतर त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटू लागली आहे. येत्या दि. २९ तारखेस होणाºया महासभेत हा प्रस्ताव असल्याने आता घाईघाईने या प्रकल्पातील प्रस्तावित शेतकºयांची तातडीची बैठक स्मार्ट सिटी कंपनीने येत्या दि. २८ तारखेस बोलाविली आहे.महापालिकेच्या वतीने हा प्रकल्प स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत राबविण्यात येणार आहे. सदरच्या प्रकल्पास शेतकºयांनी सुरुवातीला विरोध केल्यानंतर त्यांना अहमदाबाद येथील प्रकल्प पाहण्यासाठी नेण्यात आले होते. तेथून परतल्यानंतर नाशिकमधील प्रकल्पाचे सादरीकरण कालिदास कलामंदिरात करण्यात आले. त्यावेळी शेतकºयांनी या प्रकल्पात सहभागी शेतकºयांना नक्की काय लाभ मिळणार, असा प्रश्न केला होता. मात्र आधी सर्वेक्षण करू द्या, मगच लाभाचे गणित मांडता येईल असे शेतकºयांनी स्पष्ट केले होते. शेतकºयांनी सर्वेक्षणास परवानगी दिल्यानंतर प्रकल्पास तयार असल्याने इरादा असल्याचा प्रस्ताव मंजूर करून शासन दरबारी पाठविण्यासाठी महासभेवर प्रस्ताव मांडण्यात आला. त्यामुळे शेतकºयांनी संताप व्यक्त करून सर्वेक्षण बंद पाडले. हा विषय तहकूब करून स्वतंत्र महासभेत त्यावर चर्चा केली जाईल, असे आश्वासन मिळाल्यानंतर सर्वेक्षण पुन्हा करू देण्यात आले.लोकसभा निवडणुकीमुळे हा विषय काहीसा थंड होता. दरम्यान, स्मार्ट सिटी कंपनीने सर्वेक्षण पूर्ण केले तर आयुक्तांनीदेखील शेतकºयांना जमिनीच्या सहभागाच्या निकषावर तीन मॉडेल मांडले होते. परंतु ते अधिकृतरीत्या शेतकºयांपर्यंत अद्याप पाठविण्यात आलेले नाही तोच येत्या बुधवारी (दि. २९) होणाºया महासभेत ते मांडण्यात आल्याने शेतकºयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी कंपनीने तातडीने शेतकºयांची बैठक कालिदास कलामंदिरात बोलावली आहे.तीन प्रकारचे फॉर्म्युलेशेतकºयांनी ग्रीन फिल्ड क्षेत्रासाठी जागा द्यावी यासाठी तीन प्रकारचे लाभाचे फॉर्म्युले आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मांडले आहेत. त्यानुसार ५० टक्के जागा कंपनीला व ५० टक्केजागा शेतकºयांच्या मालकीची असेल तर काय लाभ मिळू शकतील, त्याच धर्तीवर शेतकºयांनी ५५ टक्के आणि तिसºया फॉर्म्युल्यानुसार ६० टक्के जागा स्वत:कडे ठेवल्यास काय परिणाम होऊ शकतात याबाबत लाभांचे गणित मांडले आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाFarmerशेतकरीSmart Cityस्मार्ट सिटी