शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
2
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
3
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
4
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
5
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
6
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
7
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
8
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
9
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
10
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
11
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
12
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
13
काळजी घ्या! मार्केटमध्ये नवीन स्कॅम आला, व्हॉट्सअ‍ॅपवर लग्नपत्रिका पाठवून बँक खाते रिकामे करतात
14
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
15
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
16
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न
17
पोस्ट ऑफिसचा मोठा निर्णय, अमेरिकेत जाणाऱ्या पार्सलवर बंदी! फक्त 'या' गोष्टींना सूट मिळणार
18
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
19
मैत्रिणीसोबत थांबला होता फ्लॅटमध्ये, तरुणाने अचानक ३२व्या मजल्यावरून मारली उडी
20
IB Recruitment: गुप्तचर विभागात ज्युनियर ऑफिसर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता

जवानांनो सज्ज रहा, कलियुगाचा शेवट महाभयंकर युद्धाने : मेजर जनरल बक्षी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2021 01:26 IST

संरक्षण क्षेत्रात भारत अधिक स्वयंपूर्ण आणि सक्षम होत असताना पाकिस्तान, चीन अथवा अन्य कोणत्याही राष्ट्राची थेट युद्ध करण्याची हिंमत नाही, त्यामुळेच वेगवेळ्या पद्धतीने छुप्या लढाया लढल्या जात असून चीनने केलेला कोरोना विषाणूचा प्रसारही त्याचाच भाग आहे. अशा कट कारस्थानांचा अंत हा कलियुगांच्या शेवटी महाभयंकर महाभारताच्या महायुद्धाने होणार असून त्यासाठी देशाच्या तरुण जवानांनी सदैव सज्ज राहण्याचे आवाहन मेजर जनरल (निवृत्त) गगन दीप बक्षी यांनी केले.

ठळक मुद्दे: डॉ. मुंजे व्याख्यानमालेत साधला संवाद

नाशिक : संरक्षण क्षेत्रात भारत अधिक स्वयंपूर्ण आणि सक्षम होत असताना पाकिस्तान, चीन अथवा अन्य कोणत्याही राष्ट्राची थेट युद्ध करण्याची हिंमतनाही, त्यामुळेच वेगवेळ्या पद्धतीने छुप्या लढाया लढल्या जात असून चीनने केलेला कोरोना विषाणूचा प्रसारही त्याचाच भाग आहे. अशा कट कारस्थानांचा अंत हा कलियुगांच्या शेवटी महाभयंकर महाभारताच्या महायुद्धाने होणार असून त्यासाठी देशाच्या तरुण जवानांनी सदैव सज्ज राहण्याचे आवाहन मेजर जनरल (निवृत्त) गगन दीप बक्षी यांनी केले.

सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीतर्फे धर्मवीर डॉ. बा. शि. मुंजे यांच्या १४९ व्या जयंतीनिमित्त रविवारी (दि. १२) रावसाहेब थोरात सभागृहात डॉ. मुंजे स्मृती व्याख्यानमालेचे सहाय्यक धर्मादाय आयुक्त आर. ए. लिटे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी सीएचएमएसचे सरकार्यवाह डॉ. दिलीप बेलगावकर यांच्यासह व्यासपीठावर नाशिक विभागाचे अध्यक्ष कॅप्टन श्रीपाद नरावणे, कार्यवाह हेमंत देशपांडे आदी उपस्थित होते. या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प ‘जीओपॉलिटिक्स इन २०३० इंडिया’ विषयावर गुंफताना मेजर जनरल बक्षी यांनी भारताला अंतर्गत जातीय व्यवस्थेपासूनच अधिक धोका असल्याचे नमूद केले. देशात मतांवर डोळा ठेवून जाती-पातीचे राजकारण केले जात असल्याने जातीय आरक्षण आणि त्यामुळे निर्माण होणारा जातीय भेदाभेद अजूनही कायम असल्याची खंत व्यक्त केली. राखीव जागांचा निकष हा आर्थिक क्षमतेवर असावा, गरीब, श्रीमंत असा भेद नकोच सर्व समान हवे, प्रथम आम्ही सर्व भारतीय आहोत, ही भावना मनी सर्व घटकांमध्ये रुजली तर भारत एकसंघ राष्ट्र म्हणून अधिक बलशाली होऊ शकेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान, दिवंगत सीडीएस बिपीन रावत यांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांच्यासोबत सैन्यदलातील रावत व अन्य अधिकाऱ्यांच्या कार्यावरही प्रकाशझोत टाकला. मेजर विक्रांत कावळे यांनी सूत्रसंचालन केले.

--

धर्मरक्षणार्थ हिंसेचे समर्थन

मेजर जनरल गगन दीप बक्षी यांनी अहिंसावादी गांधी विचारधारेवर टीका करतानाच इंग्रजांना भारतात १८५७ सारखा उठाव नको असल्याने त्यांनीच महात्मा गांधींच्या अहिंसात्मक भूमिकेचा पुरस्कार करीत त्यांना प्रसिद्धी मिळवून दिल्याचा आरोप केला. आतापर्यंत विचारवंतांनी केवळ ‘अहिंसा परमो धर्म’ एवढाच श्लोक सांगितला परंतु, त्यापुढील ‘धर्म हिंसा तथैव च’ हा भाग सांगितला नाही. त्याचा अर्थ अहिंसा मनुष्याचा धर्म असला तरी धर्माच्या रक्षणार्थ केलेली हिंसा त्याहून श्रेष्ठ असल्याचे त्यांनी यावेळी नमूद करताना राष्ट्र संरक्षण हा सैनिकांचा धर्मच असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.

-------

आजचे व्याख्यान

विषय- जीओपॉलिटिक्स इन२०३० इंडो पॅसिफिक

वक्ते- संरक्षणतज्ञ-नितीन गोखले

वेळ- सायंकाळी ५.३० वा.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक