शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

मुंबईला कमी प्रमाणात भाजीपाला रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 01:00 IST

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीला रविवारी (दि.४) पूर आला आहे. नाशिकसह मुंबई आणि अन्य परजिल्ह्यांतदेखील पाऊस सुरू असल्याने वाहतुकीसाठी रस्ते बंद करण्यात आले आहे.

पंचवटी : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीला रविवारी (दि.४) पूर आला आहे. नाशिकसह मुंबई आणि अन्य परजिल्ह्यांतदेखील पाऊस सुरू असल्याने वाहतुकीसाठी रस्ते बंद करण्यात आले आहे. मुंबईत व मुंबई उपनगरातदेखील पावसाची धुवाधार सुरू असल्याने नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतून मुंबई भाजीपाल्याची वाहने पाठविली गेली नाही. त्यामुळे मुंबईत निर्यात केल्या जाणाऱ्या भाजीपाला मालाला ब्रेक लागला होता. मात्र सोमवारी (दि.५) मुंबईला निर्यात केला जाणारा भाजीपाला माल कमी प्रमाणात रवाना झाला.नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतून रविवारी तब्बल सात ते आठ वर्षांनंतर मुंबईत शेतमालाची वाहने रवाना झाली नाही असे बाजार समिती सूत्रांनी सांगितले. बाजार समितीतून मुंबई आणि गुजरातला दैनंदिन जवळपास २५ चारचाकी वाहने भरून शेतमाल निर्यात केला जातो. पावसामुळे रस्ते जलमय झाल्याने नाशिक शहरातील तसेच मुंबईकडे जाणाºया काही महामार्गावरदेखील पाणी साचल्याने रस्ते सर्वच वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केले होते. त्यामुळे भाजीपाला घेऊन जाणारी वाहने मुंबईच्या दिशेने रवाना झालीच नाही. मुंबई वगळता अन्य जिल्ह्यातदेखील शेतमाल रवाना झाला नाही. केवळ गुजरात राज्यात सुमारे ५ ते ६ वाहने पालेभाज्या माल पाठविला असल्याचे भाजीपाला व्यापाऱ्यांनी सांगितले.सोमवारी (दि.५) बाजार समितीत फळभाज्यांची पंधरा तर सायंकाळी पालेभाज्यांची पाच टक्के आवक आली होती. पावसामुळे बाजार समितीत दैनंदिन होणाºया लाखो रु पयांच्या आर्थिक उलाढालीवर चांगलाच परिणाम जाणवला असल्याचे नाशिक बाजार समिती सूत्रांनी सांगितले. फळभाज्यांचे बाजारभाव सर्वसाधारण होते, तर सायंकाळी पालेभाज्या मालाचे दर किरकोळ वाढले होते. कोथिंबिरीला शेकडा १२ हजार रु पयेपर्यंत बाजारभाव मिळाला होता. रविवारी झालेल्या पावसामुळे बाजार समिती फळभाज्या आणि पालेभाज्यांची आवक घटल्याने बाजार समितीत फारशी गर्दी दिसून आली नाही.

टॅग्स :Nashik Floodनाशिक पूरRainपाऊसvegetableभाज्याMarket Yardमार्केट यार्डFarmerशेतकरी