शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
2
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
3
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
4
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
5
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
6
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
7
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
8
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
9
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
10
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
11
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
12
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
13
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
14
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
15
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
16
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
17
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
18
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
19
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
20
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात

छोटे पक्ष, संघटनांची करावी लागते मनधरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2019 6:24 PM

या निवडणुकीसाठी भाजपाने शिवसेना, रिपाइं (ए), राष्टÑीय समाज पक्ष अशा समविचारी पक्षांशी युती केली असून, कॉँग्रेसने राष्टÑवादी, जोगेंद्र कवाडे यांची पीपल्स रिपाइं अशा जुन्याच पक्षांना सोबत ठेवले आहे. महाराष्टÑ नवनिर्माण सेनेने जाहीरपणे मोदी व शहा यांच्या विरोधात भूमिका घेतली, परंतु मते कोणाला द्यायची

ठळक मुद्देभाव वधारला : लहान-सहान गोष्टींवरून राजी-नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : लोकसभा निवडणुकीसाठी दोन किंवा तीन प्रमुख राजकीय पक्षांमध्ये चुरशीची लढत होणार असली तरी, स्वत:ला पुरोगामी वा प्रतिगामी म्हणवून घेणाऱ्या अनेक लहान-सहान राजकीय पक्ष व संघटनांनादेखील या निवडणुकीच्या निमित्ताने महत्त्व प्राप्त झाले असून, निवडणूक तोंडावर असल्यामुळे असे पक्ष व संघटनांची समविचारी पक्षाला मनधरणी करावी लागत आहे. मेळावे, बैठकांना निमंत्रण देण्यापासून ते व्यासपीठावर मानाचे स्थान दिले नसल्याच्या निमित्ताने राजी-नाराजीला तोंड फुटत असल्याने मोठ्या पक्षांपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे.

या निवडणुकीसाठी भाजपाने शिवसेना, रिपाइं (ए), राष्टÑीय समाज पक्ष अशा समविचारी पक्षांशी युती केली असून, कॉँग्रेसने राष्टÑवादी, जोगेंद्र कवाडे यांची पीपल्स रिपाइं अशा जुन्याच पक्षांना सोबत ठेवले आहे. महाराष्टÑ नवनिर्माण सेनेने जाहीरपणे मोदी व शहा यांच्या विरोधात भूमिका घेतली, परंतु मते कोणाला द्यायची याबाबतची भूमिका गुलदस्त्यात ठेवली असली तरी, त्यातूनच एकप्रकारे सेना-भाजपा वगळून कॉँग्रेस आघाडीला मतदान करा, असा संदेश अप्रत्यक्ष देण्यात आला आहे. या मोठ्या पक्षांबरोबरच जिल्ह्यात अनेक लहान-सहान राजकीय पक्ष व त्यांना संलग्न संघटना आहेत. एरव्ही या पक्षांचे उपक्रम त्यांच्यापुरता मर्यादित असले तरी, निवडणुकीच्या निमित्ताने मात्र त्यांनी स्वत:च स्वत:चे महत्त्व तयार करून घेण्यास सुरुवात केली असून, प्रसिद्धीमाध्यमांकडे जाऊन किंवा संबंधित राजकीय पक्षांकडे जाऊन स्वत:हून पाठिंबा देण्याची तयारी दर्शवित आहेत. त्यामागे निव्वळ ‘विश्वासात’ घेतले जावे एवढी अपेक्षा ठेवण्यात येत असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात राजकीय पक्षांनी मेळावे, बैठका बोलविताना राजकीय पक्ष, संघटनेचे नावे निमंत्रण द्यावे, फलकावर नेत्याचे छायाचित्र, मान्यवरांच्या यादीत नावे, व्यासपीठावर मानाचे पान, उपस्थिताना मार्गदर्शन करण्याची संधी दिली जावी, अशी भरमसाठ अपेक्षा ठेवली जात आहे. प्रचारासाठी साहित्य, वाहन, त्यासाठी येणारा खर्च व कार्यकर्त्यांचे खाणपानाची व्यवस्था भागविण्यासाठी उमेदवार व त्यांच्या राजकीय पक्षांकडे गळ घालण्यास सुरुवात झाली आहे. मुळातच यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असून, त्यासाठी प्रत्येक घटक, संघटनांच्या सहकार्याची गरज उमेदवारांना आहे, अशा वेळी त्यांना नाराज करणे परवडेनासे असले तरी, त्यांची राजी-नाराजी राखण्यातच दमछाक होऊ लागली आहे. अजून निवडणुकीला वेळ असली तरी प्रचाराच्या अंतिम टप्प्यात त्यांचा भाव वधारण्याची शक्यता आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिक